शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात पावसाची दडी; भात रोपे सुकू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2020 16:19 IST

भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या पावसानंतर पावसाने दडी मारली आहे.  १ जूनपासून आतापर्यंत ७७९ दशलक्ष्य घनफूट पाण्याची आवक भंडारदरा धरणात झाली आहे. भात खाचरामध्ये पाणी नसल्याने रोपे सुकू लागली आहेत.

वसंत सोनवणे  । 

भंडारदरा : भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतक-यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. निसर्ग चक्रीवादळाच्या पावसानंतर पावसाने दडी मारली आहे.  १ जूनपासून आतापर्यंत ७७९ दशलक्ष्य घनफूट पाण्याची आवक भंडारदरा धरणात झाली आहे. भात खाचरामध्ये पाणी नसल्याने रोपे सुकू लागली आहेत. गेल्या दोन दिवसांपासून जिल्हाभर जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र लाभक्षेत्रातच पाऊस नाही. 

भंडारदरा धरणाचा परिसर हा पावसाचे माहेरघर  समजले जाते. चेरापुंजी समजल्या जाणाºया भंडारदरा परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे या परिसरातील शेतकरी हवादिल झाला आहे. शेतीची कामे खोळंबली आहेत. परिसरात भात हे प्रमुख पीक असून ते पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते.  परंतु पाऊस न पडल्याने शेतीची सर्व कामे ठप्प झाली आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून येथील तरुणांना रोजगार मिळत असतो, परंतु लॉकडाऊनमुळे तरुणांचा रोजगार बंद झाला आहे. 

१ जूनपासून आतापर्यंत भंडारदरा धरणात ७७९ दशलक्ष्य घनफूट पाण्याची आवक झाली आहे. मागील वर्षी धरणात २७६ दशलक्ष्य घनफूट पाणीसाठा होता.  पावसाअभावी खरीप हंगामातील भात लागवडीची कामे खोळंबली आहेत. भात लागवडीसाठी भात खाचरामध्ये पाणी असल्याशिवाय लागवड करता येत नाही. शेतात पाणी नसल्याने भातांची रोपे सुकत चालली आहेत. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 

चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या रोपांचे नुकसान झाले होते. चार पाच दिवस पाऊस न झाल्यास भाताची रोपे नष्ट होतील. शेतक-यावर दुबार पेरणीची वेळ येईल. -  तुकाराम खाडे,   शेतकरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोलेAgriculture Sectorशेती क्षेत्रRainपाऊस