शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
3
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
4
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
5
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
6
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
7
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
8
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
9
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
10
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
11
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
12
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
13
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
14
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
15
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं
16
'बुर्का चलेगा तो घूंघट भी चलेगा...!', भाजप मंत्री कृष्णनंदन पासवान यांचं मोठं विधान; बिहारमध्ये राजकारण तापलं
17
सरन्यायाधीश बी.आर. गवई यांच्यावर वकिलाने वस्तू फेकली, सर्वोच्च न्यायालयात सुनावणीवेळी गोंधळ
18
फेस्टीव सीझनमध्ये ऑनलाईन खरेदी करताना सावधान! 'या' चुकांमुळे क्रेडिट स्कोअर होईल खराब
19
मोहम्मद सिराजने लावला 'पिंपल पॅच'? Gen Z ची लोकप्रिय स्किनकेअर हॅक, 'असं' होतं त्वचेचं संरक्षण
20
Gold Silver Price Today 6 October: सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले; एकाच दिवसात सोनं ₹२१०० पेक्षा अधिकनं वाढलं, चांदीत ४ हजारांची तेजी

मुळा धरण उरले केवळ पिण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 14:11 IST

मुळा धरणाचे पाणी शेतीसाठी मिळत नसल्याची ओरड करीत मुळा डाव्या कालव्याखालील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला़

भाऊसाहेब येवलेराहुरी : मुळा धरणाचे पाणी शेतीसाठी मिळत नसल्याची ओरड करीत मुळा डाव्या कालव्याखालील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला़ खरं म्हटलं तर मुळा धरणाची उभारणी शेतीसाठीच झालेली आहे़ काळाच्या ओघात शेतीसाठी बांधलेले मुळा धरण पिण्यासाठी व उद्योगासाठी उरले़ शेतीच्या पाण्याची कपात होत असल्याची जाणीव उशिराने शेतकऱ्यांना झाली आहे़मुळा धरणाचा उजवा कालवा निघाला़ डावा कालवा निघावा म्हणून डॉ़ बाबूराव दादा तनपुरे, का़ ल़ पवार, केशवराव हारदे आदींचे प्रयत्न सर्वश्रुत आहेत़ बी़ जे़ खताळ यांचे योगदानही पाटबंधारे खात्याचे मंत्री असताना महत्वाचे ठरले़ डावा कालवा निघाला नसता तर राहुरीचा उत्तर भाग उजाड राहिला असता़ डाव कालवा सुरू झाला़ लाभक्षेत्र सुजलाम सुफलाम झाले़ दोन्ही कालव्याचे पाणी ब्लॉकने घेण्याऐवजी शेतकºयांनी ब्लॅकने घेतले़ तत्कालीन आमदार प्रसाद तनपुरे यांनी ७ नंबरचा फॉर्म भरावा म्हणून शेतकºयांना अनेकदा विनवणी केली़ मात्र शेतकºयांनी त्याकडे दुर्लक्षकेले़ कागदोपत्री शेतीसाठीमुळा धरणातील पाण्याला मागणी नव्हती़२००५ मध्ये समन्याय पाणी वाटप झाले़ मध्यरात्री २ वाजता तत्कालीन लोकप्रतिनिधींनी सह्या केल्या़ मुळा धरणाच्या पाण्यात जायकवाडी वाटेकरी ठरला़ खरे तर सह्या करणाºया जिल्ह्यातील आमदारांना शेतकºयांनी जाब विचारायला हवा होता़ मात्र तसे धाडस कुणीही केले नाही़ जायकवाडीला जाणाºया पाण्यालाच शेतकºयांचा विरोध आहे़ मुळाचे पाणी बीडसह अनेक शहरांना भविष्यकाळात जाणार आहे़ त्यामुळे मुळा धरण भविष्यात केवळ पिण्यासाठी उरणार आहे़ भविष्यात थेंबभरही पाणी शेतीसाठी न मिळाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही़ त्यामुळे मुळाच्या दोन्ही कालव्याखालील क्षेत्र ओसाड पडण्याची भीती आहे़शेकडो वर्षात मुळा नदीच्या काठावरील शेती कधी नव्हे एवढी यंदा संकटात सापडली़ उसाचा पट्टा जिरायती होण्याच्या मार्गावर आहे़ बारामाही वाहणारी मुळा ओस पडली आहे़मुळा धरणाच्या पाण्यावरून भविष्यकाळात संघर्ष वाढण्याची भीती आहे़ त्यासाठी डाव्या कालव्याबरोबरच उजव्या कालव्याचे शेतकरीही संघर्षाच्या पावित्र्यात आहेत़ आगामी विधानसभा निवडणुकीतही पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत़तर हुलगे पेरण्याची वेळ येईलएकेकाळी नगर जिल्ह्याचे सरकारमध्ये वजन होते़ अलीकडील काळात मात्र जिल्ह्यातील नेत्यांची ताकद क्षीण झाली आहे़ जिल्ह्याचे पाणी बाहेर जात असताना पक्ष बाजूला ठेवून नेत्यांनी शासनावर दबाव आणण्याची गरज आहे़ अन्यथा उसाच्या पट्ट्यात हुलगे पेरण्याची वेळ शेतकºयांवर येण्याचे दिवस लांब नाहीत़ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणात पाण्याची आवक सुरू नाही़ पिण्यासाठी केवळ २२५ दलघफू पाणी शिल्लक आहे़ उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले असून पाण्यासाठी एकीची गरज आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर