शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पाणी नाही तर मतही नाही : मतदानावर श्रीरामपुरमधील ग्रामस्थांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 18:33 IST

भंडारदरा धरणाच्या अखेरच्या उन्हाळी आवर्तनातून लाभक्षेत्रातील शेकडो शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. श्रीरामपूर, राहाता व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी पाटबंधारेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला.

श्रीरामपूर : भंडारदरा धरणाच्या अखेरच्या उन्हाळी आवर्तनातून लाभक्षेत्रातील शेकडो शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. श्रीरामपूर, राहाता व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी पाटबंधारेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला. श्रीरामपूर येथील उंबरगाव, माळेवाडी, वळदगावसह काही गावांनी ग्रामसभा घेऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.धरणातून १५ मार्च रोजी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले होते. अखेरच्या आवर्तनातून उसासह चारा पिकांना जीवनदान मिळणार होते. मात्र, श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी, उंदिरगाव, हरेगाव, मुठेवाडगाव, माळवाडगाव, वडाळा महादेव, उंबरगावसह राहुरी तालुक्यातील काही गावांना पाणी मिळू शकले नाही. राहाता तालुक्यातील लोणीसह सोनवगाव परिसरही पाण्यापासून वंचित राहिला. त्यामुळे गुरुवारी पाटबंधारेविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. श्रीरामपूरमध्ये शेकडो शेतकºयांनी पाटबंधारेच्या वडाळा उपविभागीय कार्यालयाला घेरावो घातल. यानंतर संतापलेल्या शेतकºयांनी तहसील कार्यालयात ठिय्या दिला. जमावबंदी आदेश लागू झालेले असल्याने यावेळी पोलिसांचू कूमक बोलविण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे, सभापती सचिन गुजर, शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र भोसले, अनिल औताडे, राजेंद्र पाऊलबुद्धे, विश्वनाथ मुठे, दिलीप गलांडे, नानासाहेब पवार, सुनील कुदळे, रघुनाथ उघडे, सोपान औताडे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी देवळालीप्रवरा येथील आंदोलनात सहभाग घेतला.आता भंडारदरा धरणात एक हजार ६०० व निळवंडेत १ हजार १७३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. त्यातील ४५० एमसीएफटी हा मृतसाठा आहे. २ हजार ३०० दशलक्ष घनफूट पाण्यामध्ये जुलैपर्यंतचे पिण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लाभक्षेत्रातील नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या साठवण तलावाकरिता पाणी शिल्लक ठेवण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश आहेत. प्रत्येकी ७०० एमसीएफटीच्या आवर्तनातून हे तलाव भरले जातील, अशी माहिती देशमुख यांनी दिली.आज सायंकाळी माळेवाडी, उंबरगाव, उंदिरगाव, मुठेवाडगाव येथे ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. त्यात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय होणार आहे. नेते मंडळी व उमेदवारांना गावात येण्यास मज्जाव केला जाणार आहे, अशी माहिती सरपंच सोपान औताडे, जितेंद्र भोसले, अनिल औताडे, विश्वनाथ मुठे, राजेंद्र पाऊलबुद्धे आदी नेत्यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९shirdi-pcशिर्डी