शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

कांबळेंचा निर्णय अंतिम; विरोध करणा-यांना वाट मोकळी : राजेंद्र झावरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:54 IST

शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या बाबतीत घेतलेला निर्णय आपल्याला मान्य आहे, असे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी स्पष्ट केले

श्रीरामपूर : शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आमदार भाऊसाहेब कांबळे यांच्या बाबतीत घेतलेला निर्णय आपल्याला मान्य आहे, असे जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी स्पष्ट केले. राज्यात सत्ता स्थापनेच्या दृष्टीने सर्वत्र पक्ष प्रवेशाचे धोरण राबविले जात आहे. जे पदाधिकारी कांबळे यांच्या उमेदवारीवरून राजीनामे देण्याची भाषा करत आहेत त्यांना रस्ता मोकळा आहे, असेही झावरे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले.माजी आमदार कांबळे यांचा शिवसेनेतील प्रवेश व त्यांच्या उमेदवारीवरून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात वाद उफाळून आला आहे. सोमवारी उपजिल्हा प्रमुख राजेंद्र देवकर, ज्येष्ठ नेते अशोक थोरे, तालुकाप्रमुख दादासाहेब कोकणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी देवकर यांनी कांबळेंना उमेदवारी दिल्यास राजीनामा देण्याचा इशारा दिला होता. या सर्व घडामोडींमागे खासदार लोखंडे यांचीही साथ असल्याचे बोलले जात आहे.देवकर यांनी एवढ्यावरच न थांबता संघटनेला विश्वासात न घेता कांबळे यांना मातोश्रीवर घेऊन जाणा-या जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व शहर प्रमुख सचिन बडधे यांच्यावरही तोफ डागली होती. या दोघांवर कारवाईची मागणीही केली. दहा हजार सह्या घेऊन गुरुवारी कांबळे यांच्या पक्ष प्रवेशाच्या दिवशीच निवेदन देण्याचे जाहीर केले.या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख झावरे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला. झावरे यांच्यावर उत्तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव,श्रीरामपूर व नेवासे मतदारसंघाची जबाबदारी आहे.झावरे म्हणाले, कांबळे यांनी मातोश्रीवर भेट घेऊन काँग्रेसचा राजीनामा दिला त्या दिवशी मातोश्रीवरून आपल्याला संपर्क करण्यात आला होता. मात्र फोन बंद असल्यामुळे संपर्क होऊ शकला नाही. कांबळे यांना पक्षात घेण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांचा आहे. तो आम्हाला मानावाच लागेल. राज्य पातळीवरील पक्ष धोरणाचा हा भाग आहे.जे कोणी पदाधिकारी राजीनामे देण्याची भाषा करत आहेत त्यामुळे पक्षाला काहीही फरक पडत नाही. ते वेगळी वाट धरू शकतात. पक्षात आजवर अनेक लोक आले व बाहेर पडले. त्याने काहीही नुकसान झाले नाही. शिवसेनेत उद्धव ठाकरे यांचाच शब्द अंतिम असतो व तो सैैनिकांना मान्य असतो, असेही झावरे म्हणाले.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरNCPराष्ट्रवादी काँग्रेस