शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
4
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
5
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
6
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
7
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
8
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
9
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
10
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
11
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
12
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
13
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
14
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
15
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
16
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
17
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
18
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
19
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
20
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...

'तो' मदतीची याचना करत होता अन् लोकांची द्राक्षे पळवण्यासाठी झुंबड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 13:00 IST

शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोळगावहून नाशिकच्या दिशेने सुमारे दहा टन द्राक्षे घेऊन जात असलेला ट्रक महामार्गावर पलटी झाला.

ठळक मुद्देशुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोळगावहून नाशिकच्या दिशेने सुमारे दहा टन द्राक्षे घेऊन जात असलेला ट्रक महामार्गावर पलटी झाला. अपघातानंतर चालकाला मदत करण्याऐवजी लोकांची द्राक्षे पळवण्यासाठी एकच झुंबड उडाली. कार थांबवून लोकांनी द्राक्षांचे कॅरेटचे कॅरेट भरून नेले. यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

सोमेश शिंदे

अहमदनगर - अपघात झाला की अपघातग्रस्तांना मदत करायचे सोडून त्यांच्या वस्तू पळवणे, चोरी करणे यासारख्या घटनांमुळे माणुसकी आता नावापुरतीच उरली आहे. नगर-दौंड महामार्गावरील अपघातावेळी याचा प्रत्यय आला. चालक, मदतीची याचना करत असतानाही रस्त्यावरील हावराटांनी द्राक्षांचा ट्रक लुटल्याची घटना समोर आली आहे. 

शुक्रवारी (१ फेब्रुवारी) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोळगावहून नाशिकच्या दिशेने सुमारे दहा टन द्राक्षे घेऊन जात असलेला ट्रक (क्रमांक यु.पी ७२, टी ७१३५ ) महामार्गावर पलटी झाला. अपघातानंतर चालकाला मदत करण्याऐवजी लोकांची द्राक्षे पळवण्यासाठी एकच झुंबड उडाली. माणुसकीचा कुठलाही लवलेश न ठेवता पलटलेल्या ट्रकवर जनतेने अक्षरश: उडी घेतली. हातात मावेल तेवढी द्राक्षे लोकांनी पळवली. लोकांचा जमाव पाहता ट्रक चालकाने हाता पाया-पडत जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या विनवणीचा लोकांवर कुठलाच परिणाम होत नव्हता.

विशेष म्हणजे काही लोकांनी पोत्यांमध्ये भरून तर काहींनी स्वत:च्या अंगातील शर्ट काढून त्यात द्राक्षे भरून नेली. काही लोक गाड्या द्राक्षे पळवण्यासाठी थांबत होते. रस्त्यावरून जाताना कार थांबवून लोकांनी द्राक्षांचे कॅरेटचे कॅरेट भरून नेले. यामुळे या परिसरातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. ट्रकच्या रांगा त्यात द्राक्षे लुटण्यासाठी झालेली झुंबड यामुळे वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला होता. नागरिकांनी माणुसकी शून्य भावनेचे दाखविलेले दर्शन लक्षात घेता माणसातील विकृती किती वाढली आहे याचाच हा प्रत्यय म्हणावा लागेल.

द्राक्षांचा सीझन नुकताच सुरू झाला आहे. पाऊस कमी पडल्याने द्राक्षांचे भाव ७० ते ८० रुपये प्रतिकिलो असून चांगल्या प्रतिचे द्राक्षे १०० रुपये किलोने विकले जात आहेत. मात्र नगर दौंड महामार्गावरून प्रवास करणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील चिखली परिसरातील लोकांना फुकट द्राक्षे खाण्याची आयतीच संधी मिळाली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAccidentअपघात