शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ‘स्थिर’ - A - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:45 IST

अहमदनगर : जिल्ह्यात रोज १५ हजार चाचण्या होत आहेत. या चाचण्यांपैकी ७०० ते ८०० जण कोरोनाबाधित होत आहेत. गत ...

अहमदनगर : जिल्ह्यात रोज १५ हजार चाचण्या होत आहेत. या चाचण्यांपैकी ७०० ते ८०० जण कोरोनाबाधित होत आहेत. गत महिनाभरापासून हाच आकडा कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना वाढला किंवा कमी झाला असे नाही तर रुग्णांची संख्या स्थिर आहे. एखाद्या दिवशी बाधितांची संख्या कमी किंवा जास्त झाली तरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही सरासरी पाच हजार एवढीच आहे.

राज्यात पाच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये अहमदनगरसह पुणे, ठाणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर जिल्ह्यात सरासरी ७०० ते ८०० एवढी सरासरी दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या आहे. त्यामध्ये पारनेर, संगमनेर, कर्जत, श्रीगोंदा, अकोले या तालुक्यात रुग्णसंख्या स्थिरच आहे. संपर्क, संसर्ग, गर्दीचे कार्यक्रम होत असल्याने आणि नागरिक नियम पाळत नसल्याने रुग्णांची संख्या वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.

सोमवारी जिल्ह्यात ५५९४ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले, तर जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ८८७ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता पाच हजार ४३६ इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४०२, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २५४ आणि अँटिजन चाचणीत २३१ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये श्रीगोंदा व संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या शंभरच्या पुढे आढळून आली.

--------------

सक्रिय रुग्णांमध्ये अहमदनगर चौथे

पुणे- १३,५०३

ठाणे- ७२८३

सातारा- ५५१५

अहमदनगर- ५१६८

सोलापूर- ४२२४

सांगली- ४७१२

-------------

संगमनेरमध्ये आधीपासूनच रुग्णांची संख्या सर्वाधिक राहिलेली आहे. पारनेर तालुक्यात दोन-तीन महिन्यांपासून शंभरपुढे रुग्णसंख्या आहे. एखाद्या ठिकाणी आधीपासूनच रुग्णसंख्या जास्त असेल तर तिथे बाधित होण्याचे प्रमाण तेवढेच राहते. चाचण्यांपैकी बाधित होणाऱ्यांचे प्रमाण ५ टक्के आहे. हे प्रमाण गत दोन महिन्यांपासून स्थिर आहे. त्यामुळे रुग्ण वाढत आहेत, असे म्हणता येत नाही.

- डॉ. वसंत जमधडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय

----

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या : ३,१०,६६८

उपचार सुरू असलेले रुग्ण : ५४३६

पोर्टलवरील मृत्यू नोंद : ६५२९

एकूण रुग्णसंख्या : ३,२२,६३३

----------

दोन्ही डोस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह

दोन्ही डोस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण जिल्ह्यात कमी आहे. लसीचा प्रभाव हा लाइफटाइम राहील, असे मुळीच नाही. ते एक सुरक्षा कवच आहे. त्यामुळे दोन्ही डोस घेतले तरी नागरिकांनी मास्क घालणे आवश्यक आहे. मात्र नागरिक मास्क घालण्याबाबत टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येते. दोन्ही डोस घेतल्यानंतरही कोरोनाबाधित झाल्यास नागरिकांनी घाबरू नये, मात्र काळजी घेणे गरजेचे आहे, असेही डॉ. जमधडे यांनी सांगितले. दरम्यान, दोन्ही डोस घेतले असले तरी नियमांचे पालन केल्याशिवाय पर्याय नाही, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. सचिन वहाडणे यांनी सांगितले.