शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

नगरच्या उड्डाणपुलासाठी आता २९ आॅक्टोबरची तारीख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2017 18:27 IST

खासदार दिलीप गांधी यांनी १४ आॅक्टोबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होईल, अशी तारीख जाहीर केली होती. मात्र त्यादिवशी भूमिपूजन न झाल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी खिल्ली उडविली होती.

अहमदनगर : शहरातील नियोजित उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा खासदार दिलीप गांधी यांनी जाहीर केलेला १४ आॅक्टोबरचा मुहूर्त हुकल्यानंतर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आता २९ आॅक्टोबर ही नवी तारीख जाहीर केली आहे. विकास कामाची सर्व प्रक्रिया पूर्ण होणार असल्याने टीका करणा-यांनी निश्चिंत राहावे, असे सांगून काँग्रेसच्या सत्ताकाळात काय दिवे लागले, असा सवाल पालकमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.खासदार दिलीप गांधी यांनी १४ आॅक्टोबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होईल, अशी तारीख जाहीर केली होती. मात्र त्यादिवशी भूमिपूजन न झाल्याने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी खिल्ली उडविली होती. तसेच आता नगरकरांचा भूमिपूजनावर विश्वास राहिलेला नाही, अशी टीकाही केली होती. उड्डाणपुलाचा आराखडा तयार नसल्याने भूमिपूजनाऐवजी थेट लोकार्पण करण्याची मागणी तांबे यांनी केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हेही खासदारांवर चांगलेच संतापले असल्याची माहिती आहे. त्यामुळेच १४ आॅक्टोबरची तारीख जाहीर झाल्याचे खापर खासदार गांधी यांनी प्रसारमाध्यमांवर खापर फोडले होते. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जाहीर केलेल्या नव्या तारखेकडे लक्ष लागले आहे.मंगळवारी काही पत्रकारांशी अनौपचारिकपणे बोलताना पालकमंत्र्यांनी २९ आॅक्टोबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले. १४ आॅक्टोबर ही तारीख निश्चित झाली होती, हे सत्य असल्याचे शिंदे म्हणाले. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे १४ आॅक्टोबरला कार्यक्रम झाला नाही. जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीय महामार्ग, शहरातील उड्डाणपूल व इतर विकास कामांचे भूमिपूजन एकाच दिवशी करण्याचे नियोजन आहे. पुलाचा डीपीआर बनवूनच या कामाचा प्रारंभ होणार असल्याचे ते म्हणाले. उलट टीका करणाºयांनी सत्तेत असताना काय केले, असा सवाल करीत अप्रत्यक्षपणे सत्यजित तांबे यांच्यावर निशाणा साधला.

सोशल मीडियावर उड्डाणपूल..

उड्डाणपुलाचे मुहूर्त हुकल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ उठला होता. दिवाळीनिमित्त शहरात मुलांकडून किल्ले तयार करण्यात येत आहेत, मात्र उड्डाणपूल कोणीच बांधत नसल्याची एक पोस्ट टीकाही सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली. राजेंद्र गांधी यांनी तर ‘नगरच्या उड्डाणपुलावरून दिवाळीच्या शुभेच्छा’ अशी पोस्ट टाकताना त्यांनी उड्डाणपुलाचे छायाचित्रही दिले आहे. ‘आमचा पाठपुरावा चालू आहे, उड्डाणपूल तर होणारच’, असे उत्तर सत्यजित तांबे यांनी दिले आहे. ‘उड्डाणपूल नको, तर सर्वसामान्यांना हनुमान होण्याचा वर द्या’, अशी एक बोलकी प्रतिक्रिया आहे. ‘पुलाचा प्रश्न आता माध्यमांनीच उचलून धरला पाहिजे’, अशी अपेक्षा ऋषिकेश ताठे याने व्यक्त केली आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar overbrigeअहमदनगर उड्डाणपूलRam Shindeराम शिंदे