शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पेट्रोलमध्ये इथेनॉल की भेसळ?

By साहेबराव नरसाळे | Updated: March 6, 2018 16:08 IST

गाड्या पडतात बंद : पेट्रोल, डिझेल टाक्यांमध्ये निघते पाणी

साहेबराव नरसाळे/ अण्णा नवथरअहमदनगर : वातावरणातील कार्बन डायआॅक्साईडचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल वापरण्यास परवानगी दिली आहे. मात्र, सध्या पेट्रोल टाकल्यानंतर गाड्यांच्या टाक्यांमध्ये पाणी निघत आहे. झटके देत गाड्या बंद पडत आहेत. त्यामुळे पेट्रोलमध्ये नक्की इथेनॉल मिक्स केले जाते की भेसळ होते, याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.नगर जिल्ह्यामध्ये ३०५ पेट्रोल पंप आहेत. त्यातील भारत पेट्रोलियमचे ११५, हिंदुस्थान पेट्रोलियमचे ५७, इंडियन आॅईलचे ११४, रिलायन्सचे २, एस्सार ६ आणि आयबीपी ११ या कंपन्यांचे पेट्रोलपंप सध्या नगर जिल्ह्यात कार्यरत आहेत. नगर जिल्ह्यात दररोज सुमारे ११ लाख लिटर पेट्रोलची विक्री होते.१ सप्टेंबर २०१० पासून पेट्रोलमध्ये ५ टक्के इथेनॉल मिक्स करण्यास सरकारने परवानगी दिली होती. त्यानंतर त्यामध्ये वाढ करुन ते १० टक्के करण्यात आले. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून १० टक्के इथेनॉल मिक्स केलेले पेट्रोल विकले जात आहे. मात्र, अलिकडच्या सहा महिन्यांपासून गाड्यांच्या टाक्यांमध्ये पाणी निघू लागले आहे. तसेच काही प्रसंगात गाड्या अचानक बंद पडत आहेत. गाडी बंद पडल्यानंतरही गाडीत पेट्रोल असल्याचे दिसते. एकतर गाडी सुरु होत नाही आणि सुरु झाली तरी काही वेळाने पुन्हा बंद पडते. ही बंद पडलेली गाडी फिटरला दाखविल्यास फिटरने टाकीचा कॉक उघडला तर टाकीतून पाण्याची धार बाहेर पडते. पूर्ण टाकी रिकामी केल्यानंतर त्यात पुन्हा पेट्रोल टाकले की गाडी सुरु होते. असे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. त्यात चारचाकी वाहनचालकांना तर गाडी टोर्इंग करुनच फिटरकडे न्यावी लागते.

इथेनॉल की अन्य काही.. तपासायचे कसे?

इथेनॉल मिश्रणाला पेट्रोलपंप चालकांचा विरोध नाही; परंतु पेट्रोलमध्ये इथेनॉलच मिक्स केले आहे की अन्य काही हे तपासण्याची यंत्रणाच आपल्याकडे नाही. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स केले जाते आहे, याचीही अनेकांना माहिती नाही. इथेनॉलमिश्रित पेट्रोल दुचाकी, चारचाकीमध्ये भरल्यानंतर दिवसाआड गाडी बंद पडण्याचे प्रकार समोर येत आहेत. पेट्रोल टँकमध्ये पाणी निघत असल्यामुळेही हा भेसळीचा प्रकार असल्याचा संशय अनेकांना आहे. याबाबत तक्रारीही वाढत आहेत. मात्र, या तक्रारींची दखल कोणीही घेत नाही. पेट्रोलमध्ये मिसळल्या जाणाºया इथेनॉलची शुद्धताही तपासली जाते की नाही, याबाबतही संशय आहे.

इथेनॉलचे प्रमाण वाढले पण किमती तशाच

नगरमधील प्रत्येक पेट्रोलपंपावर येणा-या पेट्रोलमध्ये १० टक्के इथेनॉल मनमाड येथील टर्मिनलमध्ये मिक्स केले जाते. तेथून ते सर्वत्र वितरीत होते. इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढले आहे़ सुरुवातीला इथेनॉलचा दर २७ रुपये प्रतिलिटर ठरविण्यात आला होता. तो आता ४२ रुपये लिटर करण्यात आला आहे. ते ८० रुपये प्रति लिटर पेट्रोलमध्ये मिश्रित करून विकले जात आहे. १ लिटर पेट्रोलमध्ये १०० एमएल इथेनॉल मिश्रित केले जाते. त्यामुळे पेट्रोलचा दर किमान चार रुपयांनी कमी होणे अपेक्षित होते. मात्र, इथेनॉल मिश्रित पेट्रोल मूळ पेट्रोलच्या किमतीतच विकले जात आहे. त्यामुळे हा वरचा नफा कोणाच्या खिशात जातो, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

इंजिन बिघाडाचा आणि अपघाताचा धोका

इथेनॉलमिश्रित पेट्रोल वाहनात भरले जात आहे. त्यामुळे वाहने अचानक गुडगुड करुन बंद पडत आहेत. महामार्गावर भरधाव वेगाने वाहन असताना अचानक जर ते बंद पडले तर अपघाताचा धोका संभवतो. त्याशिवाय कार्बोरेटर आणि इंजिन खराब होण्याचा धोकाही आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलच मिश्रित केले जाते की अन्य काही याबाबत संशय बळावला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPetrolपेट्रोल