शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

वृक्ष लागवडीसाठी दीड लाख खड्डे

By admin | Updated: June 24, 2016 01:14 IST

अहमदनगर : सरकारी यंत्रणांमार्फत साडेतीन लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, विविध यंत्रणांकडून दीड लाख खड्डे खोदले आहेत़

अहमदनगर : सरकारी यंत्रणांमार्फत साडेतीन लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, विविध यंत्रणांकडून दीड लाख खड्डे खोदले आहेत़ या खड्डयांत पुढील महिन्यात होणाऱ्या वृक्ष लागवड सप्ताहात रोपांची लागवड करण्यात येणार आहे़शहरासह जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहेत़ त्यामुळे सर्वांच्याच आशा पल्लवित झाल्या असून, सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे़ पाऊस पडताच जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्याचे नियोजन सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात आले आहे़ शासनाच्या कृषी, ग्रामविकास, नगरविकास, उद्योग, सहकार व पणन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, गृह विभाग, विधी व न्याय, महसूल, कृषी विद्यापीठ, देवस्थान, ऊर्जा, आदिवासी विकास विभाग, शिक्षण व क्रीडा, पशूसंवर्धन, जलसंधारण, केंद्र शासनाचे विभाग आणि अशासकीय संस्थांना जिल्ह्यातील २ लाख ३४ हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे़ मात्र विविध विभागांकडून आलेली मागणी यापेक्षा अधिक आहे़ शासकीय कार्यालयांनी सामाजिक वन विभागाकडे ३ लाख ६३ हजार ४१४ वृक्षांची मागणी केली आहे़ त्यापैकी १ लाख ६८ हजार ८३१ खड्डेही खोदून झाले आहेत़ उर्वरित १ लाख ९४ हजार खड्डे येत्या आठ दिवसांत खोदण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली़ जिल्ह्यात १४ लाख वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट होते़ त्यात दोन लाखांची वाढ झाली असून, शहरासह जिल्ह्यात १६ लाख वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे़ सरकारी कार्यालयांकडून मोठ्याप्रमाणात वृक्षांची मागणी करण्यात आली आहे़ त्याचबरोबर विविध सामाजिक संस्था, मित्रमंडळ, वृक्षप्रेमींनी वृक्ष लागवडीसाठी सरसावले आहेत़ (प्रतिनिधी)