शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
2
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
3
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
4
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
5
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
6
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
7
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
8
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
9
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
10
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
11
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
12
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
13
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
14
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
15
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
16
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
17
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
18
घोडबंदर मार्गावर रस्त्यांची कामं सुरू; मुंबईत जाताना ठाण्यात वाहतूककाेंडीची ‘शिक्षा’
19
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
20
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?

नरेंद्र मोदींनी अशक्य ते शक्य करुन दाखवले; दिवसरात्र मेहनत करतायत, CM शिंदेंनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 22:45 IST

'सरकारी काम आणि सहा महिने थांब' ही संकल्पना बदलण्यासाठी या उपक्रमाला सुरुवात केली होती असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या_दारी या शासनाच्या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा पुढचा टप्पा पार पडला. यावेळी या जिल्ह्यातील २४ लाख ४८ हजार लाभार्थ्यांना ३ हजार ९८२ कोटी रुपयांच्या लाभ देण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांनी संबोधित केले. 

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या आजवरच्या १२ कार्यक्रमातून राज्यभरातील १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे प्रत्यक्ष लाभ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' ही संकल्पना बदलण्यासाठी या उपक्रमाला सुरुवात केली होती असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमातच ज्येष्ठ लोककलावंत शांताबाई लोंढे कोपरगावकर यांना ५ लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला तसेच लोककलावंताना देण्यात येणाऱ्या निवृत्ती वेतनाचा लाभ देखील त्यांना देण्यात येणार असल्याचे यावेळी जाहीर केले. 

राज्यातील निम्म्या साखरेचे उत्पादन एकट्या अहमदनगर जिल्ह्यातून होते. अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला असल्याचे यावेळी नमूद केले. समृद्धी महामार्गामुळे शिर्डी आणि परिसराच्या विकासाचे नवीन पर्व सुरू होणार असल्याचेही यावेळी बोलताना स्पष्ट केले. राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्य माणसाचे सरकार असून १५ ऑगस्ट पासून सर्व शासकीय रूग्णालयात आता मोफत उपचार मिळत असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतून ५ लाखांपर्यंत विनामूल्य उपचार करण्याचा लाभ सरसकट सगळ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. समुद्राला वाहून जाणारे पाणी वळविण्यासाठी शासन काम करत आहे‌. या माध्यमातून भविष्यात राज्यातील अनेक भाग दुष्काळमुक्त होणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दिवसरात्र मेहनत करून देशाला नव्या उंचीवर घेऊन जात असून जनतेचा सेवक म्हणून आपण काम करत असल्याचे ते आजही म्हणतात. गेल्या नऊ वर्षांत देशात आजवर न झालेले अनेक निर्णय घेऊन अशक्य ते शक्य त्यांनी करून दाखवले असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी