शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
3
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
4
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
5
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
6
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
7
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
8
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
9
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
10
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
11
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
12
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
13
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
14
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
15
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
16
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
17
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
18
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
19
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
20
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींचे विधान देशाला बदनाम करणारे: केंद्रीय मंत्री कराड यांची टीका

By अरुण वाघमोडे | Updated: March 26, 2023 16:46 IST

खासदार हे न्यायालयात दोषी आढळले तर त्यांना या पदावर राहता येणार नाही, असा निकला सुप्रीम कोर्टाने दिला होता

अहमदनगर: भारत देशाची जगात प्रथम क्रमांकाची लोकशाही आहे. राहुल गांधी यांनी मात्र इंग्लडमध्ये जाऊन भारतात लोकशाही नाही, असे वक्तव्य केले. त्यांचे हे वक्तव्य देशाला बदनाम करणारे आहे. असे मत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केले.

मंत्री कराड (दि.२६) यांनी रविवारी नगर येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी म्हणाले भारतीय जनता पक्ष हा न्यायदेवतेला मानणारा आहे. राहुल गांधी यांच्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर संसद सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. दरम्यान आमदार, खासदार हे न्यायालयात दोषी आढळले तर त्यांना या पदावर राहता येणार नाही, असा निकला सुप्रीम कोर्टाने दिला होता. या निर्णयाविरोधात तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने अध्यादेश आणला होता. त्यावेळी राहुल गांधी यांनीच या अध्यादेशाला विरोध दर्शविला होता.

आता त्याच नियमानुसार त्यांच्यावर कारवाई झाल्याचे मंत्री कराड यांनी सांगितले. केंदाचा यंदाचा ४५ लाख ३ हजार २७० कोटींचा अर्थसंकल्प आहे. २०१६ रोजी अर्थसंकल्प १६ लाख कोटींचा होता. गेल्या नऊ वर्षांत पावणेतीन पटीने यात वाढ झाली आहे. या अर्थसंकल्पात संरक्षण, ट्रान्सपोर्ट, रेल्वे यासह विविध घटकांसाठी मोठी तरतूद केलेली आहे. यातून देशासह महाराष्ट्रातील बहुतांशी रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. तसेच अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून केंद्राकडून शेतकऱ्यांसाठी भरीव मदत दिली जाणार आहे. असे ते म्हणाले.लोकसभेच्या ४८ तर विधानसभेच्या २००च्यावर जागा जिंकणार

भाजपाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) व आरपीआय अशा संयुक्त आघाडीने आम्ही लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका लढविणार आहोत. महाराष्ट्रात मागीलवेळी लोकसभेच्या आमच्या युतीने ४३ जागा जिंकल्या होत्या. आता लोकसभेच्या ४८ तर विधानसभेच्या २००च्यावर जागा जिंकण्याचे आमचे उदिष्ट आहे. राज्यात शिवसेनेशी जागावाटबाबत वरिष्ठ नेत्यांकडून निर्णय घेतला जाईल. असे मंत्री कराड यांनी सांगितले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBhagwat Karadडॉ. भागवत