शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

नोकरी गेल्यानं रडला नाही, तर लढला; भेंडीची शेती करून कुटुंबाचा आधार ठरला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 14:06 IST

इलेक्ट्रिशियनचा कोर्स केल्यानंतर मागील १० वर्षांपासून औरंगाबाद येथे एका कंपनीत शेळके नोकरीस होता. लॉकडाऊनच्या गर्तेत कंपनी बंद झाली. चांगल्या पगाराची नोकरी बंद असल्याने शहरात राहणे परवडणारे नव्हते.

ठळक मुद्देइलेक्ट्रिशियनचा कोर्स केल्यानंतर मागील १० वर्षांपासून औरंगाबाद येथे एका कंपनीत शेळके नोकरीस होता. लॉकडाऊनच्या गर्तेत कंपनी बंद झाली. चांगल्या पगाराची नोकरी बंद असल्याने शहरात राहणे परवडणारे नव्हते

अहमदनगर/ दहिगावने : कोरोना महामारीमुळे देशात आणि राज्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आले. त्यामुळे अनेक तरुणांना आपली नोकरी गमवावी लागली. शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथील एका तरुणाचीही यात नोकरी गेली. त्यामुळे बेरोजगारीवर मात करण्यासाठी गावाकडे येऊन या तरुणाने भाजीपाल्याच्या शेतीचा प्रयोग करत बेरोजगारीवर मात केली. रावसाहेब साहेबराव शेळके, असे या तरुणाचे नाव आहे. भावीनिमगाव (ता. शेवगाव) येथे शेळके याने एक एकरावर कोथिंबीर, पाऊण एकरावर भेंडी लावली आहे. सध्या भेंडीला चांगला भाव मिळत असल्याने शेळके याचा भाजीपाला शेतीचा प्रयोग यशस्वी ठरला आहे.

इलेक्ट्रिशियनचा कोर्स केल्यानंतर मागील १० वर्षांपासून औरंगाबाद येथे एका कंपनीत शेळके नोकरीस होता. लॉकडाऊनच्या गर्तेत कंपनी बंद झाली. चांगल्या पगाराची नोकरी बंद असल्याने शहरात राहणे परवडणारे नव्हते. त्यामुळे पत्नी आणि दोन मुलींसह गावाकडे येऊन त्याने वडिलोपार्जित जमिनीत भाजीपाल्याची शेती करण्याचा निर्णय घेतला. रावसाहेब याचा चुलत लहान भाऊ देवीदासच्या सहकार्याने २६ मार्च २०२० रोजी भेंडीची पाऊण एकरावर लागवड केली. पिकाची चांगली काळजी घेतली. १५ हजार रुपये उत्पादन खर्चात लागवडीनंतर ४५ दिवसांनी पहिल्या तोड्याला २५ किलो, दुसऱ्या तोड्याला ६० किलो भेंडीचे उत्पन्न मिळाले, तर सध्या भेंडीचा तिसरा तोडा सुरू असून, दोन दिवसांना १०० किलो भेंडी मिळत आहे.

अहमदनगर येथे व्यापाऱ्यांना हा माल विकून ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो दर हातात पडत आहे. भेंडीतून सुमारे एक ते दीड लाखाचे उत्पन्न मिळेल, असा रावसाहेब याला विश्वास आहे. शिवाय कोथिंबिरीतूनही भरघोस उत्पनाची अपेक्षा आहे. रावसाहेब यांनी नोकरी गेल्यामुळे हातावर हात न धरता प्रयोगशील कृती केली अन् यशस्वीतेच उदाहरण आपल्या सर्वांसमोर ठेवलंय.  

शेतकरी मोठ्या कष्टाने, विपरीत वातावरणातही भरघोस उत्पन्न घेतात. मात्र, मार्केटिंग आणि विक्री करताना मागे पडतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक मार्केटिंगचे ज्ञान अद्ययावत करायला हवे. सध्याच्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका शेती व्यवसायाला बसला आहे.

-रावसाहेब शेळके, भावीनिमगाव

टॅग्स :FarmerशेतकरीAhmednagarअहमदनगरcorona virusकोरोना वायरस बातम्याjobनोकरी