शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

सेंद्रिय पध्दतीने टरबूजातून लखपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 12:28 IST

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रामहरी ढेरे या शेतकऱ्याने सेंद्रिय पध्दतीने १५ गुंठ्यात मिरची पिकात टरबूज आंतरपीक घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

संतोष थोरात

जामखेड तालुक्यातील खर्डा येथील रामहरी ढेरे या शेतकऱ्याने सेंद्रिय पध्दतीने १५ गुंठ्यात मिरची पिकात टरबूज आंतरपीक घेऊन लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.सेंद्रिय शेती करून मिरची पिकात टरबुजाचे आंतरपीक घेऊन खर्च वजा जाता पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. मल्चिंग पद्धतीने ठिबकद्वारे मिरचीची रोपे लावून लागवड केली. परंतु मिरची फळ लागवड सुरु झाली की, जमिनीवर लगडलेली झुमके लोंबकळतात. जमिनीचा संपर्क आल्यावर ते खराब होऊन बाजारात विक्रीसाठी कमी दराने विकावे लागतात. यात शेतकºयांना नुकसान सहन करावे लागते. हे नुकसान टाळण्यासाठी प्रयोगशील रामहरी ढेरे व पत्नी वनिता ढेरे यांनी मिरची पिकात टरबूज पिकाची लागवड केली.मशागतीची तयारी म्हणून दहा हजारांचे शेणखत टाकून मशागत केली. पाटसांगवी जिल्हा उस्मानाबाद येथून तीन हजारात बाराशे मिरची रोपे आणली. त्यातच तीन हजारांचे टरबूज रोपे लागवड केली. ९० टक्के सेंद्रिय पद्धतीने १० टक्के रासायनिक खते टाकली. फवारणी औषधे वापर करून लागवड केलेल्या टरबुजाचे दहा टन उत्पादन काढून ४० दिवसात टरबूज पिकातून एक लाख आठ हजार रुपये तर मिरचीचे ४ टन पिकातून एक लाख दहा हजार एवढे उत्पादन काढले. ४५ हजार रुपयांच्या उत्पादन खर्चातून जवळपास पावणेदोन लाख रुपयांचे उत्पन्न आंतरपिकात दुहेरी पीक घेऊन मोठे ढेरे यांनी मिळविले आहे.शेती पीक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतले तर चांगले उत्पादन कमी जमिनीत मिळवता येते. जवळ बाजारपेठ उपलब्ध नसल्यामुळे मुंबई येथील बाजारात विक्रीसाठी घेऊन जावे लागते. त्यामुळे वाहतूक खर्च वाढत असल्याने त्याचा उत्पादन वाढीवर परिणाम होतो, असे ढेरे यांनी सांगितले.

 

 

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड