शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

विकास पर्वासाठी आता दबावगटाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST

अहमदनगर : नगरचे राजकारण अतिशय गढूळ झाले आहे. माजी नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांचा काळ नगरच्या इतिहासात सुवर्णकाळ होता. बार्शीकर ...

अहमदनगर : नगरचे राजकारण अतिशय गढूळ झाले आहे. माजी नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांचा काळ नगरच्या इतिहासात सुवर्णकाळ होता. बार्शीकर यांच्या विकास पर्वाची पुनरावृत्ती करण्यासाठी नगरमध्ये एक सशक्त दबाव गट हवा आहे, अशी अपेक्षा माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे यांनी व्यक्त केली.

नवनीत विचार मंचातर्फे स्व. बार्शीकर यांच्या जयंती व जन्मशताब्दी वर्षानिमित्त मंगळवारी अभिवादन करण्यात आले. त्यावेळी निमसे बोलत होते. प्रारंभी डॉ. निमसे, विचार मंचाचे अध्यक्ष सुधीर मेहता, सुभाष मुथा यांनी बार्शीकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी इंजिनिअर अमृत मुथा, आर्किटेक्ट असोसिएशनचे अर्शद शेख, रसिक ग्रुपचे जयंत येलूलकर, जागरूक मंचाचे सुहास मुळे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी, सुशील शाह, जनार्दन शिरसाठ, डॉ. कमर सुरुर, श्रीमती बागडे, राजन नवले, महावीर पोखरणा, अबिद खान आदींची उपस्थिती होती.

मेहता यांनी शताब्दी समितीच्या अध्यक्षपदासाठी डॉ. निमसे यांच्या नावाची सूचना केली. त्याला मुथा यांनी अनुमोदन दिले. भाईंची उपेक्षा करणाऱ्यांना आता नगरकर कृतघ्न पालिका पुरस्कार देतील, असे सांगितले. यावेळी सर्व संस्था, संघटना एकत्र आल्या तरच भाईंची स्मृती जपण्याचा उद्देश सफल होईल. प्रत्येकाने आपल्या घरावर नवनीत नगर आणि शहरात कृतज्ञता फलक लावावेत. गौरव ग्रंथासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन सुशील शाह, श्रीराम जोशी, जनार्दन शिरसाठ, किशोर मुनोत, सायली मेहता आदींनी केले. श्रीराम जोशी यांनी आभार मानले.

--

फोटो- १३ बार्शिकर

माजी नगराध्यक्ष नवनीतभाई बार्शीकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी कुलगुरू सर्जेराव निमसे, सुधीर मेहता आदी.