शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुळा धरण उरले केवळ पिण्यासाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 14:11 IST

मुळा धरणाचे पाणी शेतीसाठी मिळत नसल्याची ओरड करीत मुळा डाव्या कालव्याखालील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला़

भाऊसाहेब येवलेराहुरी : मुळा धरणाचे पाणी शेतीसाठी मिळत नसल्याची ओरड करीत मुळा डाव्या कालव्याखालील शेतकऱ्यांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला़ खरं म्हटलं तर मुळा धरणाची उभारणी शेतीसाठीच झालेली आहे़ काळाच्या ओघात शेतीसाठी बांधलेले मुळा धरण पिण्यासाठी व उद्योगासाठी उरले़ शेतीच्या पाण्याची कपात होत असल्याची जाणीव उशिराने शेतकऱ्यांना झाली आहे़मुळा धरणाचा उजवा कालवा निघाला़ डावा कालवा निघावा म्हणून डॉ़ बाबूराव दादा तनपुरे, का़ ल़ पवार, केशवराव हारदे आदींचे प्रयत्न सर्वश्रुत आहेत़ बी़ जे़ खताळ यांचे योगदानही पाटबंधारे खात्याचे मंत्री असताना महत्वाचे ठरले़ डावा कालवा निघाला नसता तर राहुरीचा उत्तर भाग उजाड राहिला असता़ डाव कालवा सुरू झाला़ लाभक्षेत्र सुजलाम सुफलाम झाले़ दोन्ही कालव्याचे पाणी ब्लॉकने घेण्याऐवजी शेतकºयांनी ब्लॅकने घेतले़ तत्कालीन आमदार प्रसाद तनपुरे यांनी ७ नंबरचा फॉर्म भरावा म्हणून शेतकºयांना अनेकदा विनवणी केली़ मात्र शेतकºयांनी त्याकडे दुर्लक्षकेले़ कागदोपत्री शेतीसाठीमुळा धरणातील पाण्याला मागणी नव्हती़२००५ मध्ये समन्याय पाणी वाटप झाले़ मध्यरात्री २ वाजता तत्कालीन लोकप्रतिनिधींनी सह्या केल्या़ मुळा धरणाच्या पाण्यात जायकवाडी वाटेकरी ठरला़ खरे तर सह्या करणाºया जिल्ह्यातील आमदारांना शेतकºयांनी जाब विचारायला हवा होता़ मात्र तसे धाडस कुणीही केले नाही़ जायकवाडीला जाणाºया पाण्यालाच शेतकºयांचा विरोध आहे़ मुळाचे पाणी बीडसह अनेक शहरांना भविष्यकाळात जाणार आहे़ त्यामुळे मुळा धरण भविष्यात केवळ पिण्यासाठी उरणार आहे़ भविष्यात थेंबभरही पाणी शेतीसाठी न मिळाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही़ त्यामुळे मुळाच्या दोन्ही कालव्याखालील क्षेत्र ओसाड पडण्याची भीती आहे़शेकडो वर्षात मुळा नदीच्या काठावरील शेती कधी नव्हे एवढी यंदा संकटात सापडली़ उसाचा पट्टा जिरायती होण्याच्या मार्गावर आहे़ बारामाही वाहणारी मुळा ओस पडली आहे़मुळा धरणाच्या पाण्यावरून भविष्यकाळात संघर्ष वाढण्याची भीती आहे़ त्यासाठी डाव्या कालव्याबरोबरच उजव्या कालव्याचे शेतकरीही संघर्षाच्या पावित्र्यात आहेत़ आगामी विधानसभा निवडणुकीतही पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत़तर हुलगे पेरण्याची वेळ येईलएकेकाळी नगर जिल्ह्याचे सरकारमध्ये वजन होते़ अलीकडील काळात मात्र जिल्ह्यातील नेत्यांची ताकद क्षीण झाली आहे़ जिल्ह्याचे पाणी बाहेर जात असताना पक्ष बाजूला ठेवून नेत्यांनी शासनावर दबाव आणण्याची गरज आहे़ अन्यथा उसाच्या पट्ट्यात हुलगे पेरण्याची वेळ शेतकºयांवर येण्याचे दिवस लांब नाहीत़ जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात धरणात पाण्याची आवक सुरू नाही़ पिण्यासाठी केवळ २२५ दलघफू पाणी शिल्लक आहे़ उसाचे क्षेत्र निम्म्याने घटले असून पाण्यासाठी एकीची गरज आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर