शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
4
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
7
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
8
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
9
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
10
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
11
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
12
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
13
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
14
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
15
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
16
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
17
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
18
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
19
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
20
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
Daily Top 2Weekly Top 5

नगर-आष्टी रेल्वेच्या नऊ डब्यांना अचानक भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

By चंद्रकांत शेळके | Updated: October 16, 2023 17:17 IST

नगर-आष्टी ही १५ डब्यांची रेल्वेगाडी रोज सकाळी आठच्या सुमारास नगरहून आष्टीकडे रवाना होते.

अहमदनगर : नगर-आष्टी रेल्वेगाडीच्या नऊ डब्यांना अचानक आग लागल्याने हे डबे जळून खाक झाले. सोमवारी (दि. १६) दुपारी दोनच्या सुमारास नगरजवळील वाळुंज शिवारात ही घटना घडली. ही रेल्वे आष्टीकडून नगरकडे येत होती.

नगर-आष्टी ही १५ डब्यांची रेल्वेगाडी रोज सकाळी आठच्या सुमारास नगरहून आष्टीकडे रवाना होते. प्रवाशी घेऊन सकाळी ११ वाजता ती पुन्हा आष्टीतून नगरकडे फिरते. सोमवारी ही गाडी आष्टीहून निघाल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगर-सोलापूर रोडवर वाळुंज शिवारात आली असता गाडीच्या पुढील बाजूने एका डब्याला आग लागली. चालकाच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी गाडी थांबवली. तोपर्यंत पेटलेल्या डब्यातून धुराचे मोठे लोट बाहेर पडत होते. या गाडीला प्रतिसाद नसल्याने एकही प्रवाशी गाडीत नव्हता. दरम्यान, एकापाठोपाठ एक डब्यांना आग लागण्यास सुरूवात झाली.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाला ही माहिती समजताच त्यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही वेळाने अग्नीशामक दलाच्या गाड्याही दाखल झाल्या. परंतु पेटलेले डबे शेतात असल्याने तेथे जाण्यास अडचणी येत होत्या. दरम्यान, दोन तासांहून अधिक काळ झाल्याने नऊ डब्यांना आग लागली. उशिरापर्यंत आग शमविण्याचे काम सुरू होते. शाॅर्टसर्किटने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समजते.

टॅग्स :fireआगAhmednagarअहमदनगर