शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलमध्ये इथेनॉल की भेसळ?

By साहेबराव नरसाळे | Updated: March 6, 2018 16:08 IST

गाड्या पडतात बंद : पेट्रोल, डिझेल टाक्यांमध्ये निघते पाणी

साहेबराव नरसाळे/ अण्णा नवथरअहमदनगर : वातावरणातील कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र, सध्या पेट्रोल टाकल्यानंतर गाड्यांच्या टाक्यांमध्ये पाणी निघत आहे. झटके देत गाड्या बंद पडत आहेत. त्यामुळे पेट्रोलमध्ये नक्की इथेनॉल मिक्स केले जाते की भेसळ होते, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.नगर जिल्ह्यामध्ये ३०५ पेट्रोल पंप आहेत. त्यातील भारत पेट्रोलियमचे ११५, हिंदुस्थान पेट्रोलियमचे ५७, इंडियन आॅईलचे ११४, रिलायन्सचे २, एस्सार ६ आणि आयबीपी ११ या कंपन्यांचे पेट्रोलपंप सध्या नगर जिल्ह्यात कार्यरत आहेत. नगर जिल्ह्यात दररोज सुमारे ११ लाख लिटर पेट्रोलची विक्री होते.१ सप्टेंबर २०१० पासून पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिक्स करण्यास सरकारने परवानगी दिली होती. त्यानंतर त्यामध्ये वाढ करुन ते १० टक्के करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून १० टक्के इथेनॉल मिक्स केलेले पेट्रोल विकले जात आहे. मात्र, अलिकडच्या सहा महिन्यांपासून गाड्यांच्या टाक्यांमध्ये पाणी निघू लागले आहे. तसेच काही प्रसंगात गाड्या अचानक बंद पडत आहेत. गाडी बंद पडल्यानंतरही गाडीत पेट्रोल असल्याचे दिसते. एकतर गाडी सुरु होत नाही आणि सुरु झाली तरी काही वेळाने पुन्हा बंद पडते. ही बंद पडलेली गाडी फिटरला दाखविल्यास फिटरने टाकीचा कॉक उघडला तर टाकीतून पाण्याची धार बाहेर पडते. पूर्ण टाकी रिकामी केल्यानंतर त्यात पुन्हा पेट्रोल टाकले की गाडी सुरु होते. असे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात चारचाकी वाहनचालकांना तर गाडी टोर्इंग करुनच फिटरकडे न्यावी लागते.

इथेनॉल की अन्य काही.. तपासायचे कसे?

इथेनॉल मिश्रणाला पेट्रोलपंप चालकांचा विरोध नाही; परंतु पेट्रोलमध्ये इथेनॉलच मिक्स केले आहे की अन्य काही हे तपासण्याची यंत्रणाच आपल्याकडे नाही. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केले जाते आहे, याचीही अनेकांना माहिती नाही. इथेनॉलमिश्रित पेट्रोल दुचाकी, चारचाकीमध्ये भरल्यानंतर दिवसाआड गाडी बंद पडण्याचे प्रकार समोर येत आहेत. पेट्रोल टँकमध्ये पाणी निघत असल्यामुळेही हा भेसळीचा प्रकार असल्याचा संशय अनेकांना आहे. याबाबत तक्रारीही वाढत आहेत. मात्र, या तक्रारींची दखल कोणीही घेत नाही. पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाºया इथेनॉलची शुद्धताही तपासली जाते की नाही, याबाबतही संशय आहे.

इथेनॉलचे प्रमाण वाढले पण किमती तशाच

नगरमधील प्रत्येक पेट्रोलपंपावर येणा-या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मनमाड येथील टर्मिनलमध्ये मिक्स केले जाते. तेथून ते सर्वत्र वितरीत होते. इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढले आहे़ सुरुवातीला इथेनॉलचा दर २७ रुपये प्रतिलिटर ठरविण्यात आला होता. तो आता ४२ रुपये लिटर करण्यात आला आहे. ते ८० रुपये प्रति लिटर पेट्रोलमध्ये मिश्रित करून विकले जात आहे. १ लिटर पेट्रोलमध्ये १०० एमएल इथेनॉल मिश्रित केले जाते. त्यामुळे पेट्रोलचा दर किमान चार रुपयांनी कमी होणे अपेक्षित होते. मात्र, इथेनॉल मिश्रित पेट्रोल मूळ पेट्रोलच्या किमतीतच विकले जात आहे. त्यामुळे हा वरचा नफा कोणाच्या खिशात जातो, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

इंजिन बिघाडाचा आणि अपघाताचा धोका

इथेनॉलमिश्रित पेट्रोल वाहनात भरले जात आहे. त्यामुळे वाहने अचानक गुडगुड करुन बंद पडत आहेत. महामार्गावर भरधाव वेगाने वाहन असताना अचानक जर ते बंद पडले तर अपघाताचा धोका संभवतो. त्याशिवाय कार्बोरेटर आणि इंजिन खराब होण्याचा धोकाही आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलच मिश्रित केले जाते की अन्य काही याबाबत संशय बळावला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPetrolपेट्रोल