शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
2
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
3
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
4
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
5
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
6
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
7
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
8
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
9
Samudrik Shastra: सामुद्रिक शास्त्रानुसार हसण्याच्या पद्धतीवरून ओळखता येतात माणसाचे गुण-दोष!
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग आजपासून सुरू, प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद
11
Video - हृदयद्रावक! जन्मदात्या आईचा क्रूरपणा; १८ महिन्यांच्या लेकीला फेकलं नाल्यात अन्...
12
सरकारी बँक कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लवकरच पगारवाढ होणार, अर्थ मंत्रालयानं जारी केले निर्देश
13
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
14
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
15
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
16
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
17
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
18
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
19
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
Daily Top 2Weekly Top 5

घरावर काळे झेंडे लावत महाआघाडी सरकारचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:19 IST

तालुक्यातील कळस येथील मराठा महासंघाचे कार्यकर्ते भाऊसाहेब पुंजा वाकचौरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने १०२ व्या घटनादुरुस्तीचा हवाला देत ...

तालुक्यातील कळस येथील मराठा महासंघाचे कार्यकर्ते भाऊसाहेब पुंजा वाकचौरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने १०२ व्या घटनादुरुस्तीचा हवाला देत मराठा आरक्षण रद्दबादल केले. राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे लाखो मराठा युवकांचे भवितव्य धोक्यात आले. यापूर्वी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षणाचा निर्णय हा १४ व्या घटनादुरुस्तीपूर्वीचा असल्याने हे पुराव्यानिशी न्यायालयाला पटवून देण्यात सरकारला यश मिळाले होते. मग तेच पुरावे, तेच वकील राज्य सरकार बदलल्यानंतर न्यायालयात आपली बाजू भक्कमपणे मांडण्यात अपयशी का ठरले, हाच खरा प्रश्न आहे.

राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार तब्बल १० वर्षे सत्तेत असताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे, असे या पक्षातील दिग्गज नेत्यांना कधीही वाटले नाही.

फडणवीसांनी मराठा आंदोलनाला अत्यंत संयमाने हाताळले.

१९८१ पासून राज्यात कोणाची सत्ता होती? १९९३ ला ओबीसी १४ टक्केवरून ३० टक्के आरक्षण कोणी वाढवले? १९९५ ला शंभरच्या वर जाती कमिशनचा रिपोर्ट नसताना ओबीसीत कोणी घातला? २००८ ला बापट कमिशन कोणाच्या काळात झाले? २०१४ ला ईएसबीसी मराठा आरक्षण अध्यादेश कोणाच्या काळात झाला? तेव्हा आयोगाच्या शिफारशी का घेतल्या नाहीत? एवढी वर्षे मराठा आरक्षण प्रश्न का सोडवला नाहीत? आघाडीच्या काळात एका तरी आयोगाचा रिपोर्ट मराठा आरक्षण द्या म्हणून आला का? युती सरकारच्या काळात गायकवाड आयोग नेमला तेंव्हा सेना सोबत सत्तेत होती ना? उच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवताना बाजू भक्कम मांडली तेंव्हा ते टिकले ना? आता सर्वोच्च न्यायालयात तुम्ही आरक्षण टिकवले नाहीत म्हणून आरक्षण देणारे दोषी कसे? विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एखादी विशेष समिती गठीत केली असती आणि त्यांना विशेषाधिकार दिले असते तर त्यांनी गेल्या वेळीप्रमाणे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण टिकवून दाखविले असते.

१४ अकोले