शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कापसाच्या वजनात घट; शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारांसमोरच खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2020 12:18 IST

रिमोट काट्यावर कापसाचे वजन करताना शेतकऱ्यांना वाजनामध्ये फसविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. याप्रकरणी अहमदनगर  जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अधिकार वर्गाला चांगले धारेवर धरले. शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारांसमोरच खडाजंगी झाली.

 राहुरी :  रिमोट काट्यावर कापसाचे वजन करताना शेतकऱ्यांना वाजनामध्ये फसविले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. याप्रकरणी अहमदनगर  जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रवींद्र मोरे यांनी अधिकार वर्गाला चांगले धारेवर धरले. शेतकरी व्यापाऱ्यांत तहसीलदारांसमोरच खडाजंगी झाली. शेतकऱ्यांची लूट न थांबल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासले जाईल, असा इशारा मोरे यांनी दिला.

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या उपस्थितीत गुरुवारी राहुरी तहसील कार्यालयामध्ये कापूस उत्पादक शेतकरी  व्यापारी व अधिकारी यांच्यात बैठक पार पडली. बैठकीमध्ये रवींद्र मोरे यांनी सांगितले की, वजन काट्यामध्ये रिमोट पद्धतीने शेतकऱ्यांचे कमी वजन दाखविले जाते. याशिवाय रिकामे वाहनाचे वजन काट्यावर वजन करताना माणसाला बसवली जाते. त्यामुळे ७० किलो कापसाला घट दाखविली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होते. कोणत्याही कापूस व्यापाऱ्याकडे लायसन नसल्याचे मोरे यांनी निदर्शनास आणून दिले.

बारा प्रकारचे लायसन आहे. त्यापैकी एक प्रकारचे लायसन तरी व्यापाऱ्यांनी ठेवावे. कोणत्याही शेतकऱ्यांची लूट केल्यास आढळून आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा शेख यांनी दिला.

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी शेतकऱ्यांना योग्य भाव देण्याचे आव्हान केले. शेतकरी, व्यापारी, अधिकारी यांच्यात समन्वय असण्याची गरज तनपुरे यांनी व्यक्त केली.

बैठकीस  माजी खासदार प्रसाद तनपुरे, तहसीलदार एफ. आर. शेख, बाजार समितीचे प्रकाश डुकरे, वरिष्ठ लिपिक मधुकर कोळसे,   वजन काटा सहाय्यक निबंधक सुनील चित्ते, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे, व्यापारी अतुल तनपुरे, सचिन  दुबे, संदीप डावखर, ईश्वर सुराणा आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरcottonकापूसFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र