शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

केवळ आधार नोंदणीवरूनच्या संचमान्यतेस विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST

हा आदेश कोरोनाच्या अडचणीच्या काळात शिक्षक व विद्यार्थ्यावर अन्याय करणारा आहे. संचमान्यतेसाठी ग्राह्य धरणार नसतील तर शाळा व शिक्षकांनी ...

हा आदेश कोरोनाच्या अडचणीच्या काळात शिक्षक व विद्यार्थ्यावर अन्याय करणारा आहे. संचमान्यतेसाठी ग्राह्य धरणार नसतील तर शाळा व शिक्षकांनी आधार नसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारायचे का? आधार नसलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारणे किंवा तशी मुले शाळांनी पटावरून काढली तरी शिक्षण हक्क कायद्यात ते बसेल का? या पार्श्वभूमीवर पालकांची एकच धावपळ होत आहे. आधारमध्ये काना, मात्रा, वेलांटी अशी साधी चूक जाणवली तरी तो विद्यार्थी ऑनलाईनला दिसत नाही. पालकांचे स्थलांतर झालेले आहे. अनेक पालक आर्थिक अडचणीमध्ये आहेत. अशा अनेक प्रश्नांनी शिक्षक व पालक संभ्रमावस्थेमध्ये आहेत. शिक्षक

वर्गावर नेहमीच या ना त्या कारणाने अतिरिक्तची टांगती तलवार असते. अनेक शिक्षकांचे मानसिक संतुलन बिघडण्याचीसुद्धा शक्यता आहे, अशा कठीण परिस्थितीमध्ये या निर्णयाचा फेरविचार होणे गरजेचे आहे, अशी मागणी जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, मोहमंद समी शेख, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, योगेश हराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, जिल्हा माध्यमिकचे सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संजय तमनर, संभाजी चौधरी, नवनाथ घोरपडे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संजय भुसारी, सिकंदर शेख, रेवन घंगाळे, जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, महिला जिल्हा सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, रूपाली बोरूडे, रूपाली कुरूमकर आदींनी केली आहे.

--------------

‘निर्णय शिक्षकांवर लादू नये’

कोरोनामुळे आधार कार्ड मिळण्यास शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना खूप अडचणी आहेत. लॉकडाऊनमध्ये अनेक पालक स्थलांतरित झाले आहेत, अशा परिस्थितीत आधार लिंक असलेल्या विद्यार्थी संख्येवर संचमान्यता झाल्यास राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त होऊ शकतात. त्यामुळे शासनाने हा निर्णय कोरोना काळात आमच्यावर लादू नये, असे शिक्षक भारतीने म्हटले आहे.