शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:22 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास चारशेने घटल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. नगर शहरातही रुग्णसंख्या निम्म्याने घटली आहे. ...

अहमदनगर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या जवळपास चारशेने घटल्याने सर्वांनाच दिलासा मिळाला आहे. नगर शहरातही रुग्णसंख्या निम्म्याने घटली आहे. शनिवारी ३ हजार ६१२ बाधितांची भर पडली आहे. बाधित रुग्णांपेक्षा ४ हजार १८२ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या २६ हजार ४१९ इतके सक्रिय रुग्ण असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने पत्रकात नमूद केले आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०१८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १९४५ आणि अँटिजन चाचणीत ६४९ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर २९, अकोले १७०, जामखेड १, कर्जत १०७, कोपरगाव १९, नगर ग्रामीण ४६, नेवासा ९८, पारनेर ९४, पाथर्डी १३८, राहता ९२, राहुरी ५६, संगमनेर ७८, शेवगाव २, श्रीगोंदा १२, श्रीरामपूर ५१, कँटोन्मेंट बोर्ड ६, मिलिटरी हॉस्पिटल १५ आणि इतर जिल्हा ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नगर शहर ३४५, अकोले १९०, जामखेड ११, कर्जत २३, कोपरगाव ७२, नगर ग्रामीण १९९, नेवासा १२०, पारनेर ७०, पाथर्डी ३१, राहाता १२८, राहुरी ७५, संगमनेर ३६१, शेवगाव २४, श्रीगोंदा ४४, श्रीरामपूर १४३, कँटोन्मेंट बोर्ड ५२ आणि इतर जिल्हा ५३ आणि इतर राज्य ४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटिजन चाचणीत आज ६४९ जण बाधित आढळून आले. नगर शहर ५४, अकोले ४, जामखेड १, कर्जत ९७, कोपरगाव ५५, नगर ग्रामीण २९, नेवासा २३, पारनेर ९१, पाथर्डी २४, राहाता १५, राहुरी १३३, संगमनेर ३, शेवगाव १२, श्रीगोंदा ६६, श्रीरामपूर ३५ आणि इतर जिल्हा ७ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, २४ तासांत २० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.

--------

कोरोना स्थिती

बरे झालेल्यांची संख्या : १,७७,२८६

उपचार सुरू असलेले रुग्ण : २६,१४९

मृत्यू : २,२८२

एकूण रुग्णसंख्या : २,०५,९८७

--

जिल्ह्याची रुग्णसंख्या दोन लाख पार

जिल्ह्यात गतवर्षी १२ मार्चला पहिला रुग्ण सापडला होता. तेंव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही २ लाख ५ हजार ९८७ इतकी झाली आहे. एप्रिल आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रोज सरासरी चार हजार रुग्ण आढळून येत असल्याने रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आणि एकूण रुग्णसंख्या दोन लाखांच्याही पुढे गेली. बरे झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ७७ हजार इतकी झाली आहे.