शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

निळवंडेचे कालवे ओपनच : नितीन गडकरींचे लोकसभेत स्पष्टीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 15:41 IST

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे कालव्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अकोले तालुक्यातील निळवंडेचे कालवे हे बंदिस्त नसून ते पारंपरिक पद्धतीने जमिनीवरूनच होणार असल्याचे स्पष्ट केले.

शिर्डी : लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळात खासदार सदाशिव लोखंडे यांनी निळवंडे कालव्यांबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अकोले तालुक्यातील निळवंडेचे कालवे हे बंदिस्त नसून ते पारंपरिक पद्धतीने जमिनीवरूनच होणार असल्याचे स्पष्ट केले. या ठिकाणी जमीन संपादन झालेली आहे. त्यामुळे कालवे भूमीगत करण्याचा प्रश्नच येत नसल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले.निळवंडे धरणाचे काम सुरू होऊन ४७ वर्षे झाली आहे. प्रकल्पाची मूूळ किंमत ही फक्त साडेसात कोटी होती. त्यावरून ती आता २ हजार २३२ कोटी झाली आहे. तरी लाभक्षेत्राला पाणी नाही. कालवे पारंपरिक की भूमीगत याबाबत अकोले तालुक्यात संभ्रम निर्माण केला जात आहे. साईबाबा शताब्दी वर्षात दुष्काळी भागाला पाणी मिळणार का? तसेच निळवंडे लाभक्षेत्राला अच्छे दिन येणार का? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर गडकरी म्हणाले, महाराष्ट्र शासनाने जमीन संपादित केलेली आहे. कालव्याच्या जागेचे उतारे हे शासनाच्या नावे आहेत. त्यामुळे कालवे पाईपलाईनने करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. जिथे भूसंपादन झाले आहे तिथे तात्काळ कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. जर साईबाबांच्या भूमीत पाणी गेले तर मलाही आशीर्वाद मिळतील, असे गडकरी यांनी सांगितले. बळीराजा कृषी संजीवनी योजनेत उर्ध्व प्रवरा-२ (निळवंडे) प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय जल आयोगाची मान्यता नुकतीच मिळाली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे वित्तीय गुंतवणूक प्रमाणपत्र मिळण्यास उशिर झाला असल्याचेही गडकरी यांनी स्पष्ट केले. राज्याचे पत्र मिळताच निळवंडेचा तात्काळ विशेष प्रकल्पात समावेश करून प्रकल्प पूर्ण केला जाणार असल्याचे गडकरी यांनी लोकसभेत सांगितले.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरshirdiशिर्डीSadashiv Lokhandeसदाशिव लोखंडेNitin Gadkariनितीन गडकरीlok sabhaलोकसभा