शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंपांमागे ५ हजार रुपये भरण्याचे बंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:21 IST

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने व अंत्रे उपकेंद्रांतर्गत असलेल्या भावीनिमगाव, दहिगावने, मठाचीवाडी, रांजणी, घेवरी, शहरटाकळी, ढोरसडे-अंत्रे आदी गावांतील कृषी ...

दहिगावने : शेवगाव तालुक्यातील दहिगावने व अंत्रे उपकेंद्रांतर्गत असलेल्या भावीनिमगाव, दहिगावने, मठाचीवाडी, रांजणी, घेवरी, शहरटाकळी, ढोरसडे-अंत्रे आदी गावांतील कृषी पंपांचा वीजपुरवठा सोमवारी (दि.१५) थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी खंडित करण्यात आला होता. हा खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक झाली. कृषी पंपामागे पाच हजार रुपये भरावे लागतील, असा निर्णय बैठकीत झाला. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

दहिगावने येथे झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी एकरकमी वीजबिल रक्कम भरण्यास असमर्थता दर्शवत सवलत मिळावी, अशी मागणी अधिकाऱ्यांकडे केली. मात्र, कृषीपंप वीजधोरण २०२० योजनेनुसार वीज बिलात मिळणाऱ्या ५० टक्के सवलतीचा लाभ घ्यायचा असेल तर एकरकमी पैसे भरावेच लागतील, अशी भूमिका अधिकाऱ्यांनी सोडली नाही. त्यानंतर दीर्घकाळ चर्चा चालली. शेवटी प्रत्येक कृषीपंपामागे ५ हजार रुपये भरण्याचा निर्णय झाला. त्यानंतर खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत झाला असला तरी ५ हजार रुपये भरणारे शेतकरी कृषी पंप योजनेतून मिळणाऱ्या ५० टक्के सवलतीच्या लाभापासून वंचित राहणार आहेत असे होऊ नये, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

यावेळी भातकुडगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता पीयुष पाडवी, भावीनिमगाव सेवा संस्थेचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णी, सरपंच आबासाहेब काळे, सुभाष पवार, उपसरपंच संतोष चव्हाण, राजाभाऊ पाऊलबुद्धे, कचरू शेळके, लेखनिक अंकित जाधव, वरिष्ठ तंत्रज्ञ सुनील गुळमकर, विष्णू गुंजाळ, किरण चेडे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

---

कृषीपंप वीज धोरण २०२० योजनेनुसार थकीत वीजबिलात ५० टक्के सवलत मिळण्यासाठी ५० टक्के रक्कम भरणे बंधनकारक आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे शेतकरी ५० टक्के रक्कम भरण्यास तयार आहेत. मात्र प्रतिपंप ५ हजार रूपये भरणारे शेतकरी या योजनेच्या लाभापासून सध्यातरी वंचित राहतील.

पीयूष पाडवी,

सहाय्यक अभियंता, भातकुडगाव कक्ष

---

‘महावितरण’कडून सुरू असलेली थकीत वीज बिलाची वसुली शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीच्या काळात सुरू आहे, असे असले तरी सरासरी असलेल्या वीज बिलात सध्या शेतकऱ्यांनी ५ हजार रुपये जरी भरले तरी शासनाच्या सवलतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळायला हवा.

-संतोष चव्हाण,

उपसरपंच, भावीनिमगाव