शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
5
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
6
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
7
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
8
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
9
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
10
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
11
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
12
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
13
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
14
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
15
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
16
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
17
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
19
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
20
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video

एनसीसीच्या १७ महाराष्ट्र बटालियनला ६५ वर्षे पूर्ण,  दरवर्षी अडीच हजार युवकांना लष्करी प्रशिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2020 11:42 IST

अहमदनगर जिल्ह्यात २९ नोव्हेंबर १९५५ रोजी संरक्षण मंत्रालयाच्या अधीन फक्त ६४ छात्र सैनिकांच्या संख्येवर बटालियनची सुरुवात करण्यात आली. एनसीसीच्या याच त्या सतरा महाराष्ट्र बटालियनला आज ६५ वर्षे पूर्ण होत असून दरवर्षी येथून अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी बाहेर पडतात.

अहमदनगर : भारतामध्ये संकटकाळात आदर्श सैनिक व अधिकारी निर्माण व्हावे, यासाठी १९४८ मध्ये नवी दिल्ली येथे राष्ट्रीय छात्र सेनेची स्थापना झाल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील युवकांना लष्करी प्रशिक्षण मिळावे, या हेतूने अहमदनगर जिल्ह्यात २९ नोव्हेंबर १९५५ रोजी संरक्षण मंत्रालयाच्या अधीन फक्त ६४ छात्र सैनिकांच्या संख्येवर बटालियनची सुरुवात करण्यात आली. एनसीसीच्या याच त्या सतरा महाराष्ट्र बटालियनला आज ६५ वर्षे पूर्ण होत असून दरवर्षी येथून अडीच हजारांहून अधिक विद्यार्थी बाहेर पडतात.

भारतामधील ही सर्वात जुनी व नामवंत गौरवमय बटालियन असून या बटालियनने आजपर्यंत हजारो जवान, सेना अधिकारी, अर्धसैनिक दलांमध्ये व सिव्हील सेवांमध्ये अधिकारी, प्राचार्य, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी तसेच खासगी कंपनीमध्ये अधिकारी दिलेले आहेत. आज बटालियनची संख्या सेना दलातील बटालियनपेक्षा दुपटीने वाढलेली असून या बटालियनमध्ये २ नियमित सेना अधिकारी, ३२ छात्र सेना अधिकारी, ५ ज्युनिर कमिशन अधिकारी, १२ नॉन कमिशन अधिकारी, १८ सिविलीयन कार्यालयीन स्टाफ कार्यरत आहे.

     विशेष महत्वाची बाब म्हणजे यामध्ये ३३ टक्के मुलींचा समावेश असून कर्नल जीवन झेंडे यांनी मुलींना प्रोत्साहित करण्यासंदर्भात विशेष मोहीम राबिवली आहे. या बटालियनला स्थापनेपासून आजपर्यंत वेगवेगळ्या सेना अधिकारी, जनरल पदाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देवून त्यांच्या कार्याची प्रशंसा केलेली आहे.

     सर्वोत्कृष्ट एनसीसी अधिकारी म्हणून मेजर संजय चौधरी यांना सन्मानित करण्यात आले असून त्यांचा प्रजासत्ताक दिन व अन्य राज्य व राष्ट्रीय शिबिरांमध्ये समावेश आहे. दरवर्षी प्रजासत्ताक दिन शिबिरामध्ये या बटालियनचे छात्रसैनिक सहभागी होतात. छात्रसैनिकांना कवायत, नकाशावाचन, लष्करी जीवनाची ओळख, युद्धनीती, सैन्य इतिहास, राष्ट्रीय एकात्मता, प्रशिक्षण तसेच सेनादलात जाण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविले जातात.

सध्या १७ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे व प्रशासकीय अधिकारी विनय बाली असून कर्नल जीवन झेंडे यांना अनेक लष्करी प्रशंसापत्र पुरस्कार मिळालेलेे आहेत.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरStudentविद्यार्थी