शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

शेतकरी कर्जमाफीसाठी आदिवासींचे ५०० कोटी देण्यास पिचडांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 20:35 IST

‘लोकमत’ने याबाबत मंगळवार ३१ आॅक्टोबरला ‘मागासवर्गीय, आदिवासींचा निधी कर्जमाफीसाठी वळविला’या मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पिचड यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे.

अहमदनगर : शेतकरी कर्जमाफीसाठी आदिवासी विभागाचे ५०० कोटी रूपये वळविण्यास माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आदिवासी विभागाचा निधी कर्जमाफीसाठी वळविण्याचा निर्णय रद्द करण्याची आग्रही मागणी केली आहे.‘लोकमत’ने याबाबत मंगळवार ३१ आॅक्टोबरला ‘मागासवर्गीय, आदिवासींचा निधी कर्जमाफीसाठी वळविला’या मथळ्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत पिचड यांनी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. राज्याच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पातून आदिवासी समाजास न्याय मिळत नाही. त्यामुळे आदिवासींची लोकसंख्या व क्षेत्रफळ याआधारे आदिवासींसाठी वेगळा ९ टक्के निधी टी. एस. पी. व ओ. टी. एस. पी. क्षेत्रासाठी राखीव ठेवला जातो. आतापर्यंत हा निधी इतरत्र वळविण्यात आला नाही. मात्रा आता कर्जमाफीसाठी ५०० कोटी रूपये निधी वळविण्यात आला आहे.राज्यातील किती आदिवासी शेतकरी कर्जबाजारी आहेत, याचा ठोस आकडा उपलब्ध नसताना राज्याच्या कर्जमाफीसाठी निधी गोळा करताना त्याची झळ आदिवासी लोकांना का लावण्यात आली. अजूनही आदिवासी क्षेत्रात दळणवळण, शिक्षण, आरोग्य, पोषण, शेती,रोजगार व सिंचन आदी सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात इतर क्षेत्रापेक्षा मोठा अनुशेष आहे. अजूनही आदिवासी व दुर्गम भागात कुपोषणाची व बालमृत्यूची समस्या आहे. त्याच्या निर्मूलनासाठी जादा निधीची गरज असताना त्यांच्या अर्थसंकल्पातून ५०० कोटी रुपये कर्जमाफीसाठी घेणे न्याय ठरणार नाही. त्यामुळे हा निर्णय त्वरित रद्द करावा,असेही या पत्रात पिचडांनी म्हटले आहे.

जिल्हास्तरावर ३० टक्के कपात

राज्यावरील कर्जभारामुळे जिल्हास्तरीय व प्रकल्प आदिवासी क्षेत्रातील विकासासाठी दिलेल्या निधीत ३० टक्के कपात केली आहे. त्यामुळे आदिवासी भागातील विकासाला खीळ बसणार आहे. या कपातीमुळे आदिवासी क्षेत्रात अनेक काम बंद होऊन आदिवासी व्यक्ती व सामूहिक विकासाला खीळ बसणार आहे. कपातीमुळे आदिवासी समाजावर मोठा अन्याय होत आहे. तसेच कर्जमाफीसाठी आदिवासी विभागाचे ५०० कोटी रूपये वर्ग केले आहेत. आदिवासी उपयोजनेतून असा अतिरिक्त निधी कर्जमाफीसाठी वळविला आहे. यामुळे आदिवासी समाजावर अन्याय आहे. त्यामुळे हे दोन्ही निर्णय त्वरित रद्द करावेत, अशी मागणी पिचड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMadhukar Pichadमधुकर पिचडFarmerशेतकरी