शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

पाणी नाही तर मतही नाही : मतदानावर श्रीरामपुरमधील ग्रामस्थांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 18:33 IST

भंडारदरा धरणाच्या अखेरच्या उन्हाळी आवर्तनातून लाभक्षेत्रातील शेकडो शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. श्रीरामपूर, राहाता व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी पाटबंधारेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला.

श्रीरामपूर : भंडारदरा धरणाच्या अखेरच्या उन्हाळी आवर्तनातून लाभक्षेत्रातील शेकडो शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. श्रीरामपूर, राहाता व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी पाटबंधारेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला. श्रीरामपूर येथील उंबरगाव, माळेवाडी, वळदगावसह काही गावांनी ग्रामसभा घेऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.धरणातून १५ मार्च रोजी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले होते. अखेरच्या आवर्तनातून उसासह चारा पिकांना जीवनदान मिळणार होते. मात्र, श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी, उंदिरगाव, हरेगाव, मुठेवाडगाव, माळवाडगाव, वडाळा महादेव, उंबरगावसह राहुरी तालुक्यातील काही गावांना पाणी मिळू शकले नाही. राहाता तालुक्यातील लोणीसह सोनवगाव परिसरही पाण्यापासून वंचित राहिला. त्यामुळे गुरुवारी पाटबंधारेविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. श्रीरामपूरमध्ये शेकडो शेतकºयांनी पाटबंधारेच्या वडाळा उपविभागीय कार्यालयाला घेरावो घातल. यानंतर संतापलेल्या शेतकºयांनी तहसील कार्यालयात ठिय्या दिला. जमावबंदी आदेश लागू झालेले असल्याने यावेळी पोलिसांचू कूमक बोलविण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे, सभापती सचिन गुजर, शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र भोसले, अनिल औताडे, राजेंद्र पाऊलबुद्धे, विश्वनाथ मुठे, दिलीप गलांडे, नानासाहेब पवार, सुनील कुदळे, रघुनाथ उघडे, सोपान औताडे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी देवळालीप्रवरा येथील आंदोलनात सहभाग घेतला.आता भंडारदरा धरणात एक हजार ६०० व निळवंडेत १ हजार १७३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. त्यातील ४५० एमसीएफटी हा मृतसाठा आहे. २ हजार ३०० दशलक्ष घनफूट पाण्यामध्ये जुलैपर्यंतचे पिण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लाभक्षेत्रातील नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या साठवण तलावाकरिता पाणी शिल्लक ठेवण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश आहेत. प्रत्येकी ७०० एमसीएफटीच्या आवर्तनातून हे तलाव भरले जातील, अशी माहिती देशमुख यांनी दिली.आज सायंकाळी माळेवाडी, उंबरगाव, उंदिरगाव, मुठेवाडगाव येथे ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. त्यात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय होणार आहे. नेते मंडळी व उमेदवारांना गावात येण्यास मज्जाव केला जाणार आहे, अशी माहिती सरपंच सोपान औताडे, जितेंद्र भोसले, अनिल औताडे, विश्वनाथ मुठे, राजेंद्र पाऊलबुद्धे आदी नेत्यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९shirdi-pcशिर्डी