शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

भाजीपाल्याविना शिजतोय पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:30 IST

राज्य शिक्षण संचालनालयाने भाजीपाला व आहार शिजविण्यासाठी लागणाऱ्या गॅसचे पैसे थकविले आहेत.  त्यामुळे जिल्ह्यातील पाच लाख विद्यार्थ्यांचा पोषण आहार गेल्या सात महिन्यांपासून भाजीपाल्याविना शिजत आहे.

अण्णा नवथरअहमदनगर : राज्य शिक्षण संचालनालयाने भाजीपाला व आहार शिजविण्यासाठी लागणाऱ्या गॅसचे पैसे थकविले आहेत.  त्यामुळे जिल्ह्यातील पाच लाख विद्यार्थ्यांचा पोषण आहार गेल्या सात महिन्यांपासून भाजीपाल्याविना शिजत आहे. आहार शिजविणा-या मदतनीसांनाही पैसे मिळाले नसल्याने त्यांचीही परवड सुरू आहे.गोरगरिबांच्या मुलांना शाळेत पोटभर एकवेळचे जेवण मिळावे, यासाठी शासनाने शालेय पोषण आहार योजना सुरू केली़ कोट्यवधी रुपये खर्चून शाळेत आमटी, खिचडी शिजते़ अहमदनगर जिल्ह्यातील साडेचार हजार शाळांतील ५ लाख १७ हजार विद्यार्थ्यांसाठी रोज पोषण आहार शिजविला जातो. त्यासाठी तांदूळ, हरभरा दाळ, मटकींसह मीठ, मसाला हा कोरडा शिधा शासनाकडून मिळतो़ त्यात भाजीपाला घालून शाळेतील स्वयंपाकीण मुलांसाठी आमटी, भात खिचडी, असा पोषण आहार शिजवितात. गेल्या जानेवारीनंतर भाजीपाला व गॅसचे पैसेच शाळांना मिळालेले नाहीत. आॅनलाईन पैसे जमा करायचे आहेत, असे सांगून जिल्हा परिषदांना एप्रिलपासून पैसे देणे बंद केले गेले. त्यानंतर सात महिन्यांत आॅनलाईन पेमेंट किंवा आॅफलाईन या पैकी कोणत्याही पद्धतीने पैसे मिळाले नाहीत. तेंव्हापासून स्वयंपाकिण ताई चुलीवरच जसा मिळेल तसा पोषण आहार मुलांना खाऊ घालते आहे. पण त्यांचेही पैसे शिक्षण मंडळाने सात महिन्यांपासून दिलेले नाही. सहा महिन्यानंतर ११ सप्टेंबर रोजी मुख्याध्यापकांच्या खात्यावर १ रुपया टाकण्याचा प्रयोग शिक्षण संचालनालयाने केला़ परंतु, तोही यशस्वी झाला नाही. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद