शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

उसाचा ३४०० रुपये भाव मिळावा, यासाठी राहुरीत ‘स्वाभीमानी’चा एल्गार, प्रसाद शुगर फॅक्टरीवर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 12:40 IST

शेवगावमधील शेतकरी आंदोलनाची धग कमी होत नाही तोच आता राहुरीतही ऊस दरावरुन आंदोलन पेटले आहे. उसाचा ३४०० रुपये प्रति टन पहिली उचल मिळावी, यासाठी शेतकरी संघटनेने राहुरी तालुक्यात एल्गार आंदोलन सुरु केले आहे.

ठळक मुद्देशेवगावमधील शेतकरी आंदोलनाची धग कमी होत नाही तोच आता राहुरीतही ऊस दरावरुन आंदोलन पेटले आहे. उसाचा ३४०० रुपये प्रति टन पहिली उचल मिळावी, यासाठी वांबोरी येथील प्रसाद शुगर फॅक्टरीवर संघटनेने आंदोलन पुकारले आहे.काही अनुचित घटना होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राहुरी : शेवगावमधील शेतकरी आंदोलनाची धग कमी होत नाही तोच आता राहुरीतही ऊस दरावरुन आंदोलन पेटले आहे. उसाचा ३४०० रुपये प्रति टन पहिली उचल मिळावी, यासाठी शेतकरी संघटनेने राहुरी तालुक्यात एल्गार आंदोलन सुरु केले आहे.उसाला प्रति टन ३४०० रुपये भाव मिळावा, यासाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेने काटा बंद आंदोलन हाती घेतले असून, वांबोरी येथील प्रसाद शुगर फॅक्टरीवर संघटनेने आंदोलन पुकारले आहे. काही अनुचित घटना होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.ऊस उत्पादक शेतक-यांची फसवणूक करण्याचे धोरण अवलंबिल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना शुक्रवारपासून जिल्हाभर आंदोलन उभारणार असल्याची घोषणा रवींद्र मोरे यांनी गुरुवारी केली होती. त्यानुसार त्यांनी आजपासून आंदोलन सुरु केले आहे. उसाला ३४०० रूपये प्रति टन भाव मिळाल्याशिवाय गव्हाणीकडे ऊस जाऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका घेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेने वांबोरी येथील प्रसाद साखर कारखान्याचा वजन काटा बंद पाडला आहे. आंदोलनाची माहिती मिळताच कारखान्याचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे हे कारखानास्थळी झाले आहेत. आंदोलनादरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, नगरहून राज्य राखीव दलाची तुकडीही वांबोरीत दाखल झाली आहे. आंदोलनस्थळी संघटनेच्यावतीने जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. दरम्यान तनपुरे यांनी शेतकरी संघटनेच्या नेत्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी