शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

पेट्रोलमध्ये इथेनॉल की भेसळ?

By साहेबराव नरसाळे | Updated: March 6, 2018 16:08 IST

गाड्या पडतात बंद : पेट्रोल, डिझेल टाक्यांमध्ये निघते पाणी

साहेबराव नरसाळे/ अण्णा नवथरअहमदनगर : वातावरणातील कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र, सध्या पेट्रोल टाकल्यानंतर गाड्यांच्या टाक्यांमध्ये पाणी निघत आहे. झटके देत गाड्या बंद पडत आहेत. त्यामुळे पेट्रोलमध्ये नक्की इथेनॉल मिक्स केले जाते की भेसळ होते, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.नगर जिल्ह्यामध्ये ३०५ पेट्रोल पंप आहेत. त्यातील भारत पेट्रोलियमचे ११५, हिंदुस्थान पेट्रोलियमचे ५७, इंडियन आॅईलचे ११४, रिलायन्सचे २, एस्सार ६ आणि आयबीपी ११ या कंपन्यांचे पेट्रोलपंप सध्या नगर जिल्ह्यात कार्यरत आहेत. नगर जिल्ह्यात दररोज सुमारे ११ लाख लिटर पेट्रोलची विक्री होते.१ सप्टेंबर २०१० पासून पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिक्स करण्यास सरकारने परवानगी दिली होती. त्यानंतर त्यामध्ये वाढ करुन ते १० टक्के करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून १० टक्के इथेनॉल मिक्स केलेले पेट्रोल विकले जात आहे. मात्र, अलिकडच्या सहा महिन्यांपासून गाड्यांच्या टाक्यांमध्ये पाणी निघू लागले आहे. तसेच काही प्रसंगात गाड्या अचानक बंद पडत आहेत. गाडी बंद पडल्यानंतरही गाडीत पेट्रोल असल्याचे दिसते. एकतर गाडी सुरु होत नाही आणि सुरु झाली तरी काही वेळाने पुन्हा बंद पडते. ही बंद पडलेली गाडी फिटरला दाखविल्यास फिटरने टाकीचा कॉक उघडला तर टाकीतून पाण्याची धार बाहेर पडते. पूर्ण टाकी रिकामी केल्यानंतर त्यात पुन्हा पेट्रोल टाकले की गाडी सुरु होते. असे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात चारचाकी वाहनचालकांना तर गाडी टोर्इंग करुनच फिटरकडे न्यावी लागते.

इथेनॉल की अन्य काही.. तपासायचे कसे?

इथेनॉल मिश्रणाला पेट्रोलपंप चालकांचा विरोध नाही; परंतु पेट्रोलमध्ये इथेनॉलच मिक्स केले आहे की अन्य काही हे तपासण्याची यंत्रणाच आपल्याकडे नाही. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केले जाते आहे, याचीही अनेकांना माहिती नाही. इथेनॉलमिश्रित पेट्रोल दुचाकी, चारचाकीमध्ये भरल्यानंतर दिवसाआड गाडी बंद पडण्याचे प्रकार समोर येत आहेत. पेट्रोल टँकमध्ये पाणी निघत असल्यामुळेही हा भेसळीचा प्रकार असल्याचा संशय अनेकांना आहे. याबाबत तक्रारीही वाढत आहेत. मात्र, या तक्रारींची दखल कोणीही घेत नाही. पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाºया इथेनॉलची शुद्धताही तपासली जाते की नाही, याबाबतही संशय आहे.

इथेनॉलचे प्रमाण वाढले पण किमती तशाच

नगरमधील प्रत्येक पेट्रोलपंपावर येणा-या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मनमाड येथील टर्मिनलमध्ये मिक्स केले जाते. तेथून ते सर्वत्र वितरीत होते. इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढले आहे़ सुरुवातीला इथेनॉलचा दर २७ रुपये प्रतिलिटर ठरविण्यात आला होता. तो आता ४२ रुपये लिटर करण्यात आला आहे. ते ८० रुपये प्रति लिटर पेट्रोलमध्ये मिश्रित करून विकले जात आहे. १ लिटर पेट्रोलमध्ये १०० एमएल इथेनॉल मिश्रित केले जाते. त्यामुळे पेट्रोलचा दर किमान चार रुपयांनी कमी होणे अपेक्षित होते. मात्र, इथेनॉल मिश्रित पेट्रोल मूळ पेट्रोलच्या किमतीतच विकले जात आहे. त्यामुळे हा वरचा नफा कोणाच्या खिशात जातो, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

इंजिन बिघाडाचा आणि अपघाताचा धोका

इथेनॉलमिश्रित पेट्रोल वाहनात भरले जात आहे. त्यामुळे वाहने अचानक गुडगुड करुन बंद पडत आहेत. महामार्गावर भरधाव वेगाने वाहन असताना अचानक जर ते बंद पडले तर अपघाताचा धोका संभवतो. त्याशिवाय कार्बोरेटर आणि इंजिन खराब होण्याचा धोकाही आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलच मिश्रित केले जाते की अन्य काही याबाबत संशय बळावला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPetrolपेट्रोल