शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

नाशिक, नगर जिल्ह्यातील कारखान्यांनी काटा मारला, ऊस उतारा चोरला; शेतकरी संघटनांची तक्रार, कोंडी फोडण्यासाठी १८ नोव्हेंबरला संयुक्त बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 10:55 IST

जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात काटा मारून ऊस उतारा चोरला, असा आरोप शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या पदाधिका-यांनी साखर सहसंचालकांसमोर केला.

ठळक मुद्दे१८ नोव्हेंबरला ऊस प्रश्नी नगर, नाशिक जिल्ह्यातील कारखानदारांसमवेत संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्याचा निर्णय बैठकीत झाला.गुजरातमध्ये पस्तीसशे रुपये भाव शक्य असताना महाराष्ट्रात का शक्य नाही? असा सवाल शेतकरी संघटनेने केला.

अहमदनगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात काटा मारून ऊस उतारा चोरला, असा आरोप शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीच्या पदाधिका-यांनी साखर सहसंचालकांसमोर केला. दरम्यान उसाला पस्तीसशे रूपये भाव मिळण्याच्या मागणीवरून शेवगाव तालुक्यात झालेल्या आंदोलन व गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर शनिवार १८ नोव्हेंबरला ऊसप्रश्नी बैठक बोलाविण्यात आली आहे.या बैठकीस कारखान्याचे पदाधिकारी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी व प्रादेशिक साखर सहसंचालक उपस्थित राहणार आहेत. गुरूवारी दुपारपर्यंत सुकाणू समितीच्या पदाधिका-यांनी सहसंचालक दालनात धडक मारून ठिय्या आंदोलन केले. सहसंचालक संगीता डोंगरे पदाधिकारी निवडीच्या बैठकीसाठी कोपरगावला गेल्या होत्या. त्यामुळे आंदोलकांनी उपसंचालक राजकुमार पाटील यांच्या दालनात कोंडून घेत आंदोलन सुरू केले. दुपारी डोंगरे आल्यानंतर त्यांच्याशी आंदोलकांच्या वतीने डॉ. अजित नवले, कालिदास आपेट, बाळासाहेब पटारे, बन्सी सातपुते, सुभाष लांडे, लहानू सदगीर,अजय बारस्कर, विलास कदम आदींनी चर्चा केली.त्यानुसार ज्या कारखान्यांनी गेल्या हंगामात ५० टक्के ऊस उपलब्ध असल्याचे लेखी नोंदवूनही प्रत्यक्षात त्यापेक्षा कमी गाळप केले, अशा कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची २ महिन्यात शेतकरीनिहाय चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन सहसंचालकांनी दिले. १८ नोव्हेंबरला ऊसप्रश्नी नगर, नाशिक जिल्ह्यातील कारखानदारांसमवेत संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्याचा निर्णय बैठकीत झाला. गेल्या हंगामात कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ५० टक्के ऊस नसतानाही अनेक कारखान्यांनी खोटी माहिती देऊन तेवढा ऊस असल्याच्या नोंदी देऊन फसवणूक करीत गाळप परवाने मिळविले. अनेक कारखान्यांनी नोंदीच्या तुलनेत ५० टक्केपेक्षा कमी गाळप केले. त्यांच्याविरूद्ध कारवाई करण्याऐवजी सहसंचालक कार्यालयाने त्यांना बेकायदेशीर परवाने दिले. त्यामुळे चुकीची माहिती देणा-या कारखान्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. त्यानुसार चौकशी करणार असल्याचे सहसंचालक डोंगरे यांनी सांगितले.श्रीरामपूरच्या अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ५० टक्केही ऊस नसताना त्यांनी खोट्या नोंदी दाखवून गाळप केल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख बाळासाहेब पटारे यांनी केला. तर गुजरातमध्ये पस्तीसशे रुपये भाव शक्य असताना महाराष्ट्रात का शक्य नाही? असा सवाल शेतकरी संघटनेचे कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केला. तर शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे राज्य समन्वयक डॉ. नवले यांनी कोल्हापुरात ११.५ टक्के उतारा मिळत असताना नगर जिल्ह्यात ९.५ टक्के उतारा कसा घसरतो?, असा सवाल करीत कारखानदार व साखर सहसंचालक कार्यालयाच्या संगनमताने कारखानदार उतारा चोरीत असल्याचा आरोप केला. तसेच शेवगावप्रकरणी २५२५ रूपयांची तडजोड मान्य नसून जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी ३५०० रूपये दर देण्याची मागणी असल्याचे ठणकावून सांगितले.

कारखान्यांनी एफ. आर.पी. प्रमाणे उसाला भाव देणे बंधनकारक आहे. पण त्यापेक्षा जास्त ३५०० रूपये भाव देण्याबाबत त्यांना कायद्याने सक्ती करता येणार नाही. कारखान्यांनी दिलेल्या उसाच्या नोंदींची चौकशी करुन २ महिन्यात अहवाल सादर करण्यात येईल. जिल्ह्यातील कारखान्यांचा उतारा कमी का आला? याची कारणे संबंधितांना विचारली जातील. ऊस दर व इतर प्रश्नांबाबत शनिवार १८ नोव्हेंबरला बैठक होईल.-संगीता डोंगरे, प्रादेशिक साखर सहसंचालक, अहमदनगर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीStrikeसंप