शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग

By admin | Updated: May 16, 2016 00:10 IST

अहमदनगर : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भाजप सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. सगळे कायदे पायदळी तुडवले जात आहेत.

अहमदनगर : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी भाजप सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. सगळे कायदे पायदळी तुडवले जात आहेत. असहिष्णुतेचा मुद्दा ते काही राज्यातील सरकार बरखास्त करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. याची किंमत त्यांना दिल्ली, बिहारच्या निवडणुकीत मोजावी लागली. पुढील निवडणुकीत त्याचे परिणाम दिसणार आहेत. जिल्ह्यातील दुष्काळप्रश्नी तालुकानिहाय दुष्काळ परिषद घेणार असल्याची माहिती विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे यांनी दिली. राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वळसे बोलत होते. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड, आ. संग्राम जगताप, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, महापौर अभिषेक कळमकर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, कपिल पवार आदी यावेळी उपस्थित होते. वळसे यांच्याकडे नगर, जळगाव आणि नागपूर जिल्ह्याची पक्षीय संघटना वाढीची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे, त्यानिमित्त पहिली बैठक रविवारी नगरला झाली. वळसे म्हणाले, दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही. मराठवाड्याच्या बरोबरीने नगर जिल्ह्यात दुष्काळ आहे. यामुळे जिल्ह्यात तातडीने दुष्काळ उपाययोजना व्हाव्यात. ही बाब सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी तालुकानिहाय दुष्काळ परिषद घेण्यात येणार असल्याचे सांगितले. मराठवाड्यातील लोकांचे रोजगारासाठी गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकात स्थलांतर झालेले असून हे राज्य सरकारचे अपयश आहे. आगामी काळात तीन चतुर्थांश राज्यात पंचायत राज व्यवस्था आणि नगरपालिकांच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा विधायक मार्गाने प्रश्न सोडवण्याचा कल असतो. मात्र, त्यांनी आक्रमक होण्याची गरज आहे. पुण्यातून नगरच्या पाण्याची अडवणूक होत नसल्याचा दावा त्यांनी केला असून पाणी सोडण्याचा निर्णय त्या त्या वर्षी होणाऱ्या पावसावर अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकार स्टिल उद्योगाला हजारो कोटींची सवलत देते. व्यापाऱ्यांची एलबीटी माफ करते, मग शेतकरी अडचणीत असताना त्यांना मदत का नको? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (प्रतिनिधी)दुष्काळप्रश्नी राष्ट्रवादीने केले सहा ठरावजिल्ह्यातील दुष्काळप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेसने रविवारी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंदर्भात चार ठराव केले.राष्ट्रवादी भवनमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते मधुकर पिचड, आ. संग्राम जगताप, आ. वैभव पिचड, आ. राहुल जगताप, जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, महापौर अभिषेक कळमकर, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, कपिल पवार, प्रताप ढाकणे, सभापती नंदा वारे, शरद नवले, सिद्धार्थ मुरकुटे, दादा कळमकर, शारदा लगड, सोमनाथ धूत यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत कळमकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारने कांद्याला २५ रुपये किलो हमीभाव द्यावा, दुधाला २८ रुपये प्रतिलीटर भाव द्यावा,टँकर सुरू करण्याचे अधिकार तहसीलदारांना द्यावेत, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, असे विविध ठराव केले.