शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

नोकरी गेल्यानं रडला नाही, तर लढला; भेंडीची शेती करून कुटुंबाचा आधार ठरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 14:06 IST

इलेक्ट्रिशियनचा कोर्स केल्यानंतर मागील १० वर्षांपासून औरंगाबाद येथे एका कंपनीत शेळके नोकरीस होता. लॉकडाऊनच्या गर्तेत कंपनी बंद झाली. चांगल्या पगाराची नोकरी बंद असल्याने शहरात राहणे परवडणारे नव्हते.

ठळक मुद्देइलेक्ट्रिशियनचा कोर्स केल्यानंतर मागील १० वर्षांपासून औरंगाबाद येथे एका कंपनीत शेळके नोकरीस होता. लॉकडाऊनच्या गर्तेत कंपनी बंद झाली. चांगल्या पगाराची नोकरी बंद असल्याने शहरात राहणे परवडणारे नव्हते

अहमदनगर/ दहिगावने : कोरोना महामारीमुळे देशात आणि राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे अनेक तरुणांना आपली नोकरी गमवावी लागली. शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील एका तरुणाचीही यात नोकरी गेली. त्यामुळे बेरोजगारीवर मात करण्यासाठी गावाकडे येऊन या तरुणाने भाजीपाल्याच्या शेतीचा प्रयोग करत बेरोजगारीवर मात केली. रावसाहेब साहेबराव शेळके, असे या तरुणाचे नाव आहे. भावीनिमगाव (ता. शेवगाव) येथे शेळके याने एक एकरावर कोथिंबीर, पाऊण एकरावर भेंडी लावली आहे. सध्या भेंडीला चांगला भाव मिळत असल्याने शेळके याचा भाजीपाला शेतीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

इलेक्ट्रिशियनचा कोर्स केल्यानंतर मागील १० वर्षांपासून औरंगाबाद येथे एका कंपनीत शेळके नोकरीस होता. लॉकडाऊनच्या गर्तेत कंपनी बंद झाली. चांगल्या पगाराची नोकरी बंद असल्याने शहरात राहणे परवडणारे नव्हते. त्यामुळे पत्नी आणि दोन मुलींसह गावाकडे येऊन त्याने वडिलोपार्जित जमिनीत भाजीपाल्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. रावसाहेब याचा चुलत लहान भाऊ देवीदासच्या सहकार्याने २६ मार्च २०२० रोजी भेंडीची पाऊण एकरावर लागवड केली. पिकाची चांगली काळजी घेतली. १५ हजार रुपये उत्पादन खर्चात लागवडीनंतर ४५ दिवसांनी पहिल्या तोड्याला २५ किलो, दुसऱ्या तोड्याला ६० किलो भेंडीचे उत्पन्न मिळाले, तर सध्या भेंडीचा तिसरा तोडा सुरू असून, दोन दिवसांना १०० किलो भेंडी मिळत आहे.

अहमदनगर येथे व्यापाऱ्यांना हा माल विकून ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो दर हातात पडत आहे. भेंडीतून सुमारे एक ते दीड लाखाचे उत्पन्न मिळेल, असा रावसाहेब याला विश्वास आहे. शिवाय कोथिंबिरीतूनही भरघोस उत्पनाची अपेक्षा आहे. रावसाहेब यांनी नोकरी गेल्यामुळे हातावर हात न धरता प्रयोगशील कृती केली अन् यशस्वीतेच उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवलंय.  

शेतकरी मोठ्या कष्टाने, विपरीत वातावरणातही भरघोस उत्पन्न घेतात. मात्र, मार्केटिंग आणि विक्री करताना मागे पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक मार्केटिंगचे ज्ञान अद्ययावत करायला हवे. सध्याच्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसला आहे.

-रावसाहेब शेळके, भावीनिमगाव

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरी