शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत भाजपाचा स्वबळाचा नारा, "मुंबईत एकत्र लढू पण.."; महायुतीत शिंदेसेनेला डच्चू?
2
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
3
फक्त 6 मिनिटांत सोनं 7,700 रुपयांनी घसरलं; चांदीलाही मोठा धक्का, जाणून घ्या नवीन दर...
4
Kagiso Rabada Record : रबाडाचा बॅटिंगमध्ये मोठा धमाका! पाकिस्तान विरुद्ध ११९ वर्षांचा रेकॉर्ड मोडला
5
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
6
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
7
भारतीय वंशाच्या फलंदाजाने पाकिस्तानला रडवले, शेवटच्या दोन खेळाडूंसह द. आफ्रिकेला सावरले
8
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
9
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
10
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
11
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
12
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
13
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
14
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
15
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
16
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
17
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
18
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
19
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
20
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...

नगर, औरंगाबाद, नांदेडमध्ये ऊस गाळपाचा नवा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 17:30 IST

१ नोव्हेंबरपासून सुरू झालेला महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. १ एप्रिलपर्यंत राज्यातील ७८ कारखाने बंद झाले असून राज्याच्या साखर कारखानदारीची ऊस गाळप व साखर उत्पादनात नव्या उच्चांकाकडे वाटचाल सुरू आहे.

मिलिंदकुमार साळवेअहमदनगर : १ नोव्हेंबरपासून सुरू झालेला महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम संपण्याच्या मार्गावर आहे. १ एप्रिलपर्यंत राज्यातील ७८ कारखाने बंद झाले असून राज्याच्या साखर कारखानदारीची ऊस गाळप व साखर उत्पादनात नव्या उच्चांकाकडे वाटचाल सुरू आहे. दरम्यान, अहमदनगर, औरंगाबाद, नांदेड, अमरावती या विभागांनी ३० मार्चअखेर गाळपाचा नवा उच्चांक नोंदविला आहे.

राज्याचा यंदाचा साखर हंगाम

राज्यात सन २०१४-१५ च्या हंगामात सर्वाधिक ९३०.४१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले होते. त्यातून १०५१.४३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले होते. ९९ सहकारी व ७९ खासगी कारखान्यांचा या हंगामात समावेश होता. साखर आयुक्तालयाच्या ३० मार्चअखेरच्या आकडेवारीनुसार राज्यातील १०१ सहकारी व ८६ खासगी अशा १८७ साखर कारखान्यांमधून ९००.८१ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून त्यातून १००४.५७ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ११.१५ टक्के एवढा आहे.

अहमदनगरने मोडला दशकातील विक्रम

साखर आयुक्तालयांतर्गत अहमदनगर व नाशिक जिल्ह्याचा समावेश असलेल्या अहमदनगर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाच्या अखत्यारित १७ सहकारी व १० खासगी अशा २७ कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. या कारखान्यांनी ३० मार्चअखेर १३२.११ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप १४२.७७ लाख क्विंटल साखर उत्पादन केले. अहमदनगर विभागाने १४-१५ चा १३० लाख मेट्रिक टन गाळपाचा गेल्या दहा वर्षांमधील उच्चांक मोडून यंदाच्या हंगामात गाळपाचा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. अहमदनगर विभागात १४-१५ मध्ये १३० लाख मेट्रिक टन गाळप होऊन १४.३८ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले होते. १५-१६ मध्ये १०४.४३ लाख मेट्रिक टन ऊस गाळप होऊन ११.३८ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले होते.

मराठवाड्यातही विक्रमी गाळप

अहमदनगरसोबतच मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड या दोन्ही विभागांसह विदर्भातील अमरावती विभागानेही गाळपाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने