शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या ८० हजार पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST

अहमदनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. रविवारी तब्बल ४४९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह ...

अहमदनगर : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. रविवारी तब्बल ४४९ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे जिल्ह्यात आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या ८० हजारांच्या वर गेली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही २ हजार २२७ इतकी झाली आहे.

जिल्ह्यात रविवारी ३२५ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७७ हजार ३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७७ टक्के इतके झाले आहे. रविवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १५९, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २६७ आणि अँटिजेन चाचणीत २३ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर (१५६), जामखेड (६), कोपरगाव (४५), नगर ग्रामीण (१६), नेवासा (११), पारनेर (२३), पाथर्डी (१६), राहुरी (१५), संगमनेर (५३), शेवगाव (१७), श्रीगोंदा (१८), श्रीरामपूर (१५), अकोले (५), राहाता (४७) आणि इतर जिल्हा (३), कन्टोन्मेंट (१) अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी यंत्रणांना दिले आहेत. यासाठी अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली असून चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. तसेच कोविड केअर सेंटर सज्ज करण्यात येत आहेत.

-----------

कोरोना स्थिती

बरे झालेली रुग्णसंख्या : ७७०३०

उपचार सुरू असलेले रुग्ण : २२२७

मृत्यू : ११७२

एकूण रुग्णसंख्या : ८०४२९