शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भंडारदरा, मुळा धरण पाणलोटात पावसाची उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 13:33 IST

भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून पावसाने जवळपास पूर्णपणे उघडीप दिली आहे.

राजूर : भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागील दोन दिवसांपासून पावसाने जवळपास पूर्णपणे उघडीप दिली आहे. या दिवसात जिल्ह्याची चेरापुंजी समजल्या जाणा-या घाटघर, रतनवाडी परिसरात धो धो पाऊस कोसळायचा. त्याठिकाणी मंगळवारी आणि बुधवारी अवघ्या पाच मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

 मागील दोन दिवसांपासून मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातून पाऊस गायब झाल्याची चिन्हे दिसत आहेत. गतवर्षी या दिवसांत भंडारदरा आणि हरिश्चंद्रगड परिसरात मुसळधार पाऊस पडत होता. ओढे, नाले दुथडी भरून वाहत होते तर धरणांमध्ये नवीन पाण्याची आवकही झपाट्याने होत होती. मात्र या वर्षी याच परिसराला पावसाची वाट पहावी लागत आहे.

अचानक पाऊस थांबल्याने तिन्ही धरणांमध्ये होणारी नवीन पाण्याची आवकही एकदम मंदावली आहे. भंडारदरा धरणात बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत अवघे ३८ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होती.

पाणीसाठा ४ हजार ९४५ दशलक्ष घनफूट इतका झाला. मुळा धरणातही केवळ ३० दशलक्ष घनफूट नव्याने पाणी येत साठा ९ हजार ४३५ दशलक्ष घनफूट इतका झाला. निळवंडे धरणात पाणीच न आल्याने या धरणातील पाणीसाठा स्थिर म्हणजेच ४ हजार ३३३ दशलक्ष घनफूट इतकाच आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेRainपाऊस