शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

पाणी नाही तर मतही नाही : मतदानावर श्रीरामपुरमधील ग्रामस्थांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 18:33 IST

भंडारदरा धरणाच्या अखेरच्या उन्हाळी आवर्तनातून लाभक्षेत्रातील शेकडो शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. श्रीरामपूर, राहाता व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी पाटबंधारेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला.

श्रीरामपूर : भंडारदरा धरणाच्या अखेरच्या उन्हाळी आवर्तनातून लाभक्षेत्रातील शेकडो शेतकरी पाण्यापासून वंचित राहिले. श्रीरामपूर, राहाता व राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवारी पाटबंधारेच्या विभागीय कार्यालयावर मोर्चा काढत अधिकाऱ्यांना घेराव घातला. श्रीरामपूर येथील उंबरगाव, माळेवाडी, वळदगावसह काही गावांनी ग्रामसभा घेऊन मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे.धरणातून १५ मार्च रोजी उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले होते. अखेरच्या आवर्तनातून उसासह चारा पिकांना जीवनदान मिळणार होते. मात्र, श्रीरामपूर तालुक्यातील माळेवाडी, उंदिरगाव, हरेगाव, मुठेवाडगाव, माळवाडगाव, वडाळा महादेव, उंबरगावसह राहुरी तालुक्यातील काही गावांना पाणी मिळू शकले नाही. राहाता तालुक्यातील लोणीसह सोनवगाव परिसरही पाण्यापासून वंचित राहिला. त्यामुळे गुरुवारी पाटबंधारेविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केले. श्रीरामपूरमध्ये शेकडो शेतकºयांनी पाटबंधारेच्या वडाळा उपविभागीय कार्यालयाला घेरावो घातल. यानंतर संतापलेल्या शेतकºयांनी तहसील कार्यालयात ठिय्या दिला. जमावबंदी आदेश लागू झालेले असल्याने यावेळी पोलिसांचू कूमक बोलविण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे, सभापती सचिन गुजर, शेतकरी संघटनेचे नेते जितेंद्र भोसले, अनिल औताडे, राजेंद्र पाऊलबुद्धे, विश्वनाथ मुठे, दिलीप गलांडे, नानासाहेब पवार, सुनील कुदळे, रघुनाथ उघडे, सोपान औताडे आदींनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी देवळालीप्रवरा येथील आंदोलनात सहभाग घेतला.आता भंडारदरा धरणात एक हजार ६०० व निळवंडेत १ हजार १७३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. त्यातील ४५० एमसीएफटी हा मृतसाठा आहे. २ हजार ३०० दशलक्ष घनफूट पाण्यामध्ये जुलैपर्यंतचे पिण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लाभक्षेत्रातील नगरपालिका व ग्रामपंचायतींच्या साठवण तलावाकरिता पाणी शिल्लक ठेवण्याचे जिल्हाधिकाºयांचे आदेश आहेत. प्रत्येकी ७०० एमसीएफटीच्या आवर्तनातून हे तलाव भरले जातील, अशी माहिती देशमुख यांनी दिली.आज सायंकाळी माळेवाडी, उंबरगाव, उंदिरगाव, मुठेवाडगाव येथे ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. त्यात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय होणार आहे. नेते मंडळी व उमेदवारांना गावात येण्यास मज्जाव केला जाणार आहे, अशी माहिती सरपंच सोपान औताडे, जितेंद्र भोसले, अनिल औताडे, विश्वनाथ मुठे, राजेंद्र पाऊलबुद्धे आदी नेत्यांनी दिली.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९shirdi-pcशिर्डी