शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधान सिंचन योजना

By admin | Updated: October 8, 2014 00:09 IST

कोपरगाव : पाणी, रस्ते, बेरोजगारी या कोपरगाव तालुक्याच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी माझी आहे.

कोपरगाव : पाणी, रस्ते, बेरोजगारी या कोपरगाव तालुक्याच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी माझी आहे. तुम्ही केवळ स्नेहलता कोल्हे यांना आमदार करा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले़ निळवंडे कालव्यासाठी केंद्र शासनाकडून निधी देवू व पाणीप्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी पंतप्रधान सिंचन योजना कार्यान्वित केली जाईल, अशी ग्वाहीही गडकरी यांनी दिली़कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा व मित्रपक्षाच्या उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते़ यावेळी माजी मंत्री शंकरराव कोल्हे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाचे निरीक्षक खा़ वसंतभाई पटेल, ई़सी़ पटेल, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, कैलास जाधव, भरत मोरे, असलम शेख, भाजपाचे अ‍ॅड़ रवींद्र बोरावके, विजय वहाडणे, सुभाष दवंगे, महावीर दगडे, रिपाइंचे दीपक गायकवाड, रासपचे बाळासाहेब गिधाड, टेकचंद खुबानी आदी उपस्थित होते़ गडकरी म्हणाले की, गोदावरी कालव्यांचा बिकट झालेला पाणीप्रश्न, रस्ते, वीज, महिला बचतगट, महिला व ग्रामीण युवक रोजगार, शेती व कृषीमाल, आदिवासी, गोर-गरीब, मागासवर्गीयांचे प्रलंबित प्रश्न, महिलांवरील वाढते अत्याचार, नद्या जोड प्रकल्प, कोपरगाव शहर व मतदारसंघातील पाणी पुरवठा योजनांचे मांडलेले सर्व प्रश्न हे माझ्याकडे असलेल्या आठ खात्यांशी निगडीत आहेत. तेव्हा या सर्व प्रश्नांची सोडवणूक मी करणारच आहे़ मात्र त्यासाठी भाजपाला पूर्ण बहुमत देवून येथील उमेदवार कोल्हे यांना विजयी करावे लागणार आहे़ वर्षानुवर्षे केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्याला खाईत लोटले आहे़ गरिबी ही मोठी समस्या असताना चुकीचे आर्थिक धोरण, दृष्टीहीन नेतृत्व व भ्रष्ट प्रशासनामुळे देशाचा सत्यानाश झाला आहे़ राज्यावर तीन लाख कोटीचे कर्ज आहे़ तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ६० हजार कोटी रूपये खर्चाची प्रधानमंत्री सडक योजना राबविल्यामुळे देशातील एक लाख ६० हजार खेडी चांगल्या रस्त्याने जोडली गेली़ नरेंद्र मोदी यांच्या ध्येयानुसार जनधन योजनेत साडेचार कोटी खाते उघडले आहेत़ त्यांच्या डिजीटल इंडियाचे स्वप्न आपल्याला साकार करायचे असल्याचेही ते म्हणाले़उमेदवार कोल्हे म्हणाल्या, सेवेचे व विकासाचे राजकारण करणारी मंडळी हवी आहे़ राजकारण म्हणजे सत्ताकारण बनले आहे़ निष्क्रिय आमदारांमुळे भेसूर झालेल्या कोपरगावचा चेहरामोहरा मला बदलायचा आहे़ त्यासाठी मला विधानसभेत पाठवावे, असे आवाहन त्यांनी केले़ (प्रतिनिधी)