शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरणातून बीडला पाणी देण्यास विरोध; प्रसाद शुगर याचिका करणार दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 16:19 IST

मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यामुळे येथील शेती व शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून अद्यापही शेतकरी सावरलेला नाही. आता बीडला पाणी देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान दोन दिवसात प्रसाद शुगर कारखान्याच्या वतीने बीडला पाणी देण्यास विरोध करणारी स्वतंत्र याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली जाणार आहे.

अहमदनगर : मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यामुळे येथील शेती व शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून अद्यापही शेतकरी सावरलेला नाही. आता बीडला पाणी देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान दोन दिवसात प्रसाद शुगर कारखान्याच्या वतीने बीडला पाणी देण्यास विरोध करणारी स्वतंत्र याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली जाणार आहे.राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील शेतकºयांना मुळा धरण हे संजीवनी देणारे ठरलेले आहे. मात्र, समन्यायी पाणी वाटप कायद्याव्दारे मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला द्यावे लागले आहे. एकीकडे मराठवाड्यातील राजकीय नेते धरणावर बॉम्ब टाकण्याची भाषा करीत असताना लोकप्रतिनिधींनी रातोरात या कायद्यावर सह्या केल्या. एकेकाळी सुजलाम सुफलाम असणारा राहुरी तालुका आज वाळवंट होऊ पहात आहे. शाश्वत पाणी नसल्यामुळे येथील ऊस शेती कमी होवून साखर कारखानदारीही संकटात सापडली आहे. मुळा धरणातून बीडला पाणी नेण्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातून मुळा धरण ते बीड या प्रस्तावित वॉटर ग्रीड योजनेचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. हा प्रस्ताव मुंबई येथील संबधित विभागाकडे विचाराधीन असल्याचीही माहिती मिळत आहे. याबाबत कुणकुण लागताच राहुरीतील शेतकरी संतापाने पेटून उठला आहे. मुळा धरणात जमिनी आमच्या, धरणासाठी त्याग आमचा आणि पाणी मराठवाडा अन् बीडला द्यायचे हा कोणता न्याय आहे. याप्रश्नी शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. शेतक-यांच्या भावना लक्षात घेता प्रसाद शुगर कारखान्यानेही आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून बीडला मुळा धरणातून पाणी द्यायचे नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधली आहे. असे प्रसाद शुगरचे कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात