शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
2
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
4
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
5
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
6
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
7
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
8
कोकोने पटकावले पहिले फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम
9
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
10
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
11
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
12
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
13
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
14
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
15
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
16
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
17
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
18
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
19
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
20
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!

आठ दिवसांत नुकसान भरपाई द्या, अन्यथा मुंबईत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:25 IST

शेवगाव : तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आठ दिवसांत भरपाईची रक्कम द्यावी, अन्यथा ३ मार्चला अनुदानापासून वंचित राहिलेल्या ...

शेवगाव : तालुक्यातील अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आठ दिवसांत भरपाईची रक्कम द्यावी, अन्यथा ३ मार्चला अनुदानापासून वंचित राहिलेल्या गावातील शेतकऱ्यांसह कोविड आजाराच्या संदर्भातील नियम पाळून ग्रामविकासमंत्री यांच्या मुंबई येथील शासकीय निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करू, असा इशारा जनशक्ती विकास आघाडीने दिला आहे.

जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे यांनी शनिवारी पालकमंत्री, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन पाठविले आहे..? यंदावर्षी अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान शेवगाव तालुक्यातील पिकांचे झाले आहे..? त्या अनुषंगाने पालकमंत्री या नात्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पीकपाहणी करण्यासाठी शेवगाव तालुक्याची निवड आपण केली होती. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवून शेतकरीबांधवांची दिवाळी गोड करू. मात्र, तालुक्यातील चाळीसहून अधिक गावांतील शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी तर आपण गोड करू शकला नाहीत, पण आता होळीचा सण तरी गोड करा. पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ५२ गावांना अनुदान प्राप्त झालेले असून उर्वरित गावांसाठी अनुदानाची रक्कम जानेवारी महिन्यात तालुक्याला प्राप्त झाली. ही रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आली नाही. प्रशासन कशाच्या प्रतीक्षेत आहे..? शेतकऱ्यांना का वेठीस धरले जात आहे, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे..