शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

थोरातांच्या संगमनेरात विखेंचे संपर्क कार्यालय, जनता दरबारही भरविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 03:00 IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमध्ये भाजप नेते तथा गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संपर्क कार्यालय सुरू केले आहे.

संगमनेर (जि. अहमदनगर): काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमध्ये भाजप नेते तथा गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संपर्क कार्यालय सुरू केले आहे. तसेच विखे संगमनेरमध्ये जनता दरबारही घेणार आहेत. यामुळे आगामी काळात जिल्ह्यात विखे-थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष अधिकच टोकाला जाण्याची शक्यता आहे.विखे यांच्या जनसंपर्क कार्यालय आणि माहिती सुविधा केंद्राचे सोमवारी संगमनेर येथे उदघाटन झाले. या वेळी विखे म्हणाले, संपर्क कार्यालय सुरू होत असताना काहींनी महापुराचे कारण देत हा कार्यक्रम असंवेदनशील असल्याची टीका सोशल मीडियाद्वारे केली होती. मात्र, कॉँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचे निधन झाले तेव्हा याच नेत्यांच्या तालुक्यात चविष्ठ जेवणाच्या पंक्ती उठत होत्या. त्यामुळे तुम्ही करता ते संवेदनशील आहे का? असा सवाल विखे यांनी केला.मंत्री विखे म्हणाले, येथील नेते निळवंडे धरण पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सांगतात. त्यांनी केवळ ठेकेदारांचे पोट भरले. अनेक वर्ष बंद पडलेल्या या धरणाचे काम युती सरकारच्या काळात सुरू झाले.ज्यांनी निळवंडेच्या पाटपाण्याची वाट लावली त्यांचे काय करायचे हे आता आपल्याला पहायचे आहे. संगमनेर तालुका राज्यात दुष्काळाचे मॉडेल असल्याचेही ते सांगतात. हा तालुका दुष्काळग्रस्त कसा राहील हे मॉडेल त्यांनी सांभाळले. आता हे मॉडेल आऊट डेटेड झाले आहे.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलAhmednagarअहमदनगर