शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

अक्षय भालेराव याच्या हत्येच्या निषेधार्थ आंबेडकरी बौद्ध जनतेचा नगरमध्ये जनआक्रोश मोर्चा

By साहेबराव नरसाळे | Updated: June 13, 2023 13:44 IST

जातीय धार्मिक भडकावू भाषणे करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील सकल बौद्ध व आंबेडकर समाजाच्या वतीने अक्षय भालेराव याच्या हत्येच्या निषेधार्थ व अक्षय भालेराव या युवकाचा खून खटला जलदगती न्यायालयात चालवावा व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी तसेच भालेराव यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करून एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी, कुटुंबास पोलीस संरक्षण द्यावे.  जातीय धार्मिक भडकावू भाषणे करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करावी.

देशातील महागाई कमी करून देशातील बेरोजगारांना घोषणा केल्याप्रमाणे दोन कोटी नोकऱ्या देण्यात यावे. अल्पवयीन बहुजन झोपडपट्टीत राहणारे मुलांना दंगलीमध्ये दगडफेक करण्यासाठी पुढे करणाऱ्या जातीय आणि धार्मिक शक्तींचा बंदोबस्त करावा तसेच बौद्धांना संरक्षण देण्यासाठी अकार्यक्षम ठरलेल्या शिंदे- फडणवीस सरकारने तत्काळ राजीनामा देण्यात यावा या विविध मागण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंबेडकरी बौद्ध जनतेच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

 यावेळी ज्येष्ठ नेते अशोक गायकवाड, सुमेध गायकवाड, सुरेश बनसोडे, किरण दाभाडे, सोमा शिंदे, संजय कांबळे, बंटी भिंगारदिवे, योगेश साठे, नाथा अल्हाट, नगरसेवक राहुल कांबळे, बंडू आव्हाड, विवेक भिंगारदिवे, सागर ठोकळ, प्रा.जयंत गायकवाड, नितीन कसबेकर आदीसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.  निवेदनात म्हटले आहे, नांदेड येथील बोंडार गावातील तरुण अक्षय भालेराव याची हत्या करण्यात आली. कारण त्याने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदा गावात साजरी केली त्याचा राग मनात धरून गावातील आरोपींनी सगममताने अमानुषपणे हत्या केली व त्याचे कुटुंबीयाला देखील मारहाण केली. या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली म्हणून मारेकऱ्यांना एवढा द्वेष का? कारण जातीय व धार्मिक द्वेष पसरून शांतता भंग करण्याचा जातीयवादी शक्तींकडून प्रयत्न होत आहे. त्यामुळे देशात व राज्यात अविश्वासाचे वातावरण तयार झाले असून महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस यांचे सरकार अस्थिर असल्यामुळे सरकारचा गुन्हेगारांवर वचक राहिला नसून त्यामुळे गुन्हेगार मोकाट सुटले असून. महागाई बेरोजगारी बेकारीमुळे तरुणांच्या हाताला देखील काम राहिले नसून रोजगार मागू नये म्हणून तरुणांच्या डोक्यात जातीयतेचे व धार्मिक तेचे राजकारण वेगाने सुरू झाले आहे.

16 ते 23 वर्ष वयोगटातील गोरगरीब झोपडपट्टीतील बहुजन समाजातील निरागस मुले धर्मांच्या अफुला बळी पडून दंगलीत पुढाकार घेतात. दगडफेक करतात व पोलिसांच्या कारवाईत हे तरुण सापडतात. केंद्र व राज्य सरकारमधील मंत्री व त्यांच्या राजकीय पक्षातील लोक नागपूरच्या आदेशाने विषारी सापासारखे जातीय व धार्मिक द्वेषाचे विष वेगाने पसरवीत असून त्यांच्यावर बंधन घालण्यात पोलीस यंत्रणा व प्रशासन हतबळ झाली आहे.  देशातील सर्वोच्च संस्था या सत्ताधीशांच्या दबावाखाली काम करून स्वातंत्र्य समता बंधुता धर्मनिरपेक्षता आणि पारदर्शकपणा यास हरताळ फासून एकाधिकार शाहीने काम करत आहे.

त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात केंद्र सरकार विषयी उद्रेक निर्माण झालेला असून आंबेडकरी बौद्ध समाजाचा मोर्चा हा कुणा एका जातीविरुद्ध नसून अन्यायाच्या निषेधार्थ आहे. प्रत्येक धर्म व जातीमध्ये समाजकंटक व गुंड प्रवृत्तीचे लोक असतात. म्हणून तो संपूर्ण समाज दोषी नसतो. दोन समाजामध्ये भांडणे लागावी म्हणून विषारी अपप्रचार करणाऱ्यांचा तीव्र शब्दात निषेध करणयात येत आहे, असे या निवेदनात म्हटले आहे. जिल्हाधिकारी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.