शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

कांद्याचे भाव निम्म्याने घटले; पाडव्यानंतर पुन्हा भाव वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2020 11:14 IST

इतर देशांतून केलेली आयात, साठेबाजीवर घातलेल्या निर्बंधामुळे कांद्याचे भाव निम्म्याने घटले आहेत. कांदा १० हजारांहून पाच हजारांवर खाली आला असून, पाडव्यानंतर कांदा पुन्हा भाव खाईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

अण्णा नवथर

अहमदनगर : इतर देशांतून केलेली आयात, साठेबाजीवर घातलेल्या निर्बंधामुळे कांद्याचे भाव निम्म्याने घटले आहेत. कांदा १० हजारांहून पाच हजारांवर खाली आला असून, पाडव्यानंतर कांदा पुन्हा भाव खाईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

पावसामुळे लाल कांदा वाया गेला. त्यामुळे नवीन लाल कांदा विक्रीसाठी न आल्याने उन्हाळी कांदा मध्यंतरी प्रति क्विंटल दहा हजारांवर पोहाेचला होता. नगरसह नेवासा आणि शेवगाव बाजार समितीत आवक वाढूनही कांद्याला चांगला भाव मिळाला. कांद्याचे भाव आणखी वाढण्याची शक्यता होती. पुण्यात कांदा प्रति किलो १०० रुपयापर्यंत गेला होता. असे असतानाच दसऱ्याला अचानक कांद्याचे भाव पडले. कांद्याचे भाव निम्म्याने घटले. भाव वाढत असल्याने सरकारने कमी करण्यासाठी साठेबाजीवर निर्बंध आणले. त्यामुळे नाशिक येथील बाजारात लिलाव झाले नाहीत. त्याचा परिणाम नगरसह अन्य जिल्ह्यातील कांद्याच्या दरावर झाले.

सरकारने तुर्की व इजिप्तमधून कांदा आयात केला. मात्र आयात केलेल्या कांद्याला चव नसल्याने त्याला उठाव नाही. हा कांदा मुंबई व पुण्याच्या बाजारात दाखल झाला आहे. परंतु, ग्राहकांनी विदेशी कांद्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे कांदा आयात होऊन दर वाढत होते. त्यामुळे सरकारने कांद्याच्या साठेबाजीवर निर्बंध आणत २५ टनाहून अधिकचा साठा असलेल्या चाळींवर कारवाई केली. राज्यातील सर्वात मोठे नाशिक मार्केट यामुळे तीन दिवस बंद होते. सरकारच्या साठेबाजीच्या धोरणामुळे कांदा व्यापारी हवालदिल आहेत.

महाराष्ट्रासह अन्य राज्यातील कांदा मार्केट विस्कळीत झाल्याने त्याचा परिणाम दरावर होत आहेत. त्यात मध्यप्रदेशमधील कांद्याची आवक मध्यंतरी सुरू झाली होती. ती आता बंद झाली असून, कांद्याचे भाव पुन्हा वाढतील. परंतु, दिवाळी सण तोंडावर आल्याने कांद्याचे लिलावर काही दिवसांसाठी बंद राहतील. त्याचाही परिणाम कांदा लिलालावर होण्याची शक्यता असून, पाडव्यानंतरच खरेदी- विक्री सुरळीत होईल. त्यावेळी कांद्याला भाव मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लाल कांदा झाला खराब

जिल्ह्यातील शेवगाव आणि संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन लाल कांद्याची आवक काही प्रमाणात होऊ लागली आहे. परंतु, हा कांदा पावसामुळे खराब झाला असून, तो वाहतुकीसाठी योग्य नाही. त्यामुळे लाल कांद्याचे आवक होऊनही कांद्याचे भाव वाढतील, असा अंदाज आहे.

मागील आठवड्यातील कांद्याचे भाव

नगर- ५ ते ७ हजार

संगमनेर- ४५०० ते ५५००

शेवगाव- ४५०० ते ५०००

घोडेगाव- ४५०० ते ६५००

इतर देशातून कांदा आयात करण्यात आला. तसेच कांदा साठविण्यावर सरकारने बंदी घातल्याने नाशिकचे मार्केट बंद होते. त्यात मध्यप्रदेशाचाही कांदा आला होता. त्यामुळे कांद्याचे भाव पडले असून, मार्केट सुरळीत झाल्यानंतर भाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

-दिलीप ठोकळ, अध्यक्ष कांदा व्यापारी असोसिएशन, अहमदनगर

टॅग्स :AhmednagarअहमदनगरonionकांदाMarket Yardमार्केट यार्ड