शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

ना अंगणवाडी.. ना शाळा... ना वीज.. ना रस्ते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:21 IST

केडगाव : चिमुकल्यांना ज्ञानाचे धडे गिरविण्यासाठी ना अंगणवाडी.. ना शाळा.. ना वीज.. ना रस्ते.. अशा कोणत्याही पायाभूत सुविधा नसल्याचे ...

केडगाव : चिमुकल्यांना ज्ञानाचे धडे गिरविण्यासाठी ना अंगणवाडी.. ना शाळा.. ना वीज.. ना रस्ते.. अशा कोणत्याही पायाभूत सुविधा नसल्याचे विदारक चित्र नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी तलाव परिसरातील आदिवासी भिल्ल समाजाच्या पालावर दिसून येते.

पेशवे काळात महादजी शिंदे सरकारच्या काळापासून आदिवासी भिल्ल समाजाचे पिंपळगाव तलावात वास्तव्य असल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो. शिंदे सरकारच्या काळात भिल्ल समाजाच्या बंडाची इतिहासात नोंद आहे. पिंपळगाव तलावातील ७०० एकर क्षेत्र पूर्वीपासून शिंदे सरकारच्या नावावर होते. आता या क्षेत्रावर महानगरपालिकेच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. येथे वास्तव्यास असणाऱ्या २६० आदिवासी भिल्ल समाजाच्या कुटुंबांच्या नावावर क्षेत्रच नसल्याने शासनाची कोणतीही योजना येथे राबविली जात नाही. अधिकृत वीज नाही, रस्ते नाही, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही. मुलांना शिकण्यासाठी ना अंगणवाडी, ना शाळा, रेशनकार्डही नाही, अनेकांना जातीचे दाखले नाहीत, अशी स्थिती त्यांच्या आयुष्यात निर्माण झाली आहे. पिंपळगाव तलाव होण्याअगोदर सीना नदीच्या तीरावर आदिवासी भिल्ल समाज मासेमारी करून उपजीविका भागवत होता. आजही येथील तरुण मोलमजुरी, मासेमारी करून उपजीविका भागवत आहेत, तसेच येथील काही जण जमीन कसत आहेत. कोणत्याही पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्याने येथील चिमुकले जीव मुठीत धरून आपले जीवन जगताना दिसून येत आहेत.

दिल्ली येथील राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाने नगर जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पिंपळगाव तलावातील परिस्थितीची २०१८ मध्ये प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी आयोगही येथील परिस्थिती पाहून अवाक् झाले होते. त्यावेळेस आयोगाकडून विद्यमान जिल्हाधिकारी व इतर अधिकाऱ्यांना तलावामध्ये पायाभूत सुविधा तात्काळ पुरविण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या; परंतु आजपर्यंत येथे कोणत्याही सुविधा देण्यात आलेल्या नाहीत.

---

घरकुलाला मंजुरी; परंतु जागेचा प्रश्न..

जेऊर ग्रामपंचायतअंतर्गत तलावात वास्तव्यास असलेल्या आदिवासी भिल्ल समाजातील काही कुटुंबांना घरकुल मंजूर झालेले आहेत; परंतु जागा नावावरच नसल्याने व शासनाचा तसा नियम असल्याने ही कुटुंबे घरकुलापासून वंचितच आहेत.

---

आदिवासी कुटुंबांची तीन गावांत विभागणी

तलावात वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी समाजाची तीन गावांमध्ये विभागणी झाली आहे. जेऊर, पिंपळगाव माळवी व धनगरवाडी या तीन गावांमध्ये विभागणी झाल्याने कोणतेही एक गाव आदिवासी विकासाबाबत ठोस निर्णय घेत नाही. तिन्ही गावांकडून चालढकल होत असल्याचा आरोप येथील आदिवासी समाजाकडून करण्यात येत आहे.

---

जागेचा वाद आयोगाकडे

पिंपळगाव तलावातील ७०० एकर क्षेत्रापैकी काही क्षेत्र येथील आदिवासी समाजाच्या नावावर करण्याबाबत येथील समाजाने शासन दरबारी अनेक वर्षांपासून लढा दिलेला आहे. या जागेचा वाद दिल्ली येथील राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोगाकडे प्रलंबित आहे.

--

आम्हाला शासनाकडून कोणत्याही सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. आयोगाने दिलेल्या सूचनांचे अधिकाऱ्यांनी पालन केलेले नाही. आयोगाकडे जागेचा प्रश्न प्रलंबित असताना महापालिका येथे प्रकल्प राबविण्याच्या प्रयत्नात आहे. महापालिकेच्या कोणत्याही प्रकल्पास आमचा विरोधच राहील.

-बाळासाहेब पवार,

अध्यक्ष, एकलव्य आदिवासी विकास संस्था

---

आम्ही पिढ्यान्‌पिढ्या पिंपळगाव तलावात राहत असून, येथे जागा नावावर नसल्याने कोणतीही शासनाची योजना आमच्यापर्यंत पोहोचत नाही. पिंपळगाव तलावातील क्षेत्राच्या जागेवर आदिवासी समाजाची नावे लावण्यात यावीत, तसेच आहे त्याच जागेवर आम्हाला घरकुल मिळावे.

-सुभाष पवार,

जिल्हाध्यक्ष, एकलव्य भिल्ल समाज संघटना

--

२२ पिंपळगाव माळवी