शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांची निवडणूक अन् वाजू लागले वादाचे नगारे; एकनाथ शिंदेंवर देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
2
आजचे राशीभविष्य, २७ नोव्हेंबर २०२५: व्यापार, धनलाभ आणि आरोग्य! आज तुमच्या राशीत काय आहे?
3
मविआची चार लाख मते कुजवण्याची रणनीती; विरोधकांना संधीच न देण्याची भाजपा-शिंदेसेनेची खेळी
4
राज्यात उदंड झाली फार्मसी कॉलेज, १० महाविद्यालयांमध्ये शून्य प्रवेश; रिक्त जागांमधील वाढ चिंताजनक
5
ज्येष्ठ शिवसैनिकांची फौज उद्धवसेनेसाठी मैदानात; निवडणुकीसाठी मतदार यादीचीही पडताळणी
6
Video: आमदार नीलेश राणेंनी केलं 'स्टिंग ऑपरेशन'; भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात पैशांची बॅग
7
‘ऑपरेशन सिंदूर’मधील शहीद जवानाच्या आईची हायकोर्टात याचिका; "अग्निवीर योजना भेदभावपूर्ण अन्..."
8
‘फ्रायडे फिअर’ने इच्छुकांना ‘फिव्हर’; सर्वोच्च न्यायालयाच्या सुणावणीकडे सर्वांचे लक्ष
9
९१ बिबटे पिंजऱ्यात, पण ते सोडायचे कोठे?; वनविभागापुढे पेच, सर्व रेस्क्यू सेंटरसह टीटीसी फुल
10
राणी बागेतील ‘शक्ती’चा संशयास्पद मृत्यू; काहीतरी लपवण्याचा प्रयत्न, प्राणीप्रेमींचा गंभीर आरोप
11
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
12
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
13
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
14
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
15
२०२६ ला ५ राशींची अग्निपरीक्षा सुरू, साडेसाती तीव्र होणार; शनि प्रकोप-प्रतिकूल, अखंड सावधान!
16
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
17
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
18
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
19
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
20
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

राहुरी : साखर कारखाना जिवंत केल्याचा विखेंना फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 19:16 IST

बंद पडलेला राहुरी येथील डॉ़बा़बा़तनपुरे सहकारी साखर कारखाना डॉ. सुजय विखे यांनी सुरू केल्याचा त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगलाच फायदा झाला.

भाऊसाहेब येवलेराहुरी : बंद पडलेला राहुरी येथील डॉ़बा़बा़तनपुरे सहकारी साखर कारखाना डॉ. सुजय विखे यांनी सुरू केल्याचा त्यांना लोकसभा निवडणुकीत चांगलाच फायदा झाला.राहुरी कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात आमदार शिवाजी कर्डिले यांनी विखे यांना भाजपमध्ये या, खासदारकी देतो.. अशी आॅफर दिली होती़ त्यानंतर विखे यांना भाजपची अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली होती. तनपुरे कारखान्याचे दोन गळीत हंगाम यशस्वी केल्याने सुजय विखे यांना राहुरी मतदारसंघातून या निवडणुकीत आघाडी घेण्याचा मार्ग सुखकर झाला़ विजयाच्या मार्गात राहुरी मतदारसंघ विखेंचा बालेकिल्ला ठरल्याचे उघड झाले़ तनपुरे कारखान्यावर वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर विखे यांची राहुरीच्या पटलावर पकड अधिक मजबूत झाल्याचे या निवडणुकीतून समोर आले आहे़राष्टÑवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांना राहुरी मतदारसंघात कमी कालावधी मिळाला़ त्यामुळे तळागाळापर्यंत जाता आले नाही़ याउलट विखे यांनी अडीच वर्षापासून गावोगावी जाऊन खासदारकीची तयारी सुरू केली होती़ आमदार जगताप यांच्यासाठी नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी मतदारसंघ पिंजून काढला़ दुसऱ्या बाजूला आमदार जगताप यांना राहुरीत कार्यकर्त्यांची फळी निर्माण करता आली नाही.आमदार शिवाजी कर्डिले यांचे जावई म्हणून आमदार जगताप यांना अपेक्षित मदत झाली नाही़ कर्डिले यांच्या कार्यकर्त्यांकडून जगताप यांना पाठिंबा मिळाला नाही़ त्यामुळे सासरेबुवांचा जावयाला पाठिंबा न मिळाल्याने मताधिक्य वाढविण्याच्या मार्गात अडसर निर्माण झाला़राहुरीत भाजपची ताकद वाढलीडॉ़विखे यांच्या विजयाने राहुरी मतदारसंघात भाजपची ताकद वाढली आहे़ लोकसभा निवडणुकीचा फायदा विधानसभेला होऊ शकतो़ कर्डिले-विखे यांची जवळीक अधिक घट्ट होण्यास मदत होणार आहे़ विरोधी राष्ट्रवादी काँगे्रसला आगामी काळात आक्रमक पवित्रा घ्यावा लागणार आहे़ त्यामुळे सत्ताधारी व विरोधकांमध्ये विकासाच्या मुद्यांवर संघर्ष चव्हाट्यावरयेईल़ विधानसभा, लोकसभा या दोन निवडणुका पूर्णत: वेगळ्या असल्या तरी विधानसभेची रंगीत तालीम म्हणून त्याकडे पाहिले गेले़की फॅक्टर काय ठरला?नोटाबंदी, जीएसटी, शेतमालाचे पडलेले बाजारभाव व मंदी या विषयावर घणाघाती टीका करण्यात राष्ट्रवादीला अपयश आले़शेतकऱ्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आले नाही़ कारखाना सुरू केल्याचा विखेंना फायदा.कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन गुलाल आम्हीच घेणार असे सांगत मतदारांमध्ये चैतन्य निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला़विद्यमान आमदारशिवाजी कर्डिले । भाजप

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर