शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

प्रचाराच्या तोफा थंडावल्या

By admin | Updated: October 13, 2014 23:07 IST

अहमदनगर : अल्प काळात सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या.

अहमदनगर : अल्प काळात सर्वाधिक चर्चिल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी सहा वाजता थंडावल्या. बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी आता छुप्या पध्दतीने प्रचार, वैयक्तिक भेटीगाठींना उत येणार आहे. याकाळात काही गैरप्रकार होऊ नयेत, याची काळजी प्रशासन घेणार आहे. प्रचारासाठी अवघा ११ दिवसांचा कालावधी असल्याने सर्वच पक्षाच्या नेत्यांची याकाळात धावपळ होतांना दिसली. जिल्ह्यात विधानसभेच्या १२ जागा आहेत. प्रत्येक मतदारसंघात अटीतटीची लढत असून काही चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढती आहेत. १ आॅक्टोबरला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर खऱ्याअर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा आणि सेना यांनी निवडणुकीत एकमेकांसमोर कडवे आव्हान उभे केल्याने कोण बाजी मारणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. मनसेनेही काही ठिकाणी उमेदवार उभे करत निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. निवडणुकीला ग्रामपंचायत निवडणुकीचे स्वरूप आल्याने उमेदवार एक-एक मतांसाठी झगडतांना दिसले. २ आॅक्टोबरपासून जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी पेटली. यात पंतप्रधानांसह आजी-माजी केंद्रीय मंत्र्यांनी उडी घेत आरोपांची राळ उडवून दिली. स्थानिक मुद्यापासून पाणी, रस्ते, शेती माल आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न, विकासाचा मुद्दा, विजेचा प्रश्न यावर प्रचारादरम्यान साधक-बाधक चर्चा झाली. तसेच हे प्रश्न सोडविण्यासाठी सर्व पक्षांनी जिल्ह्यातील मतदारांना बहुमताची साद घातली आहे. त्याला जिल्ह्यातील मतदार कसा प्रतिसाद देतात हे १९ तारखेला दिसणार आहे. मतदानापूर्वी उमेदवारांना मतदारांच्या व्यक्तिगत भेटीसाठी एक दिवसाचा कालावधी मिळाणार असून या काळात बांधावर असणारी मते आपल्या बाजूने वळविण्यास वेळ मिळणार आहे. प्रचारासाठी अवघा ११ दिवसांचा कालावधी मिळाल्याने अनेक मतदारसंघात उमेदवार आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची संपर्कासाठी जाहीर सभांसाठी अडचण झाल्याचे दिसून आले. यामुळे सर्वच पक्षाच्या नेत्या एकाच दिवसात अनेक ठिकाणी सभा घ्याव्या लागल्या. (प्रतिनिधी)यंदाच्या विधानसभा निवडणुकीत अभिनेता रितेश देशमुख, आदेश बांदेकर, अमोल कोल्हे, संगीतकार अवधूत गुप्ते, शिवचरित्रकार नितीन बानगुडे पाटील, शिवरत्न शेटे यांच्या शिवाय अन्य सेलिब्रिटी प्रचारासाठी येऊ शकले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय आजी-माजी मंत्री यांनी जिल्ह्यात हजेरी लावली. यात अमित शहा, नितीन गडकरी, स्मृती इराणी, उमा भारती, शरद पवार, गुलामनबी आझाद, सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावत निवडणुकीची रंगत वाढविली.राज्य पातळीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे, निलम गोऱ्हे, भाई जगताप, एकनाथ खडसे, देवेंद्र फडणवीस, छगन भुजबळ, आर.आर. पाटील, पंकजा मुंडे, बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे, महादेव जानकर, सुहास सामंत, रतनलाल सोनग्रा, गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल, वृंदा करात यांच्या सभा झाल्या. आदित्य ठाकरे, विश्वजित कदम आणि उमेश पाटील या युवा नेतृत्वाने जिल्ह्यात हजेरी लावली होती. जिल्ह्यात फक्त दोनच रोड शो झाले.