शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

मुळा धरणातून बीडला पाणी देण्यास विरोध; प्रसाद शुगर याचिका करणार दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 16:19 IST

मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यामुळे येथील शेती व शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून अद्यापही शेतकरी सावरलेला नाही. आता बीडला पाणी देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान दोन दिवसात प्रसाद शुगर कारखान्याच्या वतीने बीडला पाणी देण्यास विरोध करणारी स्वतंत्र याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली जाणार आहे.

अहमदनगर : मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यामुळे येथील शेती व शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून अद्यापही शेतकरी सावरलेला नाही. आता बीडला पाणी देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान दोन दिवसात प्रसाद शुगर कारखान्याच्या वतीने बीडला पाणी देण्यास विरोध करणारी स्वतंत्र याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली जाणार आहे.राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील शेतकºयांना मुळा धरण हे संजीवनी देणारे ठरलेले आहे. मात्र, समन्यायी पाणी वाटप कायद्याव्दारे मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला द्यावे लागले आहे. एकीकडे मराठवाड्यातील राजकीय नेते धरणावर बॉम्ब टाकण्याची भाषा करीत असताना लोकप्रतिनिधींनी रातोरात या कायद्यावर सह्या केल्या. एकेकाळी सुजलाम सुफलाम असणारा राहुरी तालुका आज वाळवंट होऊ पहात आहे. शाश्वत पाणी नसल्यामुळे येथील ऊस शेती कमी होवून साखर कारखानदारीही संकटात सापडली आहे. मुळा धरणातून बीडला पाणी नेण्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातून मुळा धरण ते बीड या प्रस्तावित वॉटर ग्रीड योजनेचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. हा प्रस्ताव मुंबई येथील संबधित विभागाकडे विचाराधीन असल्याचीही माहिती मिळत आहे. याबाबत कुणकुण लागताच राहुरीतील शेतकरी संतापाने पेटून उठला आहे. मुळा धरणात जमिनी आमच्या, धरणासाठी त्याग आमचा आणि पाणी मराठवाडा अन् बीडला द्यायचे हा कोणता न्याय आहे. याप्रश्नी शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. शेतक-यांच्या भावना लक्षात घेता प्रसाद शुगर कारखान्यानेही आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून बीडला मुळा धरणातून पाणी द्यायचे नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधली आहे. असे प्रसाद शुगरचे कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात