शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:22 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास चारशेने घटल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. नगर शहरातही रुग्णसंख्या निम्म्याने घटली आहे. ...

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास चारशेने घटल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. नगर शहरातही रुग्णसंख्या निम्म्याने घटली आहे. शनिवारी ३ हजार ६१२ बाधितांची भर पडली आहे. बाधित रुग्णांपेक्षा ४ हजार १८२ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या २६ हजार ४१९ इतके सक्रिय रुग्ण असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने पत्रकात नमूद केले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०१८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९४५ आणि अँटिजन चाचणीत ६४९ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर २९, अकोले १७०, जामखेड १, कर्जत १०७, कोपरगाव १९, नगर ग्रामीण ४६, नेवासा ९८, पारनेर ९४, पाथर्डी १३८, राहता ९२, राहुरी ५६, संगमनेर ७८, शेवगाव २, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ५१, कँटोन्मेंट बोर्ड ६, मिलिटरी हॉस्पिटल १५ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ३४५, अकोले १९०, जामखेड ११, कर्जत २३, कोपरगाव ७२, नगर ग्रामीण १९९, नेवासा १२०, पारनेर ७०, पाथर्डी ३१, राहाता १२८, राहुरी ७५, संगमनेर ३६१, शेवगाव २४, श्रीगोंदा ४४, श्रीरामपूर १४३, कँटोन्मेंट बोर्ड ५२ आणि इतर जिल्हा ५३ आणि इतर राज्य ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजन चाचणीत आज ६४९ जण बाधित आढळून आले. नगर शहर ५४, अकोले ४, जामखेड १, कर्जत ९७, कोपरगाव ५५, नगर ग्रामीण २९, नेवासा २३, पारनेर ९१, पाथर्डी २४, राहाता १५, राहुरी १३३, संगमनेर ३, शेवगाव १२, श्रीगोंदा ६६, श्रीरामपूर ३५ आणि इतर जिल्हा ७ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, २४ तासांत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.

--------

कोरोना स्थिती

बरे झालेल्यांची संख्या : १,७७,२८६

उपचार सुरू असलेले रुग्ण : २६,१४९

मृत्यू : २,२८२

एकूण रुग्णसंख्या : २,०५,९८७

--

जिल्ह्याची रुग्णसंख्या दोन लाख पार

जिल्ह्यात गतवर्षी १२ मार्चला पहिला रुग्ण सापडला होता. तेंव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही २ लाख ५ हजार ९८७ इतकी झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोज सरासरी चार हजार रुग्ण आढळून येत असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आणि एकूण रुग्णसंख्या दोन लाखांच्याही पुढे गेली. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ७७ हजार इतकी झाली आहे.