शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

अहमदनगर : घरकुले पूर्ण करण्यात नगर जिल्हा राज्यात प्रथम, १३२ दिवसांत जिल्ह्यात १७ हजार ६८३ लाभार्थ्यांना निवारा

By चंद्रकांत शेळके | Updated: April 1, 2023 17:59 IST

अमृत महाआवास अभियानाच्या विशेष अभियान कालावधीत घरकुले पूर्ण करण्यात नगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.

अहमदनगर - अमृत महाआवास अभियानाच्या विशेष अभियान कालावधीत घरकुले पूर्ण करण्यात नगर जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे. गेल्या १३२ दिवसांत नगर जिल्ह्यात १७ हजार ६८३ घरकुले पूर्ण झाली आहेत. गोंदिया जिल्हा ११ हजार घरकुले पूर्ण करून दुसऱ्या स्थानी आहे.

अमृत महाआवास अभियानात केंद्र सरकारकडून पंतप्रधान ग्रामीण आवास योजना, तर राज्य पुरस्कृत ग्रामीण आवास योजना असे मिळून लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. त्यानुसार शहरी भागातील लोकांना एक लाख २० हजार, तर ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना एक लाख ३० हजार रुपये सरकारकडून अनुदान मिळते. २०१६-१७ पासून ही योजना सुरू झाली, तेव्हापासून आतापर्यंत जिल्ह्यात ६० हजार ७६९ घरकुलांना मंजुरी मिळाली व त्यातील ५१ हजार ३७४ घरे पूर्ण झाली आहेत.

दरम्यान, राज्यात घरकुलांची कामे संथ गतीने सुरू असल्याने शासनाने २० नोव्हेंबर २०२२ पासून घरकुले पूर्ण करण्यासाठी विशेष अभियान सुरू केले. त्यानुसार ३१ मार्च २०२३ पर्यंत उर्वरित घरांची कामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्यासाठी नियोजन केले.

मागील चार महिन्यांत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी तालुकास्तरावर बैठका घेऊन नियोजन केले. त्याचे फलित म्हणून गेल्या १३२ दिवसांत १७ हजार ६८३ घरकुलांची कामे पूर्ण झाली आहेत. अभियान काळातील हा आकडा राज्यात सर्वाधिक आहे. दुसऱ्या क्रमांकावर ११ हजार घरकुलांसह गोंदिया जिल्हा आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, प्रकल्प संचालक सुनील पठारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे, सहायक अभियंता किरण साळवे, सर्व गट विकास अधिकारी, डीआरडीएचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी याकामी परिश्रम घेतले.

केंद्राचे १३२९४, तर राज्याचे ४३८९ घरकुले पूर्ण

अमृत महाआवास अभियानात ३१ मार्च २०२३ पर्यंत अहमदनगर जिल्हा केंद्र व राज्यपुरस्कृत योजनेत राज्यात प्रथम आला आहे. केंद्र योजनेत १३ हजार २९४, तर राज्यपुरस्कृत योजनेत ४ हजार ३८९ घरकुलांचे कामे पूर्ण झाले आहे.

केंद्राच्या योजनेत जामखेड पुढे

प्रधानमंत्री आवास योजनेत संख्येनुसार जामखेड, अकोले, कर्जत व राज्यपुरस्कृत योजनेत कर्जत, नेवासा, जामखेड या तालुक्यांनी उल्लेखनीय काम केले. एकूण उद्दिष्टामध्ये सर्वाधिक २१७९ घरकुले कर्जतमध्ये, त्यानंतर २१४० घरकुले जामखेड, तर २०३५ घरकुले नेवासा तालुक्यात पूर्ण झाले.