शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

कामगाराच्या मुलाचे पगारासाठी पंतप्रधानांना साकडे; तनपुरे साखर कारखान्याने थकविला ५० महिन्यांचा पगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 15:04 IST

डॉक्टर बा.बा तनपुरे सहकारी साखर कारखान्याने कामगारांचे ५० महिन्यांचे पगार थकविले आहेत. उपासमार सहन करणा-या कामगारांना दिलासा मिळावा म्हणून कामगाराचा मुलगा निखील चंद्रकांत कराळे यांनी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हस्तक्षेप करण्याची साकडे घातले आहे.

राहुरी : येथील डॉक्टर बा.बा तनपुरे सहकारी साखर कारखान्याने कामगारांचे ५० महिन्यांचे पगार थकविले आहेत. उपासमार सहन करणा-या कामगारांना दिलासा मिळावा म्हणून कामगाराचा मुलगा निखील चंद्रकांत कराळे यांनी दोन दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून हस्तक्षेप करण्याची साकडे घातले आहे. तनपुरे साखर कारखाना हा खासदार डॉ. सुजय विखे यांच्या ताब्यात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करून कामगारांचे पगार देण्याचा आदेश देवा अशी विनंती कराळे यांनी पत्राद्वारे केली आहे. कारखान्याच्या पगार मिळावा म्हणून कामगारांनी अनेकदा आंदोलने केली. तरी देखील कारखान्याने पगार देण्यासाठी टाळाटाळ केली आहे. कामगारांचे पगार देण्याचे शासनाचे धोरण असतानाही कारखाना मात्र पगार देत  नाही. कामगारांकडे पैसा नसल्याने त्यांच्या मुलांचे शिक्षणही धोक्यात आले आहे, असेही असे कराळे यांनी पत्रात म्हटले आहे.   पगारासाठी केवळ आश्वासनेचलॉकडाऊनच्या काळात कामगारांचे पगार थकित ठेवू नयेत, असा शासनाचा आदेश आहे. मात्र डॉ.बाबा तनपुरे साखर कारखान्याच्या कामगारांचे ५० महिन्यांच्या पगाराचे १०० कोटी रुपये थकले आहेत. याबाबत कामगारांनी संचालक मंडळाकडे वारंवार पाठपुरावा केला. याशिवाय अनेक वेळा आंदोलनही छेडली. पगार देऊ एवढेच आश्वासन संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पगारासंदर्भात साकडे घालण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली असली तरी अद्याप कामगारांना पगार मिळालेले नाही. पगार देता येत नसतील तर कामगारांना आत्महत्या करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी कारखान्याचे कामगार चंद्रकांत कराळे यांनी केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरीSugar factoryसाखर कारखानेLabourकामगार