शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

उसाला ३४०० रूपये भाव मागणा-या राहुरीतील शेतक-यांना पोलिसांनी केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 18:59 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नगर-मनमाड महामार्गावर ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून धरली. अधिका-यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची केलेली विनंती झिडकरल्याने सायंकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. सायंकाळी कार्यकर्त्यांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.

राहुरी : ‘ऊस आमच्या घामाचा, नाही कुणाच्या बापाचा’, उसाला ३४०० रूपये भाव मिळालाच पाहिजे, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा घोषणा देत राहुरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी नगर-मनमाड महामार्गावर ऊस वाहतूक करणारी वाहने अडवून धरली. अधिका-यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून आंदोलन मागे घेण्याची केलेली विनंती झिडकरल्याने सायंकाळपर्यंत आंदोलन सुरू होते. सायंकाळी कार्यकर्त्यांना राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.राहुरी तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शुक्रवारी सकाळी तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात जमले. गुहा येथे नगर-मनमाड महामार्ग अडविण्याचा कार्यकर्त्यांनी अचानक निर्णय घेतला. सकाळी ११ वाजता कार्यकर्त्यांनी गुहा येथे जाऊन ऊस वाहतूक करणारी वाहने पुलावर अडविली. भाव जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही़ आम्हाला अटक करा किंवा भाव जाहीर करा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली़नगरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयातील प्रकाश सोनटक्के, प्रकाश सैंदाने, तहसीलदार अनिल दौंडे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली. उसाचा उतारा व भाव यासंदर्भात साखर कारखान्यांशी संपर्क साधून माहिती घेतली जाईल़ आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन अधिका-यांनी केले. त्यावर कार्यकर्त्यांचे समाधान झाले नाही. आरपार लढाई असून अटक झाली तरी चालेल, पण आम्ही माघार घेणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.आंदोलनामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मोरे, प्रकाश देठे, सतीश पवार, अरूण डौले, भगिरथ पवार, राहुल करपे, दिनेश वराळे, अनिल इंगळे, असिफ पटेल, राजेंद्र शिंदे, तुषार शिंदे, विजय तोडमल, संदीप शिरसाट, प्रमोद पवार, रामकृष्ण जगताप, दिलावर पठाण आदी कार्यकर्ते सहभागी झाले.

अधिका-यांनी दिलेला शब्द पाळला नाहीजिल्हाधिक-यांशी चर्चेस बोलविले जाईल, असे आश्वासन प्रांताधिका-यांनी यापूर्वी दिले होते. प्रत्यक्षात ही बैठक तिनदा रद्द करण्यात आली. अधिका-यांनी दिलेला शब्द पाळला नाही, म्हणून आम्ही रस्त्यावरून ऊस वाहतूक करणारी वाहने अडविली. साखर कारखानदार व अधिका-यांनी भावाबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने आम्ही आंदोलन मागे घेतले नाही. साखर कारखाने भाव जाहीर करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील.-रवींद्र मोरे, तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राहुरी

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी