शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मुळाचे बंधारे कोरडेठाक

By admin | Updated: October 21, 2014 00:59 IST

राहुरी : मुळा नदीवर बांधण्यात आलेले चारही बंधारे कोरडेठाक पडले आहेत़ पाटबंधारे खात्याने सप्टेबर व आॅक्टोबरमध्ये पाणी सुरू असताना फळ्या टाकल्या नाहीत़

राहुरी : मुळा नदीवर बांधण्यात आलेले चारही बंधारे कोरडेठाक पडले आहेत़ पाटबंधारे खात्याने सप्टेबर व आॅक्टोबरमध्ये पाणी सुरू असताना फळ्या टाकल्या नाहीत़ त्यामुळे बंधाऱ्यात पाणी साचले नाही. परिणामी आता बंधारे कोरडे झाल्याने विहिरींची पाणीपातळी खाली गेली आहे़मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते़ त्यावेळी पाटबंधारे खात्याकडे फळ्या टाकण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती़ मात्र पाऊस होणार असल्याने फळया टाकता येणार नाही, असे पाटबंधारे खात्याने शेतकऱ्यांना सांगितले़त्यानंतर निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली़ दरम्यान डिग्रस, मांजरी, मानोरी व तिळापूर हे मुळा नदीवरील बंधारे कोरडेठाक पडले़यंदा मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरलेले नाही़ मागील महिन्यात मुळा धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते़ मात्र बंधाऱ्यांमध्ये फळया न टाकल्याने पाणी अडविले गेले नाही़ आॅक्टोबरअखेर पाणी नसल्याने मुळा नदीकाठावरील शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़मुळा नदीपात्रात पाणी सोडून डिग्रस, मांजरी, मानोरी व तिळापूर हे बंधारे भरण्यात यावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे़ नदीपात्रातील वाळू मोठ्या प्रमाणावर उपसल्याने नदीत पाणी कमी झिरले. त्यामुळे आता विहिरींच्या पाण्याची पातळी खोल गेली आहे़ विजेच्या लपंडावाबरोबरच पाणी नसल्याने शेतकऱ्यांचे लक्ष मुळा धरणातील पाण्याकडे वेधले आहेत़ (तालुका प्रतिनिधी)