शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

नगर तालुक्याची दुष्काळी साडेसाती संपली; ५९ गावात जलयुक्तचे काम, ३५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 16:29 IST

शासनाची जलयुक्त शिवार योजना नगर तालुक्याला वरदान ठरत असून तालुक्यातील जवळपास ५९ गावांनी यात सहभाग घेऊन दुष्काळावर मात केली आहे. सध्या तालुक्यात एकही टँकर सुरु नसल्याने तालुक्याची वाटचाल टँकर मुक्तीकडे सुरु आहे.

केडगाव : शासनाची जलयुक्त शिवार योजना नगर तालुक्याला वरदान ठरत असून तालुक्यातील जवळपास ५९ गावांनी यात सहभाग घेऊन दुष्काळावर मात केली आहे. सध्या तालुक्यात एकही टँकर सुरु नसल्याने तालुक्याची वाटचाल टँकर मुक्तीकडे सुरु आहे. या योजनेमुळे तालुक्यातील ३५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येण्यास मदत झाली आहे.दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या नगर तालुक्याने जलयुक्त शिवार योजना एक पर्वणी मानून केलेल्या कामांचे फळ आता पहावयास मिळत आहे. डिसेंबर महिना संपला की तालुक्यात टँकर सुरु करण्याची लगबग प्रत्येक गावात पहावयास मिळत होती, मात्र यंदा तालुक्यातील एकाही गावात अद्याप टँकर सुरु करण्याची वेळ आली नाही किंवा कोणत्या गावाचा यासाठी अजून प्रस्ताव पंचायत समितीकडे आलेला नाही. १९७२ च्या दुष्काळात तालुक्यात तब्बल २७३ पाझर तलाव बांधण्यात आले. मात्र काळाच्या ओघात हे तलाव गाळाने भरत गेल्याने या तलावांची साठवण क्षमता कमालीची घटत गेली. गावोगावी भूजल पातळी घटत गेली. परिणामी विहिरी व कुपनलिका डिसेंबर संपताच तळ गाठत होत्या. पाणी टंचाईची ही साडेसाती व तीव्र दुष्काळाच्या झळा तालुक्याने वर्षानुवर्षे सहन केल्या. पण जलयुक्त शिवार योजना आता तालुक्याला संजीवनी ठरली आहे.जलयुक्तच्या योजनेत पहिल्या वर्षी १८ गावांनी ९ कोटी ३१ लाखांची कामे केली. दुस-या वर्षी २१ गावांचा यात सहभाग झाला या गावांनी ४ कोटी रुपयांची कामे केली.यावर्षी २० गावांनी या योजनेत सहभाग नोंदवत जलयुक्तची कामे सुरु केली आहे. यात प्रामुख्याने गावातील नदीचे खोलीकरण व रुंदीकरण मोठ्या प्रमाणात करण्यात आले. गुंडेगाव या गावाने हिवरेबाजारचा आदर्श समोर ठेऊन तालुक्यात प्रथम ही चळवळ लोकसहभागातून सुरु करून दुष्काळावर कायमची मात केली. गुंडेगावमध्ये झालेला कायापालट पाहून तालुक्यातील इतर गावांनी या योजनेत सहभागी होऊन लोकवर्गणी तर सरकारच्या आर्थिक मदतीने आपले गाव जलयुक्त करण्यास पुढाकार घेतला.या योजनेतून बांध बंदिस्ती, नदी खोलीकरण, समतल चर अशी विविध कामे करून पावसाचे वाहून जाणारे पाणी गावातच मोठ्या प्रमाणात अडविण्याचे काम केले. यामुळे मागील वर्षी झालेल्या पावसाने गावातील शिवार जलयुक्त झाले. गावाची पाणी पातळी वाढण्यास मदत मिळाली.

योजनेत सहभागी गावे

निमगाव वाघा, भोयरे खुर्द, गुंडेगाव, पारगाव, भातोडी, हातवळण, वाटेफळ, तांदळी वडगाव, चिचोंडी पाटील, बारदरी, रांजणी, सारोळा बद्धी, जखणगाव, निमगाव घाणा, भोयरे पठार, भोरवाडी, मांजरसुबा, मदडगाव, बाबुर्डी बेंद, खडकी, साकत, दहिगाव, हिवरे झरे,वाळकी, पारगाव मौला, आठवड, कापूरवाडी, अकोळनेर, जाधववाडी, घोसपुरी, सारोळा कासार, पिंपळगाव माळवी, पांगरमल, खोसपुरी, उदरमल, मजले चिंचोली, बहिरवाडी, इमामपूर, धनगरवाडी.

यावर्षी सहभागी गावे

शेंडी, ससेवाडी, डोंगरगण, पोखर्डी, जेऊर, पिंपळगाव उज्जेनी, आव्हाडवाडी, मांडवे,पिंपळगाव, लांडगा, कौडगाव, देऊळगाव सिध्दी, रुई छत्तीसी, उक्कडगाव, बाबुर्डी घुमट, वाडगाव तांदळी, नेप्ती, हिंगणगाव, पिंपळगाव वाघा, कामरगाव, पिंपळगाव कौडा.

नगर तालुक्याने अनेक वर्षे दुष्काळाच्या झळा सोसल्या. मात्र जलयुक्तच्या कामामुळे गावे पाणीदार बनत आहेत. याचा परिणाम सकारात्मक होत असल्याने अद्याप कोणत्याच गावाला टँकरची गरज भासली नाही.-रामदास भोर, सभापती, नगर पंचायत समिती

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर