शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

मार्केटपेक्षा रस्त्यावर भाजीपाल्याचा भाव दुप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:22 IST

------------ लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये १० रुपये, २० रुपये किलो मिळणारा भाजीपाला किरकोळ बाजारात मात्र ...

------------

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : येथील बाजार समितीमध्ये १० रुपये, २० रुपये किलो मिळणारा भाजीपाला किरकोळ बाजारात मात्र दुप्पट भावाने मिळतो. त्यात मार्केट परिसरासह एकवीरा चौकात ग्राहकांना परवडणारे दर आहेत. चितळे रोड, प्रोफेसर चौक आदी परिसरात भाजीपाल्याचे दर जास्तच आहेत. फ्लावर, घोसाळे, कोबी, दोडका या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर असली तरी या भाज्यांचा किरको‌ळ बाजारातील दर ४० ते ५० रुपये असा आहे. नगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा भाजीपाला विक्रीला येतो. इथे पहाटेपासूनच भाजीपाल्यांचे, फळांचे लिलाव होतात. ठोक विक्रीसाठी इथे मोठी गर्दी होते. ठोक बाजारात स्वस्त किमतीत भाजीपाला मिळत असल्याने किरकोळ ग्राहकही बाजार समिती परिसरात गर्दी करतात. जुना मंगळवार बाजार, गाडगीळ पटांगण, एकवीरा चौक, चितळे रोड, भिस्तबाग आदी परिसरात बाजार भरतो. प्रत्येक ठिकाणी तीन ते चार रुपयांचा फरक असतो.

-----------

हा बघा फरक (प्रतिकिलो)

भाजी भाजी मार्केट घराजवळ

टोमॉटो १० २०

वांगी २० ४०

फ्लावर २० ४०

कोबी १० २०

काकडी १० ३०

गवार ६० १००

दोडका १० ४०

कारले २० ५०

भेंडी १५ ४०

मिरची २५ ५०

-----------------------

दोडका एकवीरा चौकात ४० रुपये, प्रोफेसर चौकात ६० रुपये

सध्या दोडका मोठ्या प्रमाणावर विक्रीस आला आहे. साधारणपणे मार्केटमध्ये १० रुपये किलो दोडका मिळतो. प्रोफेसर चौकात ६० ते ८० रुपये किलो, तर एकवीरा चौकात ४० रुपये किलो मिळतो. कोबी, फ्लावर या भाज्यांच्या दरातही कमालाची तफावत दिसते.

-------------

पिकवतात शेतकरी, माल मात्र जास्तीचा पैसा तिसऱ्याच्या हातात

शेतकरी मोठ्या कष्टाने पालेभाजी पिकवतात. मात्र ते बाजार समितीमध्ये किरकोळ दरामध्ये विकतात. दुसरेच हा माल खरेदी करून किरकोळ बाजाराच दुप्पट ते तिप्पट दराने विकतात. शेतकऱ्यांऐवजी तिसऱ्यांच्याच हाती पैसा जातो. यामुळेच शेतकरी अधिक गरीब होत आहे, अशी प्रतिक्रिया निघोज येथील कृषीमित्र संकेत लाळगे यांनी दिली.

-------------

एवढा फरक कसा.....

पहाटे उठून बाजारात जातो. तिथे लिलावाद्वारे माल घेतो. या मालाची वाहतूक करण्यासाठी वाहन भाड्याने असते. काहींचे वाहन स्वत:चे असले तरी पेट्रोल-़डिझेलचे दर वाढल्याने वाहनभाडे वाढलेले आहे. शिवाय दिवसभर रस्त्यावर बसावे लागते. त्यामुळे हा सर्व खर्च काढणेही शक्य नसते.

- भाजी विक्रेते, प्रोफेसर चौक

-------------

लॉकडाऊनमध्ये माझा रोजगार गेला आहे. त्यामुळे आता भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. भाजी विकण्यासाठी दिवसभर एकाच जागेवर बसावे लागते. त्यात भाजी ताजी असताना विकली तर फायदा होतो. भाजी सुकली तर कमी भावाने द्यावी लागते. हा तोटा सहन करावा लागतो. हा तोटा भरून काढण्यासाठी भाज्यांमध्ये दरवाढ होते.

-भाजी विक्रेते, एकवीरा चौक

-------------