शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

कापसाच्या वजनात घट; शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारांसमोरच खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 12:18 IST

रिमोट काट्यावर कापसाचे वजन करताना शेतकऱ्यांना वाजनामध्ये फसविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. याप्रकरणी अहमदनगर  जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अधिकार वर्गाला चांगले धारेवर धरले. शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारांसमोरच खडाजंगी झाली.

 राहुरी :  रिमोट काट्यावर कापसाचे वजन करताना शेतकऱ्यांना वाजनामध्ये फसविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. याप्रकरणी अहमदनगर  जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अधिकार वर्गाला चांगले धारेवर धरले. शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारांसमोरच खडाजंगी झाली. शेतकऱ्यांची लूट न थांबल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा मोरे यांनी दिला.

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी राहुरी तहसील कार्यालयामध्ये कापूस उत्पादक शेतकरी  व्यापारी व अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. बैठकीमध्ये रवींद्र मोरे यांनी सांगितले की, वजन काट्यामध्ये रिमोट पद्धतीने शेतकऱ्यांचे कमी वजन दाखविले जाते. याशिवाय रिकामे वाहनाचे वजन काट्यावर वजन करताना माणसाला बसवली जाते. त्यामुळे ७० किलो कापसाला घट दाखविली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होते. कोणत्याही कापूस व्यापाऱ्याकडे लायसन नसल्याचे मोरे यांनी निदर्शनास आणून दिले.

बारा प्रकारचे लायसन आहे. त्यापैकी एक प्रकारचे लायसन तरी व्यापाऱ्यांनी ठेवावे. कोणत्याही शेतकऱ्यांची लूट केल्यास आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शेख यांनी दिला.

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याचे आव्हान केले. शेतकरी, व्यापारी, अधिकारी यांच्यात समन्वय असण्याची गरज तनपुरे यांनी व्यक्त केली.

बैठकीस  माजी खासदार प्रसाद तनपुरे, तहसीलदार एफ. आर. शेख, बाजार समितीचे प्रकाश डुकरे, वरिष्ठ लिपिक मधुकर कोळसे,   वजन काटा सहाय्यक निबंधक सुनील चित्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे, व्यापारी अतुल तनपुरे, सचिन  दुबे, संदीप डावखर, ईश्वर सुराणा आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरcottonकापूसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र