शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

नगर-आष्टी रेल्वेच्या नऊ डब्यांना अचानक भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

By चंद्रकांत शेळके | Updated: October 16, 2023 17:17 IST

नगर-आष्टी ही १५ डब्यांची रेल्वेगाडी रोज सकाळी आठच्या सुमारास नगरहून आष्टीकडे रवाना होते.

अहमदनगर : नगर-आष्टी रेल्वेगाडीच्या नऊ डब्यांना अचानक आग लागल्याने हे डबे जळून खाक झाले. सोमवारी (दि. १६) दुपारी दोनच्या सुमारास नगरजवळील वाळुंज शिवारात ही घटना घडली. ही रेल्वे आष्टीकडून नगरकडे येत होती.

नगर-आष्टी ही १५ डब्यांची रेल्वेगाडी रोज सकाळी आठच्या सुमारास नगरहून आष्टीकडे रवाना होते. प्रवाशी घेऊन सकाळी ११ वाजता ती पुन्हा आष्टीतून नगरकडे फिरते. सोमवारी ही गाडी आष्टीहून निघाल्यानंतर दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगर-सोलापूर रोडवर वाळुंज शिवारात आली असता गाडीच्या पुढील बाजूने एका डब्याला आग लागली. चालकाच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी गाडी थांबवली. तोपर्यंत पेटलेल्या डब्यातून धुराचे मोठे लोट बाहेर पडत होते. या गाडीला प्रतिसाद नसल्याने एकही प्रवाशी गाडीत नव्हता. दरम्यान, एकापाठोपाठ एक डब्यांना आग लागण्यास सुरूवात झाली.

दरम्यान, रेल्वे प्रशासनाला ही माहिती समजताच त्यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली. काही वेळाने अग्नीशामक दलाच्या गाड्याही दाखल झाल्या. परंतु पेटलेले डबे शेतात असल्याने तेथे जाण्यास अडचणी येत होत्या. दरम्यान, दोन तासांहून अधिक काळ झाल्याने नऊ डब्यांना आग लागली. उशिरापर्यंत आग शमविण्याचे काम सुरू होते. शाॅर्टसर्किटने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समजते.

टॅग्स :fireआगAhmednagarअहमदनगर