शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
2
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
3
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
4
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
5
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
6
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
7
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
8
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
9
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
10
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
11
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
12
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
13
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
15
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
16
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
17
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
18
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
19
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
20
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा

हरकतींचे प्रमाण वाढले, शेवगाव नगरपरिषद निवडणूक लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:21 IST

शेवगाव : नगरपरिषद निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या हरकती, सूचनांवर काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असल्याने राज्य ...

शेवगाव : नगरपरिषद निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार यादीवर मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या हरकती, सूचनांवर काळजीपूर्वक निर्णय घेणे आवश्यक असल्याने राज्य निवडणूक आयोगाने अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्धीची तारीख अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली आहे. त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे.

राज्य निवडणूक आयोग केव्हा तारीख जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नगरपरिषदेची होऊ घातलेली निवडणूक निवडणूक आयोगाच्या पुढील आदेशापर्यंत लांबली आहे. सद्यस्थितीत कोरोनाचा वाढत चाललेला संसर्ग व पुढे पावसाचे चार महिने यामुळे निवडणुका लांबणार, असे दिसत आहे. निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून येथील एकवीस प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले होते. प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर आक्षेप, हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार १४ हजार ५८६ मतदारांनी हरकती नोंदवल्या होत्या. शहरातील २१ प्रभागातील ३१ हजार ४५० मतदारांपैकी जवळपास निम्म्या मतदारांनी हरकती घेतल्याने नगरपरिषद प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या प्रारुप मतदार याद्यांबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत.

दरम्यान, हरकतीची संख्या लक्षात घेता हातातील कामे बाजूला सारत अधिकाऱ्यांनी त्याचा निपटारा सुरू केला होता.

अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी व मतदान केंद्रांची प्रसिद्धी आगामी काही दिवसांत केली जाणार होती. या महिन्यात केव्हाही निवडणूक कार्यक्रम घोषित होऊ शकतो. या आशेवर एकवीस प्रभागातील सर्वच पक्ष, आघाड्या व अपक्ष याप्रमाणे दोनशेच्यावर उमेदवार मतदारसंघात फिरू लागले होते. मतदारांशी जनसंपर्क वाढला होता. विचारपूस वाढली होती. तर काहींनी दोन-दोन प्रभागांतून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती. मतदारांना प्रभावित करण्यासाठी विविध प्रयोग करण्यास सुरुवात झाली होती.

आगामी निवडणूक लढवायची, जिंकायची व नगरसेवक बनायचेच, असा चंग अनेक उमेदवारांनी बांधला होता. नगरसेवकानंतर अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापतीपदी बसण्याची स्वप्ने काहींना पडू लागली होती. मात्र, आता या निवडणुका लांबल्याने त्यांची स्वप्ने विखुरली आहेत.

--

नगर परिषदेवर प्रशासकराज..

निवडणूक लांबल्याने प्रशासकीय राजवट आणखी काही महिने तरी कायम राहणार आहे. गतकाळात काही निर्णय प्रतिनिधींच्या आगमनापर्यंत रोखून ठेवण्यात आले होते. त्या सर्वांना आता गती मिळण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यापासून पाणीटंचाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आठ-दहा दिवसांआड होणारा नळयोजनेचा पाणीपुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने वेगाने उपाययोजना कराव्या लागणार आहेत. मुख्य रस्त्यासह रस्त्यांंवरील अतिक्रमणे, स्वच्छतेबाबत शिस्त लावणे आदी कामांकडे प्रशासकांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा नागरिकांना आहे.