शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

नगर तालुक्याची दुष्काळी साडेसाती संपली; ५९ गावात जलयुक्तचे काम, ३५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 16:29 IST

शासनाची जलयुक्त शिवार योजना नगर तालुक्याला वरदान ठरत असून तालुक्यातील जवळपास ५९ गावांनी यात सहभाग घेऊन दुष्काळावर मात केली आहे. सध्या तालुक्यात एकही टँकर सुरु नसल्याने तालुक्याची वाटचाल टँकर मुक्तीकडे सुरु आहे.

केडगाव : शासनाची जलयुक्त शिवार योजना नगर तालुक्याला वरदान ठरत असून तालुक्यातील जवळपास ५९ गावांनी यात सहभाग घेऊन दुष्काळावर मात केली आहे. सध्या तालुक्यात एकही टँकर सुरु नसल्याने तालुक्याची वाटचाल टँकर मुक्तीकडे सुरु आहे. या योजनेमुळे तालुक्यातील ३५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या नगर तालुक्याने जलयुक्त शिवार योजना एक पर्वणी मानून केलेल्या कामांचे फळ आता पहावयास मिळत आहे. डिसेंबर महिना संपला की तालुक्यात टँकर सुरु करण्याची लगबग प्रत्येक गावात पहावयास मिळत होती, मात्र यंदा तालुक्यातील एकाही गावात अद्याप टँकर सुरु करण्याची वेळ आली नाही किंवा कोणत्या गावाचा यासाठी अजून प्रस्ताव पंचायत समितीकडे आलेला नाही. १९७२ च्या दुष्काळात तालुक्यात तब्बल २७३ पाझर तलाव बांधण्यात आले. मात्र काळाच्या ओघात हे तलाव गाळाने भरत गेल्याने या तलावांची साठवण क्षमता कमालीची घटत गेली. गावोगावी भूजल पातळी घटत गेली. परिणामी विहिरी व कुपनलिका डिसेंबर संपताच तळ गाठत होत्या. पाणी टंचाईची ही साडेसाती व तीव्र दुष्काळाच्या झळा तालुक्याने वर्षानुवर्षे सहन केल्या. पण जलयुक्त शिवार योजना आता तालुक्याला संजीवनी ठरली आहे.जलयुक्तच्या योजनेत पहिल्या वर्षी १८ गावांनी ९ कोटी ३१ लाखांची कामे केली. दुस-या वर्षी २१ गावांचा यात सहभाग झाला या गावांनी ४ कोटी रुपयांची कामे केली.यावर्षी २० गावांनी या योजनेत सहभाग नोंदवत जलयुक्तची कामे सुरु केली आहे. यात प्रामुख्याने गावातील नदीचे खोलीकरण व रुंदीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. गुंडेगाव या गावाने हिवरेबाजारचा आदर्श समोर ठेऊन तालुक्यात प्रथम ही चळवळ लोकसहभागातून सुरु करून दुष्काळावर कायमची मात केली. गुंडेगावमध्ये झालेला कायापालट पाहून तालुक्यातील इतर गावांनी या योजनेत सहभागी होऊन लोकवर्गणी तर सरकारच्या आर्थिक मदतीने आपले गाव जलयुक्त करण्यास पुढाकार घेतला.या योजनेतून बांध बंदिस्ती, नदी खोलीकरण, समतल चर अशी विविध कामे करून पावसाचे वाहून जाणारे पाणी गावातच मोठ्या प्रमाणात अडविण्याचे काम केले. यामुळे मागील वर्षी झालेल्या पावसाने गावातील शिवार जलयुक्त झाले. गावाची पाणी पातळी वाढण्यास मदत मिळाली.

योजनेत सहभागी गावे

निमगाव वाघा, भोयरे खुर्द, गुंडेगाव, पारगाव, भातोडी, हातवळण, वाटेफळ, तांदळी वडगाव, चिचोंडी पाटील, बारदरी, रांजणी, सारोळा बद्धी, जखणगाव, निमगाव घाणा, भोयरे पठार, भोरवाडी, मांजरसुबा, मदडगाव, बाबुर्डी बेंद, खडकी, साकत, दहिगाव, हिवरे झरे,वाळकी, पारगाव मौला, आठवड, कापूरवाडी, अकोळनेर, जाधववाडी, घोसपुरी, सारोळा कासार, पिंपळगाव माळवी, पांगरमल, खोसपुरी, उदरमल, मजले चिंचोली, बहिरवाडी, इमामपूर, धनगरवाडी.

यावर्षी सहभागी गावे

शेंडी, ससेवाडी, डोंगरगण, पोखर्डी, जेऊर, पिंपळगाव उज्जेनी, आव्हाडवाडी, मांडवे,पिंपळगाव, लांडगा, कौडगाव, देऊळगाव सिध्दी, रुई छत्तीसी, उक्कडगाव, बाबुर्डी घुमट, वाडगाव तांदळी, नेप्ती, हिंगणगाव, पिंपळगाव वाघा, कामरगाव, पिंपळगाव कौडा.

नगर तालुक्याने अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सोसल्या. मात्र जलयुक्तच्या कामामुळे गावे पाणीदार बनत आहेत. याचा परिणाम सकारात्मक होत असल्याने अद्याप कोणत्याच गावाला टँकरची गरज भासली नाही.-रामदास भोर, सभापती, नगर पंचायत समिती

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर