शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

अहमदनगर : घरकुले पूर्ण करण्यात नगर जिल्हा राज्यात प्रथम, १३२ दिवसांत जिल्ह्यात १७ हजार ६८३ लाभार्थ्यांना निवारा

By चंद्रकांत शेळके | Updated: April 1, 2023 17:59 IST

अमृत महाआवास अभियानाच्या विशेष अभियान कालावधीत घरकुले पूर्ण करण्यात नगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

अहमदनगर - अमृत महाआवास अभियानाच्या विशेष अभियान कालावधीत घरकुले पूर्ण करण्यात नगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. गेल्या १३२ दिवसांत नगर जिल्ह्यात १७ हजार ६८३ घरकुले पूर्ण झाली आहेत. गोंदिया जिल्हा ११ हजार घरकुले पूर्ण करून दुसऱ्या स्थानी आहे.

अमृत महाआवास अभियानात केंद्र सरकारकडून पंतप्रधान ग्रामीण आवास योजना, तर राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना असे मिळून लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. त्यानुसार शहरी भागातील लोकांना एक लाख २० हजार, तर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना एक लाख ३० हजार रुपये सरकारकडून अनुदान मिळते. २०१६-१७ पासून ही योजना सुरू झाली, तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यात ६० हजार ७६९ घरकुलांना मंजुरी मिळाली व त्यातील ५१ हजार ३७४ घरे पूर्ण झाली आहेत.

दरम्यान, राज्यात घरकुलांची कामे संथ गतीने सुरू असल्याने शासनाने २० नोव्हेंबर २०२२ पासून घरकुले पूर्ण करण्यासाठी विशेष अभियान सुरू केले. त्यानुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत उर्वरित घरांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन केले.

मागील चार महिन्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन नियोजन केले. त्याचे फलित म्हणून गेल्या १३२ दिवसांत १७ हजार ६८३ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. अभियान काळातील हा आकडा राज्यात सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर ११ हजार घरकुलांसह गोंदिया जिल्हा आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, प्रकल्प संचालक सुनील पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, सहायक अभियंता किरण साळवे, सर्व गट विकास अधिकारी, डीआरडीएचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी याकामी परिश्रम घेतले.

केंद्राचे १३२९४, तर राज्याचे ४३८९ घरकुले पूर्ण

अमृत महाआवास अभियानात ३१ मार्च २०२३ पर्यंत अहमदनगर जिल्हा केंद्र व राज्यपुरस्कृत योजनेत राज्यात प्रथम आला आहे. केंद्र योजनेत १३ हजार २९४, तर राज्यपुरस्कृत योजनेत ४ हजार ३८९ घरकुलांचे कामे पूर्ण झाले आहे.

केंद्राच्या योजनेत जामखेड पुढे

प्रधानमंत्री आवास योजनेत संख्येनुसार जामखेड, अकोले, कर्जत व राज्यपुरस्कृत योजनेत कर्जत, नेवासा, जामखेड या तालुक्यांनी उल्लेखनीय काम केले. एकूण उद्दिष्टामध्ये सर्वाधिक २१७९ घरकुले कर्जतमध्ये, त्यानंतर २१४० घरकुले जामखेड, तर २०३५ घरकुले नेवासा तालुक्यात पूर्ण झाले.