शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

अटीतटीच्या लढतीच्या अंदाजामुळे पुनर्मतमोजणीची प्रशासनाला धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 16:07 IST

एकूण मतांपैकी १६ टक्के मतदान घेणाऱ्या उमेदवारांचे डिपॉझिट वाचणार

औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीत यावेळी झालेल्या अटीतटीच्या लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे २३ मे रोजी स्पष्ट होणार आहे. परंतु चौरंगी लढतीमुळे विजयी होणाऱ्या उमेदवाराला कमी मताधिक्य मिळाल्यास पुनर्मतमोजणीची मागणी होणार की काय, याची धास्ती प्रशासनाला पडली आहे. २० हजारांच्या पुढेच विजयी उमेदवाराचे मताधिक्य असेल, असा अंदाज बांधून प्रशासनातील अधिकारी स्वत:च्या मनाला दिलासा देऊ लागले आहेत. 

अटीतटीच्या लढाईमुळे विजयी उमेदवाराबाबत कुणालाही अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे प्रशासनाला पुनर्मतमोजणीची गरज पडेल की काय, अशी धास्ती वाटू लागली आहे. अशी वेळ आली तर प्रशासनाची तारांबळ उडणार आहे. कमी मानधनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुन:मतमोजणीचा धाक आत्ताच पडला आहे. पुन:मतमोजणीबाबत निवडणूक आयोगाकडून स्पष्ट असे संकेत नाहीत. दोन उमेदवारांमध्ये असलेल्या मतांमधील फरकाचा विचार करून निवडणूक निरीक्षक याबाबत अंतिम निर्णय घेऊ शकतात.

औरंगाबाद लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील २३ उमेदवारांसाठी मतदान झाले आहे. महायुतीचे उमेदवार खा.चंद्रकांत खैरे, काँग्रेस आघाडीचे आ. सुभाष झांबड, एमआयएम वंचित बहुजन आघाडीचे आ. इम्तियाज जलील व अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात लढत झाली आहे. उमेदवार आणि कार्यकर्ते आपापल्या पद्धतीने विजयाचा दावा करणारी आकडेमोड करून सध्या निकालाची वाट पाहत आहेत. औरंगाबाद लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघांत १८ लाख ८४ हजार ८६६ पैकी ११ लाख ९५ हजार २४२ (६३.४१ टक्के ) मतदान झाले आहे. 

 ...तरच डिपॉझिट वाचेलऔरंगाबाद लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघांत १८ लाख ८४ हजार ८६६ पैकी ११ लाख ९५ हजार २४२ (६३.४१ टक्के ) मतदान झाले असून, एकूण मतांपैकी १६ टक्के मतदान घेणाऱ्या उमेदवारांचे डिपॉझिट वाचणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Aurangabadऔरंगाबादaurangabad-pcऔरंगाबाद