शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

अहमदनगर : घरकुले पूर्ण करण्यात नगर जिल्हा राज्यात प्रथम, १३२ दिवसांत जिल्ह्यात १७ हजार ६८३ लाभार्थ्यांना निवारा

By चंद्रकांत शेळके | Updated: April 1, 2023 17:59 IST

अमृत महाआवास अभियानाच्या विशेष अभियान कालावधीत घरकुले पूर्ण करण्यात नगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

अहमदनगर - अमृत महाआवास अभियानाच्या विशेष अभियान कालावधीत घरकुले पूर्ण करण्यात नगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. गेल्या १३२ दिवसांत नगर जिल्ह्यात १७ हजार ६८३ घरकुले पूर्ण झाली आहेत. गोंदिया जिल्हा ११ हजार घरकुले पूर्ण करून दुसऱ्या स्थानी आहे.

अमृत महाआवास अभियानात केंद्र सरकारकडून पंतप्रधान ग्रामीण आवास योजना, तर राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना असे मिळून लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. त्यानुसार शहरी भागातील लोकांना एक लाख २० हजार, तर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना एक लाख ३० हजार रुपये सरकारकडून अनुदान मिळते. २०१६-१७ पासून ही योजना सुरू झाली, तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यात ६० हजार ७६९ घरकुलांना मंजुरी मिळाली व त्यातील ५१ हजार ३७४ घरे पूर्ण झाली आहेत.

दरम्यान, राज्यात घरकुलांची कामे संथ गतीने सुरू असल्याने शासनाने २० नोव्हेंबर २०२२ पासून घरकुले पूर्ण करण्यासाठी विशेष अभियान सुरू केले. त्यानुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत उर्वरित घरांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन केले.

मागील चार महिन्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन नियोजन केले. त्याचे फलित म्हणून गेल्या १३२ दिवसांत १७ हजार ६८३ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. अभियान काळातील हा आकडा राज्यात सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर ११ हजार घरकुलांसह गोंदिया जिल्हा आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, प्रकल्प संचालक सुनील पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, सहायक अभियंता किरण साळवे, सर्व गट विकास अधिकारी, डीआरडीएचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी याकामी परिश्रम घेतले.

केंद्राचे १३२९४, तर राज्याचे ४३८९ घरकुले पूर्ण

अमृत महाआवास अभियानात ३१ मार्च २०२३ पर्यंत अहमदनगर जिल्हा केंद्र व राज्यपुरस्कृत योजनेत राज्यात प्रथम आला आहे. केंद्र योजनेत १३ हजार २९४, तर राज्यपुरस्कृत योजनेत ४ हजार ३८९ घरकुलांचे कामे पूर्ण झाले आहे.

केंद्राच्या योजनेत जामखेड पुढे

प्रधानमंत्री आवास योजनेत संख्येनुसार जामखेड, अकोले, कर्जत व राज्यपुरस्कृत योजनेत कर्जत, नेवासा, जामखेड या तालुक्यांनी उल्लेखनीय काम केले. एकूण उद्दिष्टामध्ये सर्वाधिक २१७९ घरकुले कर्जतमध्ये, त्यानंतर २१४० घरकुले जामखेड, तर २०३५ घरकुले नेवासा तालुक्यात पूर्ण झाले.