शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

१५ आॅगस्टपूर्वी ४० वर्षात पाचव्यांदा भरले भंडारदरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 12:37 IST

जैवविविधतेचे लेणं व पर्यटनाचा नैसर्गिक वारसा लाभलेल्या तालुक्यातील बिटिशकालीन भंडारदरा धरण गेल्या ४० वर्षात फक्त पाच वेळा १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण क्षमतेने भरले आहे

हेमंत आवारीअकोले : जैवविविधतेचे लेणं व पर्यटनाचा नैसर्गिक वारसा लाभलेल्या तालुक्यातील बिटिशकालीन भंडारदरा धरण गेल्या ४० वर्षात फक्त पाच वेळा १५ आॅगस्टपूर्वी पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्या आठ दिवसात झालेल्या जोरदार पावसाने धरण शनिवारी दुपारी ओव्हरफ्लो झाले.सध्या भंडारदरा परिसरात ‘जलोत्सव’ साजरा होत आहे. धरणाच्या पाणलोटातील ४० किलोमीटरच्या ‘रिंग रोड’भागात असंख्य शुभ्र चंदेरी जलप्रपात-धबधबे फेसाळले आहेत. ओढे, नाले खळखळून भरभरुन वाहत आहेत. धरणाच्या ‘स्पिल वे’सांडव्याच्या जवळून पाणलोटाच्या सफरीला सुरुवात करायची.मुतखेल येथेल वावडीच्या डोंगरावरुन हवेत थुईथुई उडणारे प्रपात, कोलटेंभे येथील गायमुखासह चार- सहा मोठे आणि असंख्य छोटे उंच कड्यावरुन कोसळणारे धबधबे, रतनवाडीच कातळशिल्प अमृतेश्वर मंदिर, साम्रद येथील अद्भूत रम्य सांधनदरी, घाटघरचा कोकणकडा, उदंचल जलविद्युत प्रकल्पाचा अप्पर डॅम, मोटाचा डोंगर व अलंग-मलंग-कुलंग तसेच कळसुबाई शिखरावरुन कोसळणारे उडदावणे पांजरे येथील धबधबे बघत मुरशेत मार्गे शेंडीत पोहचायचे आणि धरणाच्या भिंतीजवळ विसावा घ्यायचा असा जलोत्सवाचा आनंद पर्यटक ‘विक एण्ड’ ला घेत आहेत. १५ आॅगस्टला येथे निसर्गप्रमींची जनू जत्राच भरते.भंडारदरा धरणाच्या कामास बिटिशांनी १९१० साली प्रारंभ केला. त्या आधी १८९०च्या दरम्यान संगमनेर तालुक्यातील ओझर येथे पिकअप आॅल बांधून कालवे निर्माण करण्यात आले होते.१९२६ ला दगड-गुळ चुण्यातील या धरणाचे काम काम पूर्ण झाले. १९२२ ला धरणात पाणी साठवायला सुरुवात झाली. धरणाचे पाणलोटक्षेत्र १२१ चौरस किलोमीटर इतके आहे.‘आधी कालवे मग धरण’ अशी या धरणाची ख्याती आहे. १९८० पासून आतापर्यंत १९९०, २००५, २०११ व २०१८, २०१९असे चार वेळा १५ आॅगस्टपूर्वी तर गेली ३९ वर्षात १८ वेळा आॅगस्ट महिन्यातच भंडारदरा ओसंडल्याची नोंद आहे. केवळ सात वेळा म्हणजे १९८५, १९८६, १९८७, १९८९, १९९५, २००० व २०१५ ला भंडारदरा धरण रिते राहिले. पूर्ण क्षमतेने भरले नाही.नदीपात्रात पाणी सोडणारनिळवंडे धरण भरल्यानंतर प्रवरा नदीत विसर्ग सोडण्यात येईल. प्रवरा नदीकाठच्या गावांना सध्या कुठल्याही प्रकारचा धोका नाही. धरणातील विसर्ग वाढवताना वेळोवेळी महसूल व पोलीस विभागांना कळविण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता देशमुख यांनी सांगितले.देवठाण पाच वेळा रितेआढळा नदीवरील १ हजार ६० दशलक्ष घनफूट क्षमतेचे देवठाण धरण २००३ पासून २०१८ पर्यंत पाच वेळा रिते राहिले. २००५ ला हे धरण ३० जून रोजी, २००६ ला २९ जुलै रोजी, २०१६ ला ३ आॅगस्ट रोजी तर २०१७ ला ३१ जुलै रोजी हे धरण ओसांडून वाहिले आहे.४गतवर्षी केवळ ६६० दशलक्ष घनफूट पाणी साठले होते. हे धरण देखील यंदा १५ आॅगस्टपूर्वी भरण्याची शक्यता आहे.निळवंडे दोनदाच भरले४८ हजार ३२० दशलक्ष घनफूट क्षमतेच्या निळवंडे धरणात २००८ पासून थोडे, थोडे पाणी साठवण्यास सुरुवात करण्यात आली. १२ वर्षात दोनदा २०१६ व २०१७ ला ते पूर्ण क्षमतेने भरले आहे. गेल्यावर्षी फक्त ६ हजार ९८९ दशलक्ष घनफूट इतके पाणी साठले होते.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय