शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
2
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
3
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
4
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
5
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
6
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
7
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
8
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
9
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
10
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
11
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
12
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
13
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
14
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
15
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
16
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
17
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
18
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता
19
फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार
20
Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

तापाचे रुग्ण वाढले

By admin | Updated: September 19, 2014 23:40 IST

बदलत्या वातावरणाचा परिणाम नगरकरांच्या आरोग्यावर झालेला दिसून आला आहे.

अहमदनगर : आॅगस्ट महिन्यात गणपतीच्या आगमनापासून नगरमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली होती. सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस कमी झाला. मात्र अशा बदलत्या वातावरणाचा परिणाम नगरकरांच्या आरोग्यावर झालेला दिसून आला आहे. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नगर जिल्ह्यात ताप, सर्दी खोकल्याचे तापाचे २ हजार रुग्ण आढळून आले आहेत. ४ हजार २१४ रुग्ण सर्दी, खोकल्याने परेशान आहेत. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सर्दी, खोकल्याचे ३ हजार ९३७ रुग्ण आढळले होते. आतापर्यंत सप्टेंबरच्या दोन आठवड्यांत मिळून ४ हजार २१४ रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहरात गत महिन्यात कावीळची साथ पसरली. त्यानंतर मलेरियाही पसरला. कावीळचे गत आठवड्यात दररोज ५० च्यावर रुग्ण आढळून येत. आता त्यात घट झाली असून ही संख्या १५ वर येऊन पोहचली आहे. कावीळला आळा घालण्याठी महापालिकेने घरोघरी जाऊन सर्व्हे केला. आतापर्यंत ६० हजार घरांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. याशिवाय हॉटेलमधील पाण्याचीही तपासणी करण्यात आली. तीनशे हॉटेलच्या तपासणीअंती जवळपास १०० हॉटेलमधील पाणी पिण्यास दूषित असल्याचे समोर आले. महापालिकेचा फिरता दवाखाना व रिक्षा, पोस्टर्सद्वारे जनजागृती मोहीम हाती घेण्यात आल्याने आजाराची साथ आटोक्यात येत असल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे. रुग्णांची संख्या कमी झाल्याने त्यात काही अंशी तथ्यही दिसून येते. सर्दी, खोकल्यासोबतच डेंग्यूनेही शहरात शिरकाव केला आहे. गत महिन्यात ८४ डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. या आठवड्यात फक्त ७ डेंग्यूचे रुग्ण आढळले. (प्रतिनिधी)