शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
7
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
8
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
9
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
10
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
11
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
12
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
13
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
14
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
15
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
16
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
17
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
18
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
19
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
20
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!

देशात विरोधकांचा गळा दाबला जातोय, भाजपविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरणार - बाळासाहेब थोरात 

By साहेबराव नरसाळे | Updated: March 31, 2023 19:51 IST

देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस येत्या काळात लोकशाही जिवंत राहण्यासाठी व लोकांच्या विविध प्रश्नांवर भाजप सरकारविरोधात आता थेट रस्त्यावर उतरणार आहे, अशी माहिती माजी महसूलमंत्री व आमदार बाळासाहेब थाेरात यांनी दिली.

अहमदनगर : भाजप सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज दाबला जातोय. काँग्रेस नेते व खासदार राहूल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या देशात आज बोलण्याचीही मुभा राहिलेली नाही. देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस येत्या काळात लोकशाही जिवंत राहण्यासाठी व लोकांच्या विविध प्रश्नांवर भाजप सरकारविरोधात आता थेट रस्त्यावर उतरणार आहे, अशी माहिती माजी महसूलमंत्री व आमदार बाळासाहेब थाेरात यांनी दिली.

  येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत थोरात बोलत होते. यावेळी आमदार लहू कानडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले, राहूल गांधी यांनी भाजपविरोधात आवाज उठविला होता. मात्र, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न भाजप सरकाने केला आहे. ईडीसारख्या संस्था विरोधकांच्या पाठिशी लावून भाजप सरकार लोकशाही संपवू पाहत आहे. राहूल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मोदींनी उत्तरे देण्याऐवजी गांधी यांच्यावरच कारवाई केली गेली आहे. देशात महागाई, बेरोजगारी असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर काँग्रेस रस्त्यावर उतरणार आहे. २ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेसची महासभा होणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रामनवमीच्या आदल्या दिवशी घडलेली घटना निंदनीय आहे. या घटनेची शासनाने जबाबदारी स्वीकारली पाहिजे. राज्यात शांतता कशी नांदेल, याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे, असेही थोरात म्हणाले. 

टॅग्स :congressकाँग्रेसBalasaheb Thoratबाळासाहेब थोरातBJPभाजपा