शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

मुळा धरणातून बीडला पाणी देण्यास विरोध; प्रसाद शुगर याचिका करणार दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2019 16:19 IST

मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यामुळे येथील शेती व शेतकºयांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून अद्यापही शेतकरी सावरलेला नाही. आता बीडला पाणी देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान दोन दिवसात प्रसाद शुगर कारखान्याच्या वतीने बीडला पाणी देण्यास विरोध करणारी स्वतंत्र याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली जाणार आहे.

अहमदनगर : मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला दिल्यामुळे येथील शेती व शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यातून अद्यापही शेतकरी सावरलेला नाही. आता बीडला पाणी देण्यासाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान दोन दिवसात प्रसाद शुगर कारखान्याच्या वतीने बीडला पाणी देण्यास विरोध करणारी स्वतंत्र याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली जाणार आहे.राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी आणि नगर तालुक्यातील शेतकºयांना मुळा धरण हे संजीवनी देणारे ठरलेले आहे. मात्र, समन्यायी पाणी वाटप कायद्याव्दारे मुळा धरणातील हक्काचे पाणी जायकवाडीला द्यावे लागले आहे. एकीकडे मराठवाड्यातील राजकीय नेते धरणावर बॉम्ब टाकण्याची भाषा करीत असताना लोकप्रतिनिधींनी रातोरात या कायद्यावर सह्या केल्या. एकेकाळी सुजलाम सुफलाम असणारा राहुरी तालुका आज वाळवंट होऊ पहात आहे. शाश्वत पाणी नसल्यामुळे येथील ऊस शेती कमी होवून साखर कारखानदारीही संकटात सापडली आहे. मुळा धरणातून बीडला पाणी नेण्यासाठी औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातून मुळा धरण ते बीड या प्रस्तावित वॉटर ग्रीड योजनेचा प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. हा प्रस्ताव मुंबई येथील संबधित विभागाकडे विचाराधीन असल्याचीही माहिती मिळत आहे. याबाबत कुणकुण लागताच राहुरीतील शेतकरी संतापाने पेटून उठला आहे. मुळा धरणात जमिनी आमच्या, धरणासाठी त्याग आमचा आणि पाणी मराठवाडा अन् बीडला द्यायचे हा कोणता न्याय आहे. याप्रश्नी शेतकरी आता रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे. शेतक-यांच्या भावना लक्षात घेता प्रसाद शुगर कारखान्यानेही आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून बीडला मुळा धरणातून पाणी द्यायचे नाही, अशी खूणगाठ मनाशी बांधली आहे. असे प्रसाद शुगरचे कार्यकारी संचालक सुशिलकुमार देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीकपात